शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

२०० कोटींच्या कर्जात बुडतेय जहाज

By admin | Updated: May 13, 2014 01:00 IST

विकास राऊत, औरंगाबाद महापालिके ने २०१२ च्या सप्टेंबर महिन्यापासून २०० कोटी रुपयांच्या व्याज व मुद्दलापोटी ७२ कोटी रुपये अदा केले आहेत.

 विकास राऊत, औरंगाबाद महापालिके ने २०१२ च्या सप्टेंबर महिन्यापासून २०० कोटी रुपयांच्या व्याज व मुद्दलापोटी ७२ कोटी रुपये अदा केले आहेत. कर्ज काढून उभारण्यात आलेल्या २०० कोटींतून ३ कोटी ६० लाख मनपा दरमहा फेड करीत आहे. एलबीटी भरण्यासाठी व्यापार्‍यांनी हात अखडता घेत आंदोलनाचे हत्यार उपसल्याने पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्यास व्याजाची रक्कम कशी देणार, असा प्रश्न असून, मनपाने एलबीटीचे खाते कर्ज देणार्‍या आयडीबीआय या बँकेशी संलग्न केले आहे. एलबीटीतून अगोदर २०० कोटींच्या व्याजाचा हप्ता कपात होतो. त्यानंतर उर्वरित रक्कम पालिकेला वापरता येते. एलबीटीतून कमी उत्पन्न झाल्यास पालिकेत बोंबाबोंब होणार आहे. १० वर्षे त्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत आहे. त्यासाठी मनपाने काही महत्त्वाच्या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. १०० कोटी रुपये महावितरणची देणी आणि १०० कोटी रुपये समांतर जलवाहिनीसाठी मनपाने कर्ज काढून उभे केले. त्यातील महावितरणचे ३५० कोटी रुपयांचे कर्ज वनटाईम सेटलमेंट करून १०० कोटी रुपये अदा करण्यात आले. राज्यात विजेची थकबाकी देणारी औरंगाबाद मनपा प्रथम ठरली. मात्र, त्याचा फायदा म्हणून मनपा कर्जबाजारी होत गेली. त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार ७२ कोटी फक्त व्याजच नसून त्यातून काही मुद्दलचीही परतफेड केली आहे. मात्र, २०१२ पासून आजवर पालिकेच्या तिजोरीतून १२० कोटींची रक्कम गेली हे खरे आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यातून तत्कालीन आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे यांच्या मध्यस्थीने महावितरणला १०० कोटींचा धनादेश देण्यात आला. मुळात ती थकबाकी देण्याची गरज नव्हती, असे विरोधकांचे मत होते. १ कोटी ८० लाख रुपयांचा हप्ता त्यावेळी पालिकेला सुरू झाला. त्यानंतर मार्च २०१३ मध्ये समांतर जलवाहिनीसाठी १०० कोटींचे कर्ज काढण्यात आले. ती योजना अजून कागदावरच आहे. पालिका १ कोटी ८० लाख रुपयांचा कर्जाचा हप्ता मात्र नियमित भरणा करीत आहे. आयुक्त म्हणाले... २०० कोटी रुपयांसाठी नुसतेच व्याजाचे हप्ते भरलेले नाहीत. सोबत मुद्दलही भरणा केली जात आहे. परंतु पालिकेची मोठी रक्कम कर्जफेडीत जात आहे, असे डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले.