शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

निवडणूक आखाड्यात उरले १५६ उमेदवार

By admin | Updated: October 2, 2014 01:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सर्व मतदारसंघांमध्ये मिळून निवडणूक रिंगणात १५६ उमेदवार उरले आहेत. सर्वाधिक ३० उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत, तर सर्वांत कमी १२ उमेदवार कन्नड मतदारसंघात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. नऊ मतदारसंघांमध्ये एकूण ३१९ जणांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत त्यापैकी ३६ जणांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे छाननीनंतर रिंगणात २८३ उमेदवार उरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत यापैकी १२७ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. सिल्लोड मतदारसंघात २५ पैकी ९ जणांनी माघार घेतली. तेथे आता १६ उमेदवार उरले आहेत. कन्नड मतदारसंघातही २० पैकी ८ जणांनी माघार घेतली. फुलंब्री मतदारसंघात २१ पैकी ८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक २६ जणांनी माघार घेतली. तरीही तेथे १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात २९ पैकी ११ जणांनी, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ५० पैकी २० जणांनी, पैठण मतदारसंघात ४१ पैकी २२ जणांनी, गंगापूर मतदारसंघात ३५ पैकी १८ जणांनी आणि वैजापूर मतदारसंघात १८ पैकी ५ जणांनी माघार घेतली.