शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

२० लाख रोपे उपलब्ध

By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST

रामेश्वर काकडे, नांदेड नांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत.

रामेश्वर काकडे, नांदेडनांदेड : शतकोटी लागवड योजनेअंतर्गत २०१४ या वर्षात जिल्ह्याला विविध विभागामार्फत २९ लाख रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट असून सध्या रोपवाटिकेमध्ये २० लाख रोपे तयार आहेत. मात्र मागच्या आठवड्यापर्यंत केवळ २९ हजार ४६४ रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत कृषी विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण तसेच जिल्हा परिषदेमार्फत मोठ्या संख्येने रोपट्यांची लागवड करुन पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हातभार लावण्यात येत आहे. आजपर्यंत विविध विभागामार्फत १७ लाख ९७६८२ खड्डे खोदण्यात आले आहेत. जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाला ४ लाख ११३५८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मागच्या आठवड्यापर्यंत १ लाख ४०२६७ खड्डे खोदले असून २७६२१ वृक्षांची लागवड केलेली आहे. वनविभागाला ११ लाख ८१३३७ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून १२ लाख ३३००२ खड्डे तयार आहेत. तर जिल्हा परिषदेला १० लाख ७८३९२ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून १ लाख २४४०७ खड्डे खोदण्यात आले आहेत. तसेच सामाजिक वनीकरण विभागाला २ लाख ७५०० लागवडीचा लक्षांक दिला असून १ लाख ८२३०० खड्डे खोदण्यात आले आहेत.असे जिल्ह्याला एकूण २८ लाख ७८३९२ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून १७ लाख ९७६८२ खड्डे खोदून तयार आहेत. तर २२ रोपवाटिकेमध्ये २० लाख ९१७९४ रोपे तयार करण्यात आली आहेत. परंतु लागवड मात्र केवळ २९४६४ एवढी झाली आहे.तालुकानिहाय दिलेले उद्दिष्ट असे- अर्धापूर- ८२०५०, खोदलेले खड्डे ७३८४०,भोकर- उद्दिष्ट ३ लाख ८८२१४, खड्डे ३ लाख १३४५१, बिलोली- उदिष्ट १ लाख २६४००, खड्डे ४०७५०, देगलूर- ६२२००, खड्डे २८८४०, धर्माबाद- २ लाख २००, खड्डे ३७६२०, हदगाव- उद्दिष्ट ४ लाख ७८०५७, खड्डे ३ लाख ३९६, हिमायतनगर- उद्दिष्ट ४५७००, खड्डे ३१६३५, कंधार- उद्दिष्ट १ लाख २७०६०, खड्डे १ लाख ५३६७, किनवट- उद्दिष्ट ६ लाख २१७७२, खड्डे ५ लाख ५१२५२, लोहा- उद्दिष्ट ७६५००, खड्डे ४२७००, माहूर- उद्दिष्ट २ लाख ६६ हजार , खड्डे ८६३११, मुदखेड- उद्दिष्ट १ लाख २५६०, खड्डे २०२४७, नांदेड- उद्दिष्ट १ लाख ७७७९०, खड्डे ७२७९१, उमरी- उद्दिष्ट ८२२७४, खड्डे ६२१५०, याप्रमाणे जिल्ह्यातील वृक्षलागवडीच्या लक्षांकाची स्थिती आहे.यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले तर पर्यावरणसंवर्धन करण्यासाठी मदत होणार आहे. यंदा पावसाळा संपत आला तरी आजपर्यंत अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. याचा परिणाम पावसाअभावी वृक्षलागवडीवर झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत केवळ २९ हजार वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्याला २९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी पावसाअभावी यावर्षी शतकोटी वृक्षलागवड योजना फेल होणार असल्याची स्थिती सध्यातरी दिसत आहे. सध्या गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट कितपत साध्य होणार हे सांगणे आजघडीला तरी अशक्य आहे.