शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कामगार मजुरीविनाच

By admin | Updated: December 20, 2015 00:48 IST

येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले.

पांदण रस्त्याचे काम : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रारतळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले. परंतु या कामाला अडीच वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होवूनही मजुरांना मजुरी प्राप्त झाली नाही. त्यामुळे सदर मजुरांची मजुरी त्वरित मिळावी व या दिरंगाईबद्दल जबाबदार असलेले तत्कालिन ग्रामेसवक पिल्लेवार यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी नागभीड तालुका भाजपाध्यक्ष तसेच जिल्हा दक्षता समिती सदस्य होमदेव मेश्राम यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.१८ मार्च २०१३ ते २४ मार्च २०१३ या कालावधीत सावरगाव येथील माणिक कुंभरे यांच्या शेतापासून पांदण रस्त्याचे मातीकाम मग्रारोहयो या योजनेतून ३०० मजुरांनी केले. आणि काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरी वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीपण आज अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. या संदर्भात संबंधित मजुरांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन दक्षता समिती सदस्य तसेच नागभीड तालुका भाजपाध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी २८ सप्टेंबर २०१५ रोजी दक्षता समितीच्या बैठकीत विषय उपस्थित करुन शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते व चौकशी अहवालानुसार १८ मार्च २०१३ ते २५ मार्च २०१३ या कालावधीतील मॅन्युअल मस्टर तथा ई- मस्टर काढल्याचे दिसून येत नाही. तसेच याबाबत रोजगार मागणीचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही तर सरपंच प्रविण खोब्रागडे यांनी मजुरी काढून देण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतु आजतागायत मजुरांची मजुरी दिली नाही. सदर कालावधीत मजूर कामावर असल्याचे मस्टर किंंवा कोणताही पुरावा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. परंतु शाखा अभियंता तथा तांत्रिक अधिकारी मरेगा पंचायत समिती नागभीड यांनी मोजमाप पुस्तिका क्र. ०५ वर सदहू कामाचे मूल्यांकन करुन दिले आहेत.शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ४०/रोहयो १० अ दिनांक २ मे २०११ व शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ५४-७/रोहयो १० अ १७ मे २०१२ अन्वये सर्वप्रथम नोंदणीकृत मजुरांची मागणी उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे व जतन करणे, ग्रामसेवक रोजगार सेवकाने ग्रामसेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या नोंदी व अभिलेख योग्य प्रकारे सांभाळण्याचे काम रोजगार सेवकाने करावे, मजुरांचे हजेरी फलक तयार करणे, भरणे व सांभळणे व इतरही अनेक जबाबदारी पार पाडणे आदी कामे रोजगार सेवकाची आहे. मात्र प्रति स्वाक्षरीबाबत ग्रामपंचायत यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक व यंत्रणाचे तांत्रिक अधिकारी यांची आहे. परंतु सदर कामे सुरू असताना रोजगार सेवक व ग्रामसेवकांनी आपल्या कर्तव्यास कसूर केल्याचे चौकशी अहलवातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र मग्रारोहयो अधिनियम २००५ अन्वये रोजगार सेवक तसेह महाराष्ट्र शासन जिल्हासेवा (शिस्त व अपिल) १९६४ च्या नियम ३ व ४ नुसार ग्रामसेवक कारवाईही पात्र असल्याचे दिसून येत आहे. या चौकशी अहवालाच्या आधारे १८ ते २३ मार्च २०१३ या कालावधीतील ३०० मजुरांची मजुरी त्वरित देण्याची मागणी मेश्राम यांनी केली. (वार्ताहर)