शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जिभेचे लाड थांबवा; तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST

रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी ...

रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी माहिती नसते. कोरोना असूनही बाहेर जेवायला जायचे म्हटले की सगळे एका पायावर तयार होतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या बाहेरच्या पदार्थांमध्ये तिखट, मसालेदार व चायनीजचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात तिखट पदार्थांचे प्रमाणही जास्त असल्याने अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे आयुर्वेदिक डॉ. श्रीकांत जोशी यांनी दिली. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरला जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, याकडे डॉ. खिरेंद्र गेडाम यांनी लक्ष वेधले.

काय आहेत लक्षणे

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजनात अचानक घट होणे

मळमळ वाटणे

खाज सुटणे

तोंडाला पोड येणे

काय काळजी घेणार?

अद्रक, तुळस, काळीमिरी हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. याचसोबत मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होऊ शकत नाही; परंतु इरिटिट बोवेल सिंड्रोम, डिस्पेपसिया किंवा दाहक आतड्यांचा रोग (आयबीडी) असल्यास सावधगिरी बाळगायला हवी. मसालेदार पदार्थांमुळे पोटदुखी देत असेल तर खाण्यापूर्वीच आपण विचार करावा. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करताना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. मंगेश रोहणकर यांनी दिला.

पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा

कोरोनामुळे अनेकांच्या घरातील दैनंदिन आहारात बदल झाला. ही जीवनशैली नेहमीकरिता स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे. १०० टक्के निर्बंध उठविल्यानंतर बाहेरचे चटपटीत व मसालेदार अन्न सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

- प्रा. प्रांजली सायंकार, आहारतज्ज्ञ, दादमहल वॉर्ड, चंद्रपूर

सर्वच वयोगटांतील व्यक्तींनी संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यातून शरीराच्या पोषणाची गरज भागेल. आहारात कडधान्ये, भाज्या आणि फळांचा समावेश केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. काहींना हे परवडणार नाही. मात्र, कोरोनाकाळात तरी सकस आहाराशिवाय पर्याय नाही.

-डॉ. भूपेश लाड, चंद्रपूर