शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

जिल्ह्यात ३०० टँकर !

By admin | Updated: March 30, 2016 00:44 IST

उस्मानाबाद : तीन-चार वर्षांपासून सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाभरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद : तीन-चार वर्षांपासून सरासरीच्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्हाभरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासोबतच चाऱ्याचेही दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून टँकरसोबत जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्तांची तहान भागविली जात आहे. परंतु, सदरील उपाययोजनाही तोकड्या पडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने त्याच गतीने जलस्त्रोतही कोरडे पडू लागले आहेत. परिणामी टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला जिल्हाभरात तब्बल ३०० टँकर सुरू असून अधिग्रहणांची संख्याही १ हजार १ हजार १६८ वर जावून ठेपली आहे.अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांसोबतच पाझर तलावांच्या घशाला कोरड निर्माण झाली आहे. तसेच भू-जल पातळीही फारशी उंचावलेली नाही. त्यामुळे जसजशी उन्हाची दाहकता वाढू लागली आहे, त्याप्रमाणे विहीर, बोअर झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. एकेका गावामध्ये टँकर भरण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पाच ते दहा किलोमीटर दूर जावून पाणी आणावे लागत आहे. परिणामी टँकरसोबतच जलस्त्रोत अधिग्रहणांची मागणी वाढू लागली आहे. सध्या सर्वाधिक भीषण टंचाई उस्मानाबाद तालुक्यात असून सुमारे ६३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. उस्मानाबादनंतर भूम तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक असून तब्बल ५५ टँकर सुरू आहेत. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची ५० टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. उरमाग तालुक्यातही टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत झपाट्याने भर पडू लागली आहे. आजघडीला ४१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाशी आणि परंडा तालुक्यातही टंचाई तीव्र रूप धारण करू लागली आहे. या दोन्ही तालुक्यांत मिळून ४८ टँकर सुरू आहेत. तुळजापूर तालुक्यातही २० टँकर सुरू आहेत. तर लोहारा तालुक्यामध्ये ५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण भागामध्ये एकूण २८२ टँकर सुरू आहेत. ही संख्या आणखी वाढेल, प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)