शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्या बाबांनाही न्याय मिळेल का ?

By admin | Updated: June 18, 2017 00:32 IST

अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या मायावी ...

वतन लोणे । लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : अलिकडे ‘डे’ नावाच्या संस्कृतीने मानवी जीवनात चांगलाच शिरकाव केलेला आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या मायावी दुनियेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जगभरातील तरूण आज कुठल्या ना कुठल्या ‘डे’ची वाट पाहत असतात. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जगभरात ‘फादर्स डे’चे आयोजन करण्यात येते. वडिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरूवात अमेरिकेत करण्यात आली. लहानपणापासून मुलांना कायम धाकात व बंधनात ठेवणारा पिता, प्रपंचाची जबाबदारी समर्थपणे पेलत असताना जबाबदारीच्या ओझाने असेल किंवा समाजाच्या दडपणामुळे, रडताना कधीच दिसत नाही. कुटुंबप्रमुख, कर्ता पुरूष, कुटुंबाचा आधार अशी अनेक बिरूदे सन्मानाने मिरवणारा हा बाप, मुलगी सासरी जाताना मात्र डोळ्यांत पाणी आणतो, रडतो. तेव्हा तो खूप अगतिक वाटतो. मनात चिंता असते, मात्र तरीही ओठावर सतत हसू ठेवणारा हा वधूपिता काळजाच्या तुकड्याला अनोळखी कुटुंबाच्या हवाली करताना अगतिक न होईल तरच नवलच! आयुष्यभर कुटुंबासाठीच झटणाऱ्या पित्याला सलाम करण्याचा ‘फादर्स डे’ हा अनोखा दिवस. आईचे प्रेम आणि वडिलांची माया मिळाल्याखेरीज मुलांचे भवितव्य उज्ज्वल होत नाही. मात्र, सध्याच्या काळात पती-पत्नींचे घटस्फोटांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. अशा प्रकरणात मुलाची जबाबदारी व त्याचा ताबा हे कायदेशीर प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. कौटुंबिक न्यायालयेही आईकडेच मुलांचा ताबा देतात. वयाच्या ७ व्या वर्षापर्यंत मुलाचा आईकडे ताबा असतो. नंतर पुन्हा मुलगा म्हणेल त्याच्याकडे ताबा देण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, सतत आईच्या संपर्कात असल्याने बऱ्याचशा घटनांमध्ये नंतरही मुलगा आईकडेच राहणे पसंत करतो. सतत वडिलांच्या विरोधातच ऐकत असल्यामुळे वडिलांबद्दलची नकारात्मक मानसिकता तयार होत जाते. त्यामुळे उभ्या आयुष्यात वडील व मुलगा यांच्यातला दुरावा कमी होत नाही. पयार्याने या नातेसंबंधावर अत्यंत वाईट परिणाम होतात. अविश्वसनीय वाटत असलेली ही परिस्थिती आज बरेच वडील जगत आहेत. भारतीय परिवार बचाव संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्राद्वारे या बाबीची कल्पना देण्यात आली आहे. मुलांचा ताबा न मिळालेल्या वडिलांना मुलांचा पूर्ण खर्च सोसावा लागतो. मात्र, या बदल्यात वडिलांना मुलासोबत महिन्यातून एकदाच ३० मिनिटे ते १ तास भेटता येते. ही भेट सार्वजनिक ठिकाणीच घेतली पाहिजे, असेही बंधन आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने अशा प्रकरणांत निर्णय देताना वडिलांच्याही भावनांचा विचार करावा, अशी विनंती संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे. नाहीतर भारतीय समाज व्यवस्थेत वडिलांंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा आईकडे गेल्यानंतर वडिलांना मुलाला भेटणेही कठीण होऊन बसते. मुलाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. एकप्रकारच्या दडपण व नैराश्याखाली वडील वावरू लागतो. तो कोणाला काही सांगूही शकत नाही व मोकळेपणाने रडूही शकत नाही. वडिलांनाही भावना असतात, हे लक्षात घेतल्यास समोपचाराने असे प्रश्न सुटू शकतात.- डॉ. नंदकिशोर मैंदळकर,जिल्हाध्यक्ष, भारतीय परिवारबचाव संघटना, चंद्रपूर.