शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या अफवेमुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:11 IST

सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना कुत्र्यामध्येही वाघ दिसत आहे. शनिवारीही वाघाने महिलेला ठार केल्याची बातमी पसरली. तेव्हा वनविभाग शोधमोहिमेवर निघाला तेव्हा तो वाघ नसून कुत्रा असल्याचे समोर आले आणि अफवा ती अफवाच ठरली.

ठळक मुद्देवनविभागाची शोधमोहीम : नाचनभट्टी बिटातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत इतकी पसरली आहे की, अनेकांना कुत्र्यामध्येही वाघ दिसत आहे. शनिवारीही वाघाने महिलेला ठार केल्याची बातमी पसरली. तेव्हा वनविभाग शोधमोहिमेवर निघाला तेव्हा तो वाघ नसून कुत्रा असल्याचे समोर आले आणि अफवा ती अफवाच ठरली.वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत उपवनक्षेत्र नवरगाव मधील नाचनभट्टी बिटातील मिनघरी येथे दोन दिवस असा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी दोन महिला मिनघरी फाट्यावर जाण्यासाठी निघाल्या असता वाटेमध्ये डुकरांच्या मागे कुत्रे धावत होते. कुत्र्याचा रंग लाल असल्याने संबंधीत महिलांना वाघ असल्याचे जाणवले. त्यांनी याची माहिती मिनघरीच्या गावकऱ्यांना दिली. गावकºयांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाºयांना व कर्मचाºयांना दिली. गावकरी व वनविभागाच्या कर्मचाºयांनी ज्या परिसरात वाघ दिसल्याचे सांगितले गेले, त्या परिसरात सर्वत्र शोध मोहिम राबविली. शोध मोहिमेनंतर डुकरांच्या व कुत्र्यांच्या पाऊल खुणा आढळल्या आणि त्याच परिसरात लाल रंगाचा कुत्राही आढळून आल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, वाघ बघायला आलेल्या नागरिकांची निराशा झाली.अशीच घटना दुसºया दिवशी शनिवारी नाचनभट्टी बिटातच मिनघरी जवळील शिवटेकटी परिसरात सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. येथे वाघाने महिलेला ठार केल्याची वार्ता परिसरात पसरली. ज्यांना ही माहिती मिळाली त्यांनी ही माहिती पुढील दहा जणांना देण्याला सुरुवात केली. जो-तो त्या दिशेने बघण्यासाठी धावू लागले. ही घटना नवरगाव येथील प्रभारी क्षेत्रसहाय्यक जे. एस. वैद्य, वनरक्षक राजेशी नागोसे, वनरक्षक आर. यू. शेख, वनरक्षक नितेश सहारे यांना माहिती होताच ते घटनास्थळी दाखल झाले. शिवटेकडी परिसर व संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. मिनघरी येथील महिलेला ठार केले एवढेच लोकांकडून ऐकायला मिळत होते. परंतु, ती महिला कोण, याची शहानिशा होत नव्हती. मिनघरी गावातही शोध घेतला असता अशी कोणतीही महिला बेपत्ता नव्हती. दोन ते अडीच तासांच्या शोध मोहीमेनंतर ही घटना केवळ अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर पहायला गेलेले नागरिक व वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी परत आले. शुक्रवार व शनिवारच्या दोन्ही अफवांमुळे तालुक्यात वाघाची दहशत कायम आहे.अफवा पसरवू नये, वनविभागाचे आवाहनकुणी काहीही सांगितले तरी वाघाच्या बाबतीत लोकांचा विश्वास बसत आहे. अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. नाहीतर लांडगा आला रे आला ही गत होवून आणि प्रत्यक्ष वाघ दिसला तरी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये.