शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
2
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
3
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
4
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
5
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
6
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
7
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
8
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
9
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
10
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
11
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
12
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
13
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
14
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
15
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा
16
चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर सर्वात मोठे धरण बांधण्यास सुरुवात केली; भारताने आधीच घेतला आक्षेप
17
Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?
18
भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
19
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
20
Tripti Sahu : "TV स्टार्स गोरं होण्यासाठी घेतात इंजेक्शन", पंचायत फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

४१५ कामे अर्धवट !

By admin | Updated: January 29, 2015 01:14 IST

उस्मानाबाद : दलित वस्त्यांमध्ये विकास कामे राबविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होत आहे. परंतु, प्रशासनाच्या कासवगतीमुळे मुदत सरूनही कामे अपूर्ण आहेत.

उस्मानाबाद : दलित वस्त्यांमध्ये विकास कामे राबविण्यासाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होत आहे. परंतु, प्रशासनाच्या कासवगतीमुळे मुदत सरूनही कामे अपूर्ण आहेत. २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षांमध्ये १ हजार ३२६ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ४१५ कामे आजही अर्धवटस्वरूपात असून हा निधी अखर्चित राहिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या उद्देशाला खिळ बसत असल्याचे दिसून येते.दलित वस्त्यांमध्ये रस्ता, नाल्या या प्रमुख सुविधांसोबतच समाजमंदिर बांधकामासाठीही निधी दिला जातो. परंतु, अपेक्षित गतीने निधी खर्च करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे कोट्यवधीचा निधी अखर्चित राहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला १८ कोटी ८१ लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. या माध्यमातून सुमारे ६४१ कामांना प्रशासकीय मंजुरी देवून कार्यारंभ आदेशही निर्गमित केले होते. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, सदरील कालावधी सरून आठ ते नऊ महिने लोटले असतानाही शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात संबंधित यंत्रणा असमर्थ ठरली आहे. आजही ११३ कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे या कामांचे सुमारे ४ कोटी ८५ लाख रूपये अखर्चित राहिले आहेत.अशीच अवस्था २०१३-२०१४ या वर्षामधील निधी खर्चाच्या बाबतीत आहे. यावेळी २० कोटी ३५ लाख रूपये एवढा निधी मंजूर झाला होता. काम निवड समितीने ७२१ कामांना मंजुरी दिली होती. ही कामे मार्च २०१५ अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु, सध्या यापैकी सुमारे ३०३ कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे उर्वरित दोन महिन्यांमध्ये ही कामे पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. असे असतानाच शासनाने २०१४-२०१५ या आर्थिक वर्षांमध्ये १५ कोटी ८४ लाखांचा निधी मंजूर केला. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असतानाही केवळ ८ कोटी ४ लाख ७२ हजार रूपये एवढा अत्यल्प निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ५५८ कामे मंजूर करण्यात आली असली तरी सुरू करण्यात आलेल्या कामांची संख्या अवघी १३० इतकी आहे. त्यामुळे प्रशासनाची ही कासवगती जिल्ह्याच्या विकासासाठी मारक ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रया उमटत आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला २०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठी १५ कोटी २० लाख रूपये मंजूर झाले होते. यापैकी ८ कोटी ४ लाख ७२ हजार रूपये एवढा निधी जुलै २०१४ मध्ये या विभागाला प्राप्त झाला होता. त्यानंतर तातडीने प्रस्ताव मागवून कामे हाती घेणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. सप्टेंबर २०१४ मध्ये काम निवड समितीची बैठक झाली. बैठक उशिराने झाल्यामुळे किमान प्रशासकीय मान्यता तरी ताडीने मिळतील अशी, अपेक्षा होती. परंतु, येथेही दिरंगाईने पाठा सोडली नाही. नोव्हेंबर २०१४ मध्ये या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर कुठे कामांना सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे कामे तातडीने पूर्ण करता येत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.