शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘त्या’ २५० जणांवर गुन्हे दाखल होणार !

By admin | Updated: March 15, 2015 00:39 IST

लातूर : लातूर शहर महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेता शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत़ महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात

लातूर : लातूर शहर महापालिकेकडून बांधकाम परवाना न घेता शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत़ महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्व्हेक्षणात २५० अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत, यापैकी ९० बांधकामांचे पंचनामे करण्यात आले असून १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ ते बांधकाम बंद करून आठ दिवसांत संबंधित मालमत्ताधारकांनी नवीन प्रस्ताव मनपाकडे सादर करावा, अन्यथा सरसकट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़ महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी बिनबोभाट अनधिकृत बांधकामे सुरू आहेत़ बांधकाम परवान्यासाठी असलेल्या नियम व अटींची पूर्तता न करताच अनेकांनी आपल्या सोयीनुसार बांधकाम हाती घेतले आहे़ यामध्ये काही मोठ्या इमारतींचाही समावेश आहे़ परवानगी न घेताच मर्जीप्रमाणे काम करण्यात येत आहे़ यातून मनपाचा महसूल लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे़ बांधकाम करीत असताना पार्किंगची व्यवस्था, रस्ता याशिवाय अन्य काही महत्वाच्या नियमानुसारच सादर करण्यात आलेल्या बांधकाम परवान्याला महापालिका संमती देते. बांधकाम परवान्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी वेळ व पैसा या दोन्ही गोष्टी लागत असल्याने अनेक बांधकामे अनधिकृतपणेच करण्यात आली आहेत. बहुतांश ठिकाणी करण्यात आलेली बांधकामे परवाना एका नकाशाचा अन् काम मात्र दुसऱ्याच पद्धतीने करून घेतले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. यावर्षीही लातूरकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याने प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळेच गेल्या तीन महिन्यांपासून मनपाने बांधकाम परवाने थांबविले आहेत. त्याअगोदर संबंधित विभागात जबाबदार व्यक्तीच नसल्याने काही दिवस बांधकाम परवान्याचा खेळ झाल्याने परवाना काढण्यासाठी मारावे लागणारे खेटे कमी व्हावेत म्हणून अनेकांनी परवाना न घेताच काम हाती घेतले आहे. मनपा प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अनधिकृत बांधकाम धारकांचे फावले आहे. मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहराच्या चारही झोनमध्ये अनधिकृत बांधकामांचा सर्वे करण्यात आला आहे. त्यात जवळपास २५० अनधिकृत बांधकाम होत असल्याचे आढळून आले आहे. प्रारंभी बांधकाम थांबविण्याच्या नोटिसा मनपाकडून बजावण्यात आल्या होत्या. मात्र मनपा प्रशासनाच्या नोटिशीला एकाही बांधकाम धारकाने दाद दिली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. सूचना देऊनही बांधकाम सुरूच ठेवणाऱ्या चौदा जणांना शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५० बांधकामांपैकी शंभर बांधकामांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकामांचेही पंचनामे सुरू आहेत. संबंधितांनी अनधिकृत बांधकाम थांबवून तात्काळ सुधारित नकाशा तयार करून तो आठवडाभरात महापालिकेकडे सादर करावा. सध्या पाणीटंचाई असल्याने तात्पुरते परवाने थांबविण्यात आले आहेत. चांगला पाऊस पडताच बांधकाम परवाने दिले जातील. अनधिकृत बांधकाम धारकांनी कारवाई टाळण्यासाठी काम थांबवून तात्काळ सुधारित बांधकाम परवान्याचा प्रस्ताव महापालिकेकडे द्यावा, असे आवाहन आयुक्त तेलंग यांनी केले आहे. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात अनधिकृत बांधकामांमुळे खिळ बसली आहे. शिवाय, मनमानी कामे करून घेण्यात येत असल्याने बांधकामधारकांचे फावत आहे.४ मनपाकडून बांधकाम परवाना न घेता अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ २५० बांधकाम धारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय, झोननिहाय पंचनामा करण्याचे कामही सुरू आहे. ९० ते १०० बांधकामांचे पंचनामे पूर्ण झाले असून, १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मनपाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी संबंधितांनी सुधारित नकाशा तयार करून तो परवान्यासाठी महापालिकेकडे सादर करावा. आठवडाभरात ज्यांचा प्रस्ताव येईल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आयुक्त तेलंग यांनी सांगितले.