शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

४आॅगेस्टअखेर पुरेल एवढे पाणी

By admin | Updated: November 23, 2014 00:23 IST

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही.

जालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीसाठा राहील. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. आॅगस्टअखेरपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा दावा नगर पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता शहर पाणीपुरवठ्याबाबत मनोहरे यांनी विचार असता त्यांनी टंचाई नसल्याचे सांगितले. गत दोन वर्षांपूर्वी जालनेकरांनी अभूतपूर्व अशा पाणीटंचाईचा सामना केला. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. हजारो रुपये पाण्यात घातले. एवढे करुनही शहरवासियांची तृष्णा भागू शकली नाही. याच पार्श्वभूमीवर मनोहरे म्हणाले की, शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या घाणेवाडी जलाशयात यात १२ फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. यामुळे नवीन जालनावासियांना व्यवस्थित पाणी मिळत आहे. जुना जालना भागासाठी जायकवाडी- जालना योजनेतून पाणी मिळते. या भागातील दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. काही भागात अंतर्गत जलवाहिनी नादुरुस्त असल्यामुळे पाणी मिळत नाही. मात्र, नगर पालिकेकडून बहुतांश भागात पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मुख्याधिकरी म्हणत असले तरी नवीन व जुना जालना भागातील अनेक ठिकाणी नियमित पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यास पालिकेचा कारभार जबादार असल्याची चर्चा आहे. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी वाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी होत असून पालिकेचे त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी) गत वर्षीच्या तुलनेत यंदा शहर परिसरात पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी नगर पालिकेकडून नियोजन करण्यात येत असल्याचे मनोहरे म्हणाले. जलवाहिनी दुरुस्तीचे कामे हाती घेण्यासोबतच गरज पडल्यास टँकरद्वारे पाणीपुरठा करण्यात येईल. ज्या भागात जलवाहिन्या नाहीत तेथेही पालिकेकडून सर्वेक्षण करुन पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. ४दरम्यान, पालिकेकडून नियोजनाचा डंगोरा पिटला जात असला तरी पालिकेचे नियोजन ऐनवेळी कोलमडत असल्याचे सर्वश्रुत आहे. पालिकेकडून उडवाउडवाची तसेच थातूरमातूर नियोजन करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जातात, असाही आरोप होतो. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात पालिका पाण्याचे काय नियोजन करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोहरे म्हणाले, ज्या भागात जलवाहिन्या नाहीत अथवा पाणीटंचाई भासू शकते तेथे कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव आहे. अंतर्गत जलवाहिनी दुरुस्तीचेही कामे करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमित कर भरण्याचे आवाहन केले. जेणे करुन मूलभूत सुविधा पुरविण्यास मोठी मदत होईल.