शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कळमना शिवारात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना उपवनक्षेत्रातील शिवारावर वाघाची दहशत पसरली असून शेतात चरणाऱ्या वासरावर वाघाने हल्ला करून ठार केले. घटना बुधवारी घडली.मौजा कळमना तलाठी साजात वर्धा नदीच्या पट्टयात शेकडो एकर शेती असून या शिवारात मागील आठ दिवसांपासून वाघाने बस्तान मांडले आहे. शंकर महाकूलकर यांच्या मालकीचे जनावरे त्यांच्याच ...

ठळक मुद्देवाघाच्या भीतीने शेतकामे प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कळमना उपवनक्षेत्रातील शिवारावर वाघाची दहशत पसरली असून शेतात चरणाऱ्या वासरावर वाघाने हल्ला करून ठार केले. घटना बुधवारी घडली.मौजा कळमना तलाठी साजात वर्धा नदीच्या पट्टयात शेकडो एकर शेती असून या शिवारात मागील आठ दिवसांपासून वाघाने बस्तान मांडले आहे. शंकर महाकूलकर यांच्या मालकीचे जनावरे त्यांच्याच शेतात चरत असताना वाघाने हल्ला करून वासरला ठार मारले. याबाबत संबंधित वनकर्मचाºयांकडे तक्रार करण्यात आली. वनविभागाने ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून वाघाच्या अस्तित्वाची छायाचित्रे घेतली. नदी पट्टयात वाघ सतत फिरत असल्याने व रात्रदिवस वाघाचे दर्शन शेतकºयांना होत असल्याने शेतकरी शेतात जाण्यासाठी कचरत आहेत. रात्री रानडुकराच्या हैदोसाने उभी पिके नष्ट होत आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व पीक वाचविण्यासाठी रात्रीची जागल आवश्यक आहे. मात्र शिवारावर रात्रदिवस वाघाची भ्रमंती असल्याने भीतीपोटी शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली आहे.रात्री लोडशेडींग करण्याची मागणीकोठारी ३३ केव्ही सब स्टेशनमधून कळमना, मानोरा, पळसगाव, किन्ही, कोर्टी, आमडी, इटोली व गिलबिली व कवडजई येथे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र सध्या वाघाची दहशत सर्वत्र असल्याने वीज वितरण कंपनीने दिवसाची लोडशेडींग बंद करून रात्री सुरू करावी व पाण्यावाचून पिकांना वाचवावे, अशी मागणी ज्ञानेश्वर लोहे, रमेश पिपरे यांनी मागणी केली आहे.उर्जाग्राम वसाहतीत वाघाचे दर्शनताडाळी : केंद्रीय कार्यशाळेच्या आरआरआरटी परिसरातून पट्टेदार वाघाने वसाहतीत शिरकाव केला आहे. वसाहतीतील अतिथीगृह व कैलाश चिकित्सालय परिसरात अनेकांना वाघाचे दर्शन झाले. ऊर्जाग्राम ताडाळीचे क्षेत्रीय वित्त प्रबंधक एम. एस. राजू व हैदराबादहून आलेले परीक्षक ऋषिकेश व राजस्थानहून आलेले परीक्षक अभिषेक अतिथीगृहातून रात्रीचे जेवण आटपून बाहेर निघाले व पायी चालत असताना अचानक त्यांना रस्त्यावर वाघाचे दिसला. या परिसरातील शेतीची कामे वाघाच्या दहशतीमुळे प्रभावित झाली आहेत. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी उर्जाग्राम, ताडाळीवासीयांची मागणी आहे.महिलेवर हल्लासुशी दाबगाव : सरपण गोळा करण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजता कक्ष क्रमांक ५२५ मध्ये घडली. शालू घनश्याम उराडे (३७) असून ती आपला भाऊ जगोबा गोंगले यांच्यासोबत सुशी दाबगाव येथे राहते. गुरुवारी सकाळी शालू आणि अन्य तीन महिला जवळच्या जंगलात सरपण गोळा करण्याकरिता गेले होते. वाघाने अचानक हल्ला केला. यात शालू उराडे गंभीर जखमी झाल्या. इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने पळ काढला. शालू हिला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.