शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

‘त्या’ २५० जणांवर गुन्हे दाखल होणार !

By admin | Updated: March 15, 2015 00:39 IST

लातूर : लातूर शहर महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेता शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत़ महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात

लातूर : लातूर शहर महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेता शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत़ महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात २५० अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत, यापैकी ९० बांधकामांचे पंचनामे करण्यात आले असून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ ते बांधकाम बंद करून आठ दिवसांत संबंधित मालमत्ताधारकांनी नवीन प्रस्ताव मनपाकडे सादर करावा, अन्यथा सरसकट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़ महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी बिनबोभाट अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ बांधकाम परवान्यासाठी असलेल्या नियम व अटींची पूर्तता न करताच अनेकांनी आपल्या सोयीनुसार बांधकाम हाती घेतले आहे़ यामध्ये काही मोठ्या इमारतींचाही समावेश आहे़ परवानगी न घेताच मर्जीप्रमाणे काम करण्यात येत आहे़ यातून मनपाचा महसूल लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे़ बांधकाम करीत असताना पार्किंगची व्यवस्था, रस्ता याशिवाय अन्य काही महत्वाच्या नियमानुसारच सादर करण्यात आलेल्या बांधकाम परवान्याला महापालिका संमती देते. बांधकाम परवान्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ व पैसा या दोन्ही गोष्टी लागत असल्याने अनेक बांधकामे अनधिकृतपणेच करण्यात आली आहेत. बहुतांश ठिकाणी करण्यात आलेली बांधकामे परवाना एका नकाशाचा अन् काम मात्र दुसऱ्याच पद्धतीने करून घेतले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षीही लातूरकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याने प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यांपासून मनपाने बांधकाम परवाने थांबविले आहेत. त्याअगोदर संबंधित विभागात जबाबदार व्यक्तीच नसल्याने काही दिवस बांधकाम परवान्याचा खेळ झाल्याने परवाना काढण्यासाठी मारावे लागणारे खेटे कमी व्हावेत म्हणून अनेकांनी परवाना न घेताच काम हाती घेतले आहे. मनपा प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अनधिकृत बांधकाम धारकांचे फावले आहे. मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहराच्या चारही झोनमध्ये अनधिकृत बांधकामांचा सर्वे करण्यात आला आहे. त्यात जवळपास २५० अनधिकृत बांधकाम होत असल्याचे आढळून आले आहे. प्रारंभी बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा मनपाकडून बजावण्यात आल्या होत्या. मात्र मनपा प्रशासनाच्या नोटिशीला एकाही बांधकाम धारकाने दाद दिली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सूचना देऊनही बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या चौदा जणांना शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५० बांधकामांपैकी शंभर बांधकामांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकामांचेही पंचनामे सुरू आहेत. संबंधितांनी अनधिकृत बांधकाम थांबवून तात्काळ सुधारित नकाशा तयार करून तो आठवडाभरात महापालिकेकडे सादर करावा. सध्या पाणीटंचाई असल्याने तात्पुरते परवाने थांबविण्यात आले आहेत. चांगला पाऊस पडताच बांधकाम परवाने दिले जातील. अनधिकृत बांधकाम धारकांनी कारवाई टाळण्यासाठी काम थांबवून तात्काळ सुधारित बांधकाम परवान्याचा प्रस्ताव महापालिकेकडे द्यावा, असे आवाहन आयुक्त तेलंग यांनी केले आहे. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात अनधिकृत बांधकामांमुळे खिळ बसली आहे. शिवाय, मनमानी कामे करून घेण्यात येत असल्याने बांधकामधारकांचे फावत आहे.४ मनपाकडून बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ २५० बांधकाम धारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, झोननिहाय पंचनामा करण्याचे कामही सुरू आहे. ९० ते १०० बांधकामांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मनपाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी सुधारित नकाशा तयार करून तो परवान्यासाठी महापालिकेकडे सादर करावा. आठवडाभरात ज्यांचा प्रस्ताव येईल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आयुक्त तेलंग यांनी सांगितले.