शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

४आॅगेस्टअखेर पुरेल एवढे पाणी

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. आॅगस्टअखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा नगर पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता शहर पाणीपुरवठ्याबाबत मनोहरे यांनी विचार असता त्यांनी टंचाई नसल्याचे सांगितले. गत दोन वर्षांपूर्वी जालनेकरांनी अभूतपूर्व अशा पाणीटंचाईचा सामना केला. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. हजारो रुपये पाण्यात घातले. एवढे करुनही शहरवासियांची तृष्णा भागू शकली नाही. याच पार्श्वभूमीवर मनोहरे म्हणाले की, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या घाणेवाडी जलाशयात यात १२ फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. यामुळे नवीन जालनावासियांना व्यवस्थित पाणी मिळत आहे. जुना जालना भागासाठी जायकवाडी- जालना योजनेतून पाणी मिळते. या भागातील दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. काही भागात अंतर्गत जलवाहिनी नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळत नाही. मात्र, नगर पालिकेकडून बहुतांश भागात पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मुख्याधिकरी म्हणत असले तरी नवीन व जुना जालना भागातील अनेक ठिकाणी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यास पालिकेचा कारभार जबादार असल्याची चर्चा आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी वाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी होत असून पालिकेचे त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी) गत वर्षीच्या तुलनेत यंदा शहर परिसरात पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी नगर पालिकेकडून नियोजन करण्यात येत असल्याचे मनोहरे म्हणाले. जलवाहिनी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यासोबतच गरज पडल्यास टँकरद्वारे पाणीपुरठा करण्यात येईल. ज्या भागात जलवाहिन्या नाहीत तेथेही पालिकेकडून सर्वेक्षण करुन पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. ४दरम्यान, पालिकेकडून नियोजनाचा डंगोरा पिटला जात असला तरी पालिकेचे नियोजन ऐनवेळी कोलमडत असल्याचे सर्वश्रुत आहे. पालिकेकडून उडवाउडवाची तसेच थातूरमातूर नियोजन करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असाही आरोप होतो. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पालिका पाण्याचे काय नियोजन करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोहरे म्हणाले, ज्या भागात जलवाहिन्या नाहीत अथवा पाणीटंचाई भासू शकते तेथे कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव आहे. अंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीचेही कामे करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमित कर भरण्याचे आवाहन केले. जेणे करुन मूलभूत सुविधा पुरविण्यास मोठी मदत होईल.