शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

१० मिनिटांच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: June 22, 2016 01:20 IST

दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्ध्या काकुळतीला आला आहे. चातकासारखी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची स्पंदने वाढायला लागली आहेत.

प्रकाश काळे गोवरीदमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सध्ध्या काकुळतीला आला आहे. चातकासारखी पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या काळजाची स्पंदने वाढायला लागली आहेत. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. परंतु बहुतांश भागात हा पाऊस १० ते १५ मिनिटेच पडल्याने प्रखर उन्हामुळे शेतात टाकलेली कपाशीची बियाणे उमलण्यापूर्वीच कोमेजली आहेत. अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात झाल्याने दुबार पेरणीचे संकट अटळ आहे.शेतकऱ्यांना पाऊस येण्याची प्रतीक्षा असतानाच हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल, असे भाकीत वर्तविले होते. मात्र जूनच्या सुरुवातीला आलेला पाऊस अचानक गायब झाला. निसर्गाचा फेराच यावर्षी उलटा पडल्याने जमिनीत कोरड्यावर टाकलेले महागडे बियाणे उमलण्यापूर्वीच मातीमोल झाले आहे. शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर वाढत असतानाच निसर्ग शेतकऱ्यांना साथ देईल, असे वाटले होते. मात्र निसर्गही लहरीपणासारखा वागायला लागल्याने शेतकऱ्यांना मायेचा हात देणाराही कुणी उरला नाही. शेतकऱ्यांच्या संकटाची मालिका पाठ सोडायला तयार नाही. शेती कसायची इच्छा मनात नसतानाही यावर्षी शेतकऱ्यांनी शेती केली. उसनवारीने पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. आता शेतकऱ्यांजवळ एक छदामही पैसा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी संभ्रमात आहेत. ४८ तासांत विदर्भ, कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला होता. मात्र दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाचा एक थेंबसुद्धा पडला नाही. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा हे तालुका पांढऱ्या सोन्यासाठी अग्रेसर मानले जातात. कापूस या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र यावर्षी पावसानेच दगा दिला. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीच्या बियाणांची लागवड केली. तब्बल १५ दिवसांनंतर शनिवारला पावसाने काही भागात हजेरी लावली तर बहुतांश भागात १० ते १५ मिनिटे पाऊस पडून निघून गेला.कपाशीचे पीक जमिनीतून वर येण्यासाठी एक-दोन दिवसाआड पाऊस येणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. कोरड्या जमिनीवर टाकलेल्या बियाण्यांना कोंब अंकुरले आहे. मात्र प्रखर उन्हामुळे कपासीचे कोंब जमिनीतच कोमेजून गेले आहे. महागडे बियाणे अपुऱ्या पावसाने जमिनीतच मातीमोल झाले आहे. कृषी केंद्र संचालकही शेतकऱ्यांना उधार बियाणे देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: हताश झाला आहे. अपुऱ्या पावसाने घात केल्याची प्रतिक्रिया तमाम शेतकरी वर्गात उमटली आहे.