शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील माहिती तंत्रज्ञान पडले अडगळीत

By admin | Updated: January 28, 2015 23:13 IST

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, जगाची माहिती खेड्यातील शाळेत बघता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा

शंकर चव्हाण - जिवतीग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, जगाची माहिती खेड्यातील शाळेत बघता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला संगणक संच पुरविण्यात आले. मात्र संगणक पुरविणाऱ्या यंत्रणेकडून संगणकाचे संच हलक्या दर्जाचे व कमी किंमतीचे पुरविण्यात आल्याने अल्पश: कालावधीत बहुतांश शाळेतील संगणक बंद पडले आहेत. अनेक शाळांतील विद्युत पुरवठाच खंडीत असल्याने संगणक बंद स्वरूपात असून विद्यार्थ्यांना संगणक शिकविण्यास अडचण निर्माण होत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते. परिणामी संगणकीय युगातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संगणक शिकण्याचे स्वप्न अधुरे राहत असल्याची बाब ‘लोकमत’ने काही शाळांना भेट दिल्यानंतर उघडकीस आली. देशातील प्रत्येक क्षेत्रात आॅनलाईनचे जाळे पसरविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. शहरात प्रत्येकाला आॅनलाईनचे वेड लागले आहे. जगाची माहिती काही क्षणात पाहता येते. मात्र ग्रामीण भागातील शाळेत हलक्या दर्जाचे संगणक पुरवून त्यांची थट्टा केली जात आहे. बंद पडलेले संगणक आणि खंडीत विद्युत पुरवठा यामुळे शालेय विद्यार्थी आज संगणक शिकण्यापासून वंचित आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असता, संगणक शिकण्याची आवड आहे, मात्र शाळेत विद्युत पुरवठाच नाही मग आम्ही संगणक शिकणार कसे? असा सवाल विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. शाळा हे देशाची भावी पिढी सक्षम व सुदृढ करण्याचे एक माध्यम व ज्ञानमंदीर आहे. या मंदिरातून जसे विद्यार्थी घडवाल, तसेच ते घडतात. मात्र घडविण्याचे साधनच बंद असले की विद्यार्थी घडविणे कठीण होते. हिच परिस्थिती सध्या जिवती तालुक्यातील शाळांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिक अज्ञानी व आर्थिक कमकुवत असल्याने त्यांच्याकडे आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत शिकविण्याची त्यांची कुवत नाही. जेथे मुलगा शिकतो, तेथे ते कधी फिरकुनही पाहत नाहीत. माझा मुलगा शिकतो की नाही, त्यांना लिहिता वाचता येते का, हे विचारण्याची अशिक्षित पालक धाडस करीत नाही. म्हणूनच की काय शिक्षक आपली मनमानी चालवितो कधीही शाळेत जाणे कधीही येणे ही त्यांची सवय झाली आहे. अधिकारी महिन्यातून एकदा येतात. शाळा भेटी करतात आणि निघून जातात. पण शाळेतील विद्यार्थी शिकतो काय, त्यांना शिक्षण व्यवस्थीत व योग्य दिल्या जाते काय? अप्रगत प्रगत विद्यार्थी आहेत का? याची कधीही विचारपूस होत नाही.