शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कामगार मजुरीविनाच

By admin | Updated: December 20, 2015 00:48 IST

येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले.

पांदण रस्त्याचे काम : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रारतळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले. परंतु या कामाला अडीच वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होवूनही मजुरांना मजुरी प्राप्त झाली नाही. त्यामुळे सदर मजुरांची मजुरी त्वरित मिळावी व या दिरंगाईबद्दल जबाबदार असलेले तत्कालिन ग्रामेसवक पिल्लेवार यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी नागभीड तालुका भाजपाध्यक्ष तसेच जिल्हा दक्षता समिती सदस्य होमदेव मेश्राम यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.१८ मार्च २०१३ ते २४ मार्च २०१३ या कालावधीत सावरगाव येथील माणिक कुंभरे यांच्या शेतापासून पांदण रस्त्याचे मातीकाम मग्रारोहयो या योजनेतून ३०० मजुरांनी केले. आणि काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरी वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीपण आज अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. या संदर्भात संबंधित मजुरांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन दक्षता समिती सदस्य तसेच नागभीड तालुका भाजपाध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी २८ सप्टेंबर २०१५ रोजी दक्षता समितीच्या बैठकीत विषय उपस्थित करुन शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते व चौकशी अहवालानुसार १८ मार्च २०१३ ते २५ मार्च २०१३ या कालावधीतील मॅन्युअल मस्टर तथा ई- मस्टर काढल्याचे दिसून येत नाही. तसेच याबाबत रोजगार मागणीचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही तर सरपंच प्रविण खोब्रागडे यांनी मजुरी काढून देण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतु आजतागायत मजुरांची मजुरी दिली नाही. सदर कालावधीत मजूर कामावर असल्याचे मस्टर किंंवा कोणताही पुरावा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. परंतु शाखा अभियंता तथा तांत्रिक अधिकारी मरेगा पंचायत समिती नागभीड यांनी मोजमाप पुस्तिका क्र. ०५ वर सदहू कामाचे मूल्यांकन करुन दिले आहेत.शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ४०/रोहयो १० अ दिनांक २ मे २०११ व शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ५४-७/रोहयो १० अ १७ मे २०१२ अन्वये सर्वप्रथम नोंदणीकृत मजुरांची मागणी उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे व जतन करणे, ग्रामसेवक रोजगार सेवकाने ग्रामसेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या नोंदी व अभिलेख योग्य प्रकारे सांभाळण्याचे काम रोजगार सेवकाने करावे, मजुरांचे हजेरी फलक तयार करणे, भरणे व सांभळणे व इतरही अनेक जबाबदारी पार पाडणे आदी कामे रोजगार सेवकाची आहे. मात्र प्रति स्वाक्षरीबाबत ग्रामपंचायत यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक व यंत्रणाचे तांत्रिक अधिकारी यांची आहे. परंतु सदर कामे सुरू असताना रोजगार सेवक व ग्रामसेवकांनी आपल्या कर्तव्यास कसूर केल्याचे चौकशी अहलवातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र मग्रारोहयो अधिनियम २००५ अन्वये रोजगार सेवक तसेह महाराष्ट्र शासन जिल्हासेवा (शिस्त व अपिल) १९६४ च्या नियम ३ व ४ नुसार ग्रामसेवक कारवाईही पात्र असल्याचे दिसून येत आहे. या चौकशी अहवालाच्या आधारे १८ ते २३ मार्च २०१३ या कालावधीतील ३०० मजुरांची मजुरी त्वरित देण्याची मागणी मेश्राम यांनी केली. (वार्ताहर)