शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

१० मिनिटांच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: June 22, 2016 01:20 IST

दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्ध्या काकुळतीला आला आहे. चातकासारखी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची स्पंदने वाढायला लागली आहेत.

प्रकाश काळे गोवरीदमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्ध्या काकुळतीला आला आहे. चातकासारखी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची स्पंदने वाढायला लागली आहेत. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. परंतु बहुतांश भागात हा पाऊस १० ते १५ मिनिटेच पडल्याने प्रखर उन्हामुळे शेतात टाकलेली कपाशीची बियाणे उमलण्यापूर्वीच कोमेजली आहेत. अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात झाल्याने दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.शेतकऱ्यांना पाऊस येण्याची प्रतीक्षा असतानाच हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. मात्र जूनच्या सुरुवातीला आलेला पाऊस अचानक गायब झाला. निसर्गाचा फेराच यावर्षी उलटा पडल्याने जमिनीत कोरड्यावर टाकलेले महागडे बियाणे उमलण्यापूर्वीच मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर वाढत असतानाच निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल, असे वाटले होते. मात्र निसर्गही लहरीपणासारखा वागायला लागल्याने शेतकऱ्यांना मायेचा हात देणाराही कुणी उरला नाही. शेतकऱ्यांच्या संकटाची मालिका पाठ सोडायला तयार नाही. शेती कसायची इच्छा मनात नसतानाही यावर्षी शेतकऱ्यांनी शेती केली. उसनवारीने पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. आता शेतकऱ्यांजवळ एक छदामही पैसा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी संभ्रमात आहेत. ४८ तासांत विदर्भ, कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला होता. मात्र दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाचा एक थेंबसुद्धा पडला नाही. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा हे तालुका पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. कापूस या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र यावर्षी पावसानेच दगा दिला. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या बियाणांची लागवड केली. तब्बल १५ दिवसांनंतर शनिवारला पावसाने काही भागात हजेरी लावली तर बहुतांश भागात १० ते १५ मिनिटे पाऊस पडून निघून गेला.कपाशीचे पीक जमिनीतून वर येण्यासाठी एक-दोन दिवसाआड पाऊस येणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. कोरड्या जमिनीवर टाकलेल्या बियाण्यांना कोंब अंकुरले आहे. मात्र प्रखर उन्हामुळे कपासीचे कोंब जमिनीतच कोमेजून गेले आहे. महागडे बियाणे अपुऱ्या पावसाने जमिनीतच मातीमोल झाले आहे. कृषी केंद्र संचालकही शेतकऱ्यांना उधार बियाणे देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: हताश झाला आहे. अपुऱ्या पावसाने घात केल्याची प्रतिक्रिया तमाम शेतकरी वर्गात उमटली आहे.