शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

प्रत्येक अडचणीत धावून येणार ‘२४ तास हेल्पलाईन’

By admin | Updated: October 2, 2014 01:22 IST

औरंगाबाद : आता कुठल्याही अडचणीमुळे हताश होण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी ‘२४ तास हेल्पलाईन’ औरंगाबादेत पुढे येतेय.

औरंगाबाद : आता कुठल्याही अडचणीमुळे हताश होण्याची गरज नाही. कारण तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून येणारी ‘२४ तास हेल्पलाईन’ औरंगाबादेत पुढे येतेय. जी तुमच्या अगदी लहान-सहान पण त्रासदायक अशा अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला सहकार्य करणार आहे. आमदार राजेंद्र दर्डा यांनी बनविलेल्या औरंगाबादच्या जाहीरनाम्यात यासह अनेक महत्त्वाच्या संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनलेला औरंगाबादचा जाहीरनामा तयार झाला आहे. तब्बल ५२ हजार घरांपर्यंत जाऊन, जनतेची मते विचारात घेऊन हा जाहीरनामा अर्थात ‘व्हिजन औरंगाबाद’ तयार करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची मते जाणून घेऊन एखाद्या उमेदवाराने आपला जाहीरनामा तयार करणे हा निवडणुकीच्या इतिहासातील विक्रमच आहे. त्यामुळे औरंगाबादच्या विकासाच्या दृष्टीने तयार केलेल्या या जाहीरनाम्याचे महत्त्व वाढले आहे. आमदार राजेंद्र दर्डा यांच्या संकल्पनेतून ‘टीम औरंगाबाद’ने औरंगाबादचा जाहीरनामा तयार करण्याचा संकल्प केला आणि जोमाने कामाला सुरुवात केली. यासाठी प्रारंभी औरंगाबादच्या प्रमुख विषयांच्या जाणिवेतून प्रश्नावली तयार करण्यात आली. औरंगाबादकरांना भविष्यातील शहर कसे हवे आहे, हे जाणून घेण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले. यामध्ये अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने जाहीरनामा तयार करण्याच्या कामाला गती मिळाली. औरंगाबादकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. औरंगाबादचा जाहीरनामा अर्थात ‘व्हिजन औरंगाबाद’ पाहून आपण औरंगाबादच्या विकासात जनतेची भूमिका जाणून घेऊ शकतो याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया राजेंद्र दर्डा यांनी दिली. ‘व्हिजन औरंगाबाद’ हे केवळ देखाव्याकरिता तयार करण्यात आालेला निवडणूक जाहीरनामा नसून औरंगाबादला एक अत्याधुनिक महानगर बनविण्यासाठी जनतेनेच तयार केलेले व्हिजन असल्याचे राजेंद्र दर्डा म्हणाले.५२ हजार घरांचा महासर्व्हे करून बनविले ‘व्हिजन औरंगाबाद’ शहरात पासपोर्ट कार्यालय; सर्वत्र वायफाय; लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहनराजेंद्र दर्डा यांच्या जाहीरनाम्यात जनतेच्या आशा-आकांक्षापूर्तीचे आश्वासन पायाभूत सुविधांना प्राधान्य‘व्हिजन औरंगाबाद’मध्ये पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे शहरात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात येईल. नवीन औरंगाबादेत सिडको व म्हाडाच्या माध्यमातून घरांची उभारणी करण्यात येईल. प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरात प्रत्येक वॉर्डात किमान एक सुलभ शौचालय बांधण्यात येणार आहे. ‘झंडा ऊंचा रहे हमारा...’राष्ट्रगीत गायनाचा विश्वविक्रम करीत औरंगाबादचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्णाक्षरांत नोंदविण्यात आले. आता शहरात सर्वांत उंच राष्ट्रध्वज फडकविण्यात येईल. देशप्रेमाचा नवा आदर्श घालून देण्यासाठी एक अभियान म्हणून हा संकल्प पूर्णत्वास नेण्यात येईल.