विकास राऊत , औरंगाबादविभागात दुष्काळाची भीषणता मोठ्या प्रमाणात जाणवत असून, मराठवाड्याला मागील तीन वर्षांपासून ‘टँकरवाडा’ अशी उपाधी मिळाली आहे. पाण्याचे स्रोत आटल्यामुळ विभागातील अंदाजे २० टक्के नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. १०० कोटींच्या आसपास टँकरच्या फेऱ्यांवर खर्च होण्याचा अंदाज आहे. पावसाने दडी मारली, तर हा खर्च वाढण्याची शक्यता आहे.मार्चअखेरपर्यंत ४४ कोटी रुपये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च झाले आहेत. जून अखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विभागीय पातळीवर करण्यात आले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत टँकरवर किती खर्च झाला, याचे गणित प्रशासनाने अजून केलेले नाही. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या रोज वाढत आहे. या आठवड्यात ९५ टँकरची संख्या विभागात वाढली असून, ७० गावे नव्याने टंचाईग्रस्त यादीमध्ये आली आहेत. १,२६५ गावांत व ४५५ वाड्यांमध्ये १,६७२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ( पान २ वर)( पान १ वरून) १५९ सरकारी तर १,५१३ खाजगी टँकर्सवर मराठवाड्यातील वाळवंटी गावांची तहान भागविण्यात येत आहे. घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांमध्ये हाणामारी करण्यापर्यंत वेळ येत आहे. विभागातील अनेक गावांत पाण्यावरून ‘वैर’ निर्माण होणाऱ्या घटना घडत आहेत. दुष्काळाच्या या असह्य झळांचा फटका आबालवृद्धांसह पशुधनालादेखील बसतो आहे. वैराण वाळवंटाप्रमाणे विभागातील प्रकल्प आटले आहेत. पाण्यासाठी वणवण भटकंती करूनही पाणी मिळत नसल्यामुळे गावकऱ्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. विभागीय आयुक्त म्हणाले...विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट म्हणाले की, विभागातील गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटत आहेत. टँकर हा पाणीपुरवठ्याचा खर्चिक पर्याय आहे; परंतु स्रोत आटल्यामुळे त्या पर्यायावरच अवलंबून राहावे लागत आहे. पेजयल योजनांबाबत विचारले असता ते म्हणाले की, या योजनांचे आऊटपूट काय आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. टँकरसाठी राखीव निधी नाहीये. त्यासाठी कृती आराखडा असतो. मार्चअखेरपर्यंत ४४ कोटी रुपये खर्च टँकर पाणीपुरवठ्यावर झाला आहे. जूनअखेरपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता आहे. जिल्हागावेटँकरऔरंगाबाद३८३५१८जालना२२१२७२परभणी०१२०१७हिंगोली००७००६नांदेड१२९२०३बीड३६२४५१लातूर०५७०७६उस्मानाबाद०९४१२९एकूण१,२६५१,६७२
१०० कोटींचा टँकरवाडा!
By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST