शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

१७७ पैकी ४१ उमेदवार बाद

By admin | Updated: September 30, 2014 01:25 IST

जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी छाननी प्रक्रियेअंती एकूण १७७ उमेदवारांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.

जालना : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी छाननी प्रक्रियेअंती एकूण १७७ उमेदवारांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता १३६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १ आॅक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. परतूर मतदारसंघात ३२ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे येथे आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. घनसावंगी मतदारसंघात ३१ पैकी ६ जणांचे अर्ज बाद झाल्याने तेथे २५ उमेदवार आहेत. जालना मतदारसंघात एकूण ४२ पैकी १७ जणांचे अर्ज बाद झाले. २५ जणांचे अर्ज वैध ठरले. बदनापूर मतदारसंघात ३३ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. भोकरदन मतदारसंघात ३९ पैकी एकाच उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने ३८ उमेदवार सध्या रिंगणात आहेत. बदनापूर मतदारसंघातून मोहन तायडे, परमेश्वर गरबडे, दुर्गा सुनील चौधरी, मेहेर प्रकाश नारायणकर, भारत जाधव, भगुरे बालचंद, माया जाधव, डॉ. अभिजीत भालशंकर, मधुकर कदम, बबन कांबळे, ज्ञानोबा व्हावळे यांचे अर्ज बाद झाले.जालना मतदारसंघातून १७ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यामध्ये रणजित विश्वनाथ रत्नपारखे, गणेश शेषराव क्षीरसागर, शेख चाँद पाशा, वाहुळे परमेश्वर यादवराव, म्हस्के रवि पांडुरंग, आनंद कुंडलिक म्हस्के, आनंदा लिंबाजी ठोंबरे, मो. साजेद मो. हरूण, नागसेन संपतराव बनकर, पांडुरंग मताजी कोल्हे, महंम्मद उस्मान महंम्मद इब्राहिम, लांडगे रतन आसाराम, दीपक बबनराव बोरडे, सुनील भाऊराव साळवे, भाऊराव मल्हारी साळवे, अर्जुनराव दादापाटील भांदरगे, उगले वैभव सुरेश यांचा समावेश आहे. परतूर मतदारसंघातून माधवराव कदम, सूर्यकांत बरकुले, शिवाजी डवरे, प्रभाकर रणशूर, शेख अजहर, भीमराव वाघ यांचे अर्ज बाद झाले आहेत. घनसावंगी मतदारसंघातून मनीषा टोपे, शिवाजी चोथे, सूरज उढाण, रणपिसे राधाकृष्ण, गाडगे तुकाराम व मोहिते रामभाऊ तर भोकरदन मतदारसंघातून म्हस्के गिताबाई दिलीप यांचा अर्ज बाद झाला. प्रत्येक निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांच्या कक्षात आज सकाळपासून छाननीस प्रारंभ झाला. काही प्रमुख उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी काही आक्षेप नोंदविले होते. मात्र हे सर्व आक्षेप तपासणीअंती फेटाळण्यात आले. आज दिवसभर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ठिय्या दिला होता. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आता रिंगणात १७७ पैकी १३६ उमेदवार आहेत. १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक तिरंगी, चौरंगी, पंचरंगी अशीच होणार असल्याने अखेरपर्यंत काही अपक्ष उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी देखील कोण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.