शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिभेचे लाड थांबवा; तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST

रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी ...

रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी माहिती नसते. कोरोना असूनही बाहेर जेवायला जायचे म्हटले की सगळे एका पायावर तयार होतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या बाहेरच्या पदार्थांमध्ये तिखट, मसालेदार व चायनीजचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात तिखट पदार्थांचे प्रमाणही जास्त असल्याने अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे आयुर्वेदिक डॉ. श्रीकांत जोशी यांनी दिली. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरला जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, याकडे डॉ. खिरेंद्र गेडाम यांनी लक्ष वेधले.

काय आहेत लक्षणे

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजनात अचानक घट होणे

मळमळ वाटणे

खाज सुटणे

तोंडाला पोड येणे

काय काळजी घेणार?

अद्रक, तुळस, काळीमिरी हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. याचसोबत मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होऊ शकत नाही; परंतु इरिटिट बोवेल सिंड्रोम, डिस्पेपसिया किंवा दाहक आतड्यांचा रोग (आयबीडी) असल्यास सावधगिरी बाळगायला हवी. मसालेदार पदार्थांमुळे पोटदुखी देत असेल तर खाण्यापूर्वीच आपण विचार करावा. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करताना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. मंगेश रोहणकर यांनी दिला.

पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा

कोरोनामुळे अनेकांच्या घरातील दैनंदिन आहारात बदल झाला. ही जीवनशैली नेहमीकरिता स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे. १०० टक्के निर्बंध उठविल्यानंतर बाहेरचे चटपटीत व मसालेदार अन्न सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

- प्रा. प्रांजली सायंकार, आहारतज्ज्ञ, दादमहल वॉर्ड, चंद्रपूर

सर्वच वयोगटांतील व्यक्तींनी संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यातून शरीराच्या पोषणाची गरज भागेल. आहारात कडधान्ये, भाज्या आणि फळांचा समावेश केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. काहींना हे परवडणार नाही. मात्र, कोरोनाकाळात तरी सकस आहाराशिवाय पर्याय नाही.

-डॉ. भूपेश लाड, चंद्रपूर