शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

२० लाख रोपे उपलब्ध

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत.

रामेश्वर काकडे, नांदेडनांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत. मात्र मागच्या आठवड्यापर्यंत केवळ २९ हजार ४६४ रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत कृषी विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण तसेच जिल्हा परिषदेमार्फत मोठ्या संख्येने रोपट्यांची लागवड करुन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हातभार लावण्यात येत आहे. आजपर्यंत विविध विभागामार्फत १७ लाख ९७६८२ खड्डे खोदण्यात आले आहेत. जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाला ४ लाख ११३५८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मागच्या आठवड्यापर्यंत १ लाख ४०२६७ खड्डे खोदले असून २७६२१ वृक्षांची लागवड केलेली आहे. वनविभागाला ११ लाख ८१३३७ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून १२ लाख ३३००२ खड्डे तयार आहेत. तर जिल्हा परिषदेला १० लाख ७८३९२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून १ लाख २४४०७ खड्डे खोदण्यात आले आहेत. तसेच सामाजिक वनीकरण विभागाला २ लाख ७५०० लागवडीचा लक्षांक दिला असून १ लाख ८२३०० खड्डे खोदण्यात आले आहेत.असे जिल्ह्याला एकूण २८ लाख ७८३९२ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून १७ लाख ९७६८२ खड्डे खोदून तयार आहेत. तर २२ रोपवाटिकेमध्ये २० लाख ९१७९४ रोपे तयार करण्यात आली आहेत. परंतु लागवड मात्र केवळ २९४६४ एवढी झाली आहे.तालुकानिहाय दिलेले उद्दिष्ट असे- अर्धापूर- ८२०५०, खोदलेले खड्डे ७३८४०,भोकर- उद्दिष्ट ३ लाख ८८२१४, खड्डे ३ लाख १३४५१, बिलोली- उदिष्ट १ लाख २६४००, खड्डे ४०७५०, देगलूर- ६२२००, खड्डे २८८४०, धर्माबाद- २ लाख २००, खड्डे ३७६२०, हदगाव- उद्दिष्ट ४ लाख ७८०५७, खड्डे ३ लाख ३९६, हिमायतनगर- उद्दिष्ट ४५७००, खड्डे ३१६३५, कंधार- उद्दिष्ट १ लाख २७०६०, खड्डे १ लाख ५३६७, किनवट- उद्दिष्ट ६ लाख २१७७२, खड्डे ५ लाख ५१२५२, लोहा- उद्दिष्ट ७६५००, खड्डे ४२७००, माहूर- उद्दिष्ट २ लाख ६६ हजार , खड्डे ८६३११, मुदखेड- उद्दिष्ट १ लाख २५६०, खड्डे २०२४७, नांदेड- उद्दिष्ट १ लाख ७७७९०, खड्डे ७२७९१, उमरी- उद्दिष्ट ८२२७४, खड्डे ६२१५०, याप्रमाणे जिल्ह्यातील वृक्षलागवडीच्या लक्षांकाची स्थिती आहे.यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले तर पर्यावरणसंवर्धन करण्यासाठी मदत होणार आहे. यंदा पावसाळा संपत आला तरी आजपर्यंत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. याचा परिणाम पावसाअभावी वृक्षलागवडीवर झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत केवळ २९ हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्याला २९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी पावसाअभावी यावर्षी शतकोटी वृक्षलागवड योजना फेल होणार असल्याची स्थिती सध्यातरी दिसत आहे. सध्या गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट कितपत साध्य होणार हे सांगणे आजघडीला तरी अशक्य आहे.