शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
2
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
3
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
4
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
5
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
6
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
7
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
8
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
9
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
10
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
11
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
13
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
14
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
15
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
16
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
17
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
18
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
19
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
20
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार

शिष्यवृत्ती पात्रतेत जिल्ह्याचे विद्यार्थी बाद

By admin | Updated: December 30, 2015 01:39 IST

लहान मुलांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावे,...

कसा सुधारणार शैक्षणिक दर्जा? : १३ हजार विद्यार्थ्यापैकी केवळ ७७१ विद्यार्थ्यांची निवडमंगेश भांडेकर चंद्रपूरलहान मुलांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावे, यासाठी राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. मात्र जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख बघितल्यास अत्यंत बिकट अशी स्थिती दिसते. २०१४-१५ या वर्षात इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व व्यवस्थापनामधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे उत्तीर्ण होऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागल्याची माहिती समोर आली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व व्यवस्थापनामधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातून तब्बल २३ हजार ६४३ विद्यार्थी बसले होते. यात चौथीचे १२ हजार ४९२ तर सातवीचे ११ हजार १५१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी १३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ५६.७५ एवढी आहे. मात्र एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही केवळ ७७१ विद्यार्थीच शिष्यवृत्तीस पात्र ठरले. पूर्व प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी घेण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या चवथीच्या विद्यार्थ्यांला तीन वर्षापर्यंत ५०० रूपये प्रती महिना व सातवीच्या विद्यार्थ्यास तीन वर्षांपर्यंत ७५० रूपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य खरेदी व इतर कामात आर्थिक मदत मिळते. मात्र जिल्ह्याच्या कोट्यानुसार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरत असल्याने अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होवूनही या शिष्यवृत्तीला मुकावे लागत असल्याची स्थिती आहे.