शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परंपरा जोपासणारी मंडळे

By admin | Updated: September 8, 2016 00:45 IST

अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या गणरायाची स्थापन करण्यात आली आहे.

पारंपारिक वारसा : ध्वनी प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचा संकल्प चंद्रपूर : अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या गणरायाची स्थापन करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आजही काही मंडळांकडून जुन्या परंपरा जोपासल्या जात आहेत. यात बोटावर मोजण्याइतके मंडळे असली तरी या गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करून समाज जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिसून आले. चंद्रपूर येथील गोलबाजारातील एका चाळीत साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाला १०९ वर्षांची परंपरा आहे. ३१ आॅगस्ट १९०८ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्याही आधीपासून येथे सार्वजनिक स्वरुपात गणेशाची स्थापना केली जाते. बालगोविंद पंडीत यांनी १९०८ मध्ये सर्वप्रथम येथे गणरायाची स्थापना केली होती. या ठिकाणी टेलरिंगची दुकाने आहेत. या दुकानांच्या चाळीतच गणरायाची स्थापना होते. या गणेशोत्सवासाठी तब्बल १० दिवस काही दुकाने स्वमर्जीने दुकानदार बंद ठेवतात. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. भजन आणि भोजन हे या मंडळाचे ब्रिदच आहे. दहाही दिवस-रात्री या ठिकाणी भजन केले जाते. गोलबाजारातील दुकानदार रात्री भजनात सहभागी होतात. विशेष म्हणजे, या मंडळाने एक्का (अखंड टाळ) ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. यासोबत गणरायाचे विसर्जनही अतिशय साधे म्हणजे भजन-किर्तन गातच केले जाते. ढोलताशे, बॅण्ड संदल या वाद्यांना मंडळाने दूर ठेवले आहे. सौरभ गटलेवार हे या मंडळाचे अध्यक्ष असून संजय दिकोंडावार हे उपाध्यक्ष आहेत. तर प्रभाकर आक्केवार हे सचिव आहेत. या मंडळाने पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत यावर्षी ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. गिरणार चौक येथील जय बजरंग गणेश मंडळालाही यावर्षी ५० वर्षांची परंपरा लाभली आहे. विशिष्ट अशा प्रकारचे मंदिर तयार करून गणरायाची स्थापना केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष सुरेश अडपेवार असून सचिव रघुवीर अहीर हे आहेत. या मंडळाने समाजजागृती करणारे अनेक फलक लावले आहेत. चंद्रपूरचा राजा म्हणून ओळख असलेल्या जटपुरा गणेशोत्सव मंडळालाही यावर्षी ४२ वर्षाची परंपरा लाभली आहे. आपल्या वेगळ्या वैशिष्टयामुळे जिल्ह्यात हे मंडळ प्रसिध्द असून दरवर्षी डेकोरेशन करताना देशातील विविध प्रसिध्द वास्तूंचे देखावे तयार केले जाते. यंदा मंडळाने हैद्राबाद येथील चारमिनारची प्रतिकृती तयार केली असून अक्षरधाम येथील मंदिराची प्रतिकृती तयार करून त्यामध्ये २५ फुटाच्या गणपतीची स्थापना केली आहे. या मंडळातर्फेही विविध उपक्रम राबविले जात असून यावर्षी प्रशासनाच्या आवाहनानुसार डीजे वाद्याला फाटा देत पारंपारिक वाद्य करून विर्सजन करण्याचा संकल्प या मंडळाने केला आहे.चंद्रपुरातील सवारी बंगला येथील गणेश मंडळाने यावर्षी ११९ वर्षे पूर्ण केली आहेत. या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. या मंडळानेही प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. तसेच चंद्रपुरातील टिळक बाजार गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ, हिवरपुरी बाल गणेश मंडळ, टागोर गणेश मंडळानाही अनेक वर्षांची परंपरा असून सामाजिक जनजागृतीसाठी विविध देखावे सादर करण्यात ही मंडळे अव्वल आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)प्रशासनाच्या आवाहनला साथजिल्हा प्रशासनाने यावर्षी ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. तसेच आवाहनही गणेश मंडळांना करून डीजे गणेश विर्सजन मिरवणुकीतून बाद करण्याचे निर्देश दिले आहे. या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला असून पारंपारिक वाद्य करून विर्सजन करण्याचा संकल्प गणेश मंडळांनी केला आहे. यात शेकडो गणेश मंडळांचा समावेश आहे.बल्लारपूरच्या मंडळाचीही परंपरा कायमजनजागृती आणि समाज व देशाच्या तत्कालीन घटना व समस्यांवर उत्तम देखावे सादर करण्यात बल्लारपूर येथील पेपर मिल कला मंदिराजवळील सार्वजनिक गणेश मंडळ अग्रस्थानी आहे. या मंडळाला जनजागृती कार्याचे पुरस्कार पोलीस विभागाकडून मिळाले आहेत. हे मंडळ पर्यावरण लोकशिक्षण यावर भर आहे. मागील वर्षी या मंडळाने पाणी बचाव, स्वच्छतेचे महत्व, स्त्री मुक्ती आणि समान हक्क या विषयांवर देखावे उभे करुन वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. बॅनरद्वारे वेगवेगळे संदेश अंकित केले होते.