शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

जिभेचे लाड थांबवा; तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST

रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी ...

रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी माहिती नसते. कोरोना असूनही बाहेर जेवायला जायचे म्हटले की सगळे एका पायावर तयार होतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या बाहेरच्या पदार्थांमध्ये तिखट, मसालेदार व चायनीजचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात तिखट पदार्थांचे प्रमाणही जास्त असल्याने अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे आयुर्वेदिक डॉ. श्रीकांत जोशी यांनी दिली. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरला जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, याकडे डॉ. खिरेंद्र गेडाम यांनी लक्ष वेधले.

काय आहेत लक्षणे

पोट दुखणे

उलट्या होणे

भूक मंदावणे

वजनात अचानक घट होणे

मळमळ वाटणे

खाज सुटणे

तोंडाला पोड येणे

काय काळजी घेणार?

अद्रक, तुळस, काळीमिरी हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. याचसोबत मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होऊ शकत नाही; परंतु इरिटिट बोवेल सिंड्रोम, डिस्पेपसिया किंवा दाहक आतड्यांचा रोग (आयबीडी) असल्यास सावधगिरी बाळगायला हवी. मसालेदार पदार्थांमुळे पोटदुखी देत असेल तर खाण्यापूर्वीच आपण विचार करावा. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करताना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. मंगेश रोहणकर यांनी दिला.

पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा

कोरोनामुळे अनेकांच्या घरातील दैनंदिन आहारात बदल झाला. ही जीवनशैली नेहमीकरिता स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे. १०० टक्के निर्बंध उठविल्यानंतर बाहेरचे चटपटीत व मसालेदार अन्न सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.

- प्रा. प्रांजली सायंकार, आहारतज्ज्ञ, दादमहल वॉर्ड, चंद्रपूर

सर्वच वयोगटांतील व्यक्तींनी संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यातून शरीराच्या पोषणाची गरज भागेल. आहारात कडधान्ये, भाज्या आणि फळांचा समावेश केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. काहींना हे परवडणार नाही. मात्र, कोरोनाकाळात तरी सकस आहाराशिवाय पर्याय नाही.

-डॉ. भूपेश लाड, चंद्रपूर