शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

१६१४ बालके कुपोषित

By admin | Updated: October 22, 2014 13:37 IST

हिंगोली जिल्ह्यात १0९0 अंगणवाड्या बालकांसाठी काम करीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या १६१४ वर पोहोचली आहे.

हिंगोली : एकीकडे देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे अन्नापायी होणारे कुपोषण कमी होण्याच्या मार्गावर नाही. कोट्यवधी रूपयांचा खर्च करूनही कुपोषण आटोक्यात येत नाही. जिल्ह्यात १0९0 अंगणवाड्या बालकांसाठी काम करीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या १६१४ वर पोहोचली आहे. आहाराचा मेनू बदलला, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रूग्णालयापर्यंत कुपोषित बालकांसाठी सेवा देत असताना कुपोषणाचा डाग जाण्याच्या मार्गावर नाही. 
बहुतांशजण अर्धपोटी किवा उपाशी झोपतात. प्रौढांमध्ये भूकबळी तर बालके कुपोषणाची शिकार होतात. ग्रामीण तसेच दुर्गम भागातच कुपोषणाची समस्या नसून शहरी भागही त्यापासून सुटलेला नाही. प्रामुख्याने प्रथिनेयुक्त आहाराच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. शिवाय आहार जरी उत्तम असला तरी तो वेळेवर घेतला नाही तर अन्न जात नाही आणि आजारांमुळेही कुपोषण होत असल्याचे समोर आले आहे. म्हणून बालकांच्या प्रकृतीनुसार कुपोषित बालकांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात 'तीव्र कुपोषण' सर्वात घातक आणि वरच्या क्रमांकाचे आहे. जिल्ह्यात अशा बालकांची संख्या १ हजार ६१४ आहे. एकूण बालकांत दीड टक्के बालके कुपोषणाची शिकार बनली आहेत. सेनगाव तालुक्यात सर्वाधिक ४४३ तर औंढा नागनाथ तालुक्यात सर्वात कमी २00 बालकांची नोंद करण्यात आली आहे. कळमनुरी ३१६, वसमत ३0२ आणि हिंगोली तालुक्यात ३0७ कुपोषित आहेत. एखाद्या गावात संख्येने अधिक असणार्‍या बालकांसाठी 'ग्राम बालविकास केंद्र' उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६0 केंद्रात एका बालकावर महिन्याला १ हजार रूपयांचा खर्च होतो. प्रामुख्याने आहारावर अधिक लक्ष दिल्या जाते. प्रथिनेयुक्त आहार देऊनही कुपोषण थांबले नसल्यास बालकांना औषधोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवले जाते. उपयुक्त औषधी या बालकांना नियमित दिल्या जातात. प्रत्येक महिन्याला अंगणवाडी सेविकांकडून कुपोषित बालकांचे सर्व्हेक्षण केल्या जाते. तद्नंतर वैद्यकीय अधिकारी तपासणी करून कुपोषण जाहीर करतात. एकीकडे यंत्रणा बालकांना शोधण्याचे कामी करीत असताना दुसरीकडे या समस्येचा नायनाटासाठी सवरेतपरी प्रयत्न केले जात आहेत. पहिल्यापेक्षा ही समस्या बर्‍याच प्रमाणात कमी झाली असली ती आटोक्यात आलेली नाही. (प्रतिनिधी) 
■ जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही बालकांचे कुपोषण कमी होत नसल्यास त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले जाते. मागील सहा महिन्यांपूर्वी येथे कुपोषित बालकांची व्यवस्था करण्यात आली. तिथे बालरोग विभागाकडून आहारापासून त्यांच्या औषधोपचाराकडे विशेष लक्ष दिल्या जाते. दिवसातून तीनवेळा उपयुक्त आहार देण्याचे काम परिचारिकांकडून होते. तसेच डॉक्टरांकडून औषधौपचारावर लक्ष दिल्या जाते.
 ■ दुर्गम भाग असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना करण्यात आल्या.