शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

कराचे १४ लाख रुपये ग्रामपंचायतीकडे सुपूर्द

By admin | Updated: August 24, 2014 00:17 IST

उस्मानाबाद : चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याकडे थकित ग्रामपंचायत कराची पन्नास टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने

उस्मानाबाद : चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याकडे थकित ग्रामपंचायत कराची पन्नास टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कळंब तसीलदारांनी ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. मिराजी मैंदाड यांच्याकडे १४ लाख ४९ हजार १३७ रूपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. चोराखळी ग्रामपंचायतीकडून धाराशिव साखर कारखान्याकडे थकित असलेल्या ग्रामपंचायत कराची रक्कम मिळावी, म्हणून मागील तीन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रकरणी ग्रामपंचायतीचे सरंपच अ‍ॅड. मैंदाड यांनी हे प्रकरण शासन दरबारीही मांडले होते. त्यानुसार ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या बाजुने निकाल दिला होता. सदरील निकालाविरूद्ध कारखान्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेवर १२ जून २०१४ रोजी न्यायालयाने निर्णय दिला. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे जमा असलेल्या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला अदा करून उर्वरित रक्कम औरंगाबाद खंडपीठामध्ये जमा करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलदार कळंब यांनी १३ आॅगस्ट रोजी चोराखळी ग्रामपंचायतीचे सरपंच अ‍ॅड. मिराजी मैंदाड यांच्याकडे १४ लाख ४९ हजार १३७ रूपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. तसेच उर्वरित रक्कम खंडपीठ औरंगाबाद येथे जमा करण्यात आली आहे. कराची सदरील रक्कम मिळाल्यामुळे गावामध्ये विविध विकास कामे राबविता येणार असल्याचे अ‍ॅड. मैंदाड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)