शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शिष्यवृत्ती पात्रतेत जिल्ह्याचे विद्यार्थी बाद

By admin | Updated: December 30, 2015 01:39 IST

लहान मुलांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावे,...

कसा सुधारणार शैक्षणिक दर्जा? : १३ हजार विद्यार्थ्यापैकी केवळ ७७१ विद्यार्थ्यांची निवडमंगेश भांडेकर चंद्रपूरलहान मुलांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक हातभार लागावे, यासाठी राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. मात्र जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख बघितल्यास अत्यंत बिकट अशी स्थिती दिसते. २०१४-१५ या वर्षात इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व व्यवस्थापनामधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत केवळ पाच टक्के विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे उत्तीर्ण होऊनही अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागल्याची माहिती समोर आली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात इयत्ता चौथी व सातवीच्या सर्व व्यवस्थापनामधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला जिल्ह्यातून तब्बल २३ हजार ६४३ विद्यार्थी बसले होते. यात चौथीचे १२ हजार ४९२ तर सातवीचे ११ हजार १५१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी १३ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ५६.७५ एवढी आहे. मात्र एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही केवळ ७७१ विद्यार्थीच शिष्यवृत्तीस पात्र ठरले. पूर्व प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी घेण्यात येत असलेल्या या शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या चवथीच्या विद्यार्थ्यांला तीन वर्षापर्यंत ५०० रूपये प्रती महिना व सातवीच्या विद्यार्थ्यास तीन वर्षांपर्यंत ७५० रूपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य खरेदी व इतर कामात आर्थिक मदत मिळते. मात्र जिल्ह्याच्या कोट्यानुसार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरत असल्याने अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होवूनही या शिष्यवृत्तीला मुकावे लागत असल्याची स्थिती आहे.