शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

डिपॉझिट वाचविण्यास १ लाख १० हजार मतांची गरज

By admin | Updated: May 13, 2014 01:01 IST

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे निकालाविषयी आतापासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची मतमोजणी तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे निकालाविषयी आतापासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणाचे डिपॉझिट वाचणार, कुणाचे जप्त होणार याविषयीही तर्क लढविले जात आहेत. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविण्यासाठी यावेळी १ लाख १० मते घ्यावी लागणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदारांनी यावेळी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात तब्बल ६२ टक्के मतदान झाले. एकूण ९ लाख ८२ हजार मतदारांनी मतदान केले. निवडणूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार उमेदवाराने वैध मतांच्या किमान १२.५ टक्के मते घेतले तरच त्याचे डिपॉझिट वाचू शकेल. लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच मतदान यंत्रावर उमेदवारांविषयी नापसंती दर्शविणारा (नोटा) पर्याय देण्यात आला. उमेदवाराच्या डिपॉझिटचा विचार करता नोटा पर्यायाला मिळालेली मते वगळली जातील. ही मते सोडून उर्वरित वैध मते गृहीत धरली जातील. त्या वैध मतांच्या तुलनेत १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतलेल्या उमेदवारांनाच त्यांचे डिपॉझिट परत मिळेल. मतदारसंघात झालेले एकूण मतदान लक्षात घेतल्यास डिपॉझिट वाचविण्यासाठी सुमारे १ लाख १० हजार मते मिळवणे आवश्यक ठरणार आहे. २७ उमेदवार रिंगणात लोकसभेचा अर्ज भरताना उमेदवारांना अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागते. यावेळी ही रक्कम खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५ हजार आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२ हजार पाचशे रुपये एवढी होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे आता यापैकी किती जण १ लाख १० हजार मतांचा टप्पा ओलांडतात यावर त्यांचे डिपॉझिट वाचते की जप्त होते हे ठरेल. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पहिल्यांदाच शहराबाहेर होत आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीला छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. १६ मे रोजी होणार्‍या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राबाहेर तब्बल पाचशे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.