शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शाळेतील माहिती तंत्रज्ञान पडले अडगळीत

By admin | Updated: January 28, 2015 23:13 IST

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, जगाची माहिती खेड्यातील शाळेत बघता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा

शंकर चव्हाण - जिवतीग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, जगाची माहिती खेड्यातील शाळेत बघता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला संगणक संच पुरविण्यात आले. मात्र संगणक पुरविणाऱ्या यंत्रणेकडून संगणकाचे संच हलक्या दर्जाचे व कमी किंमतीचे पुरविण्यात आल्याने अल्पश: कालावधीत बहुतांश शाळेतील संगणक बंद पडले आहेत. अनेक शाळांतील विद्युत पुरवठाच खंडीत असल्याने संगणक बंद स्वरूपात असून विद्यार्थ्यांना संगणक शिकविण्यास अडचण निर्माण होत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते. परिणामी संगणकीय युगातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संगणक शिकण्याचे स्वप्न अधुरे राहत असल्याची बाब ‘लोकमत’ने काही शाळांना भेट दिल्यानंतर उघडकीस आली. देशातील प्रत्येक क्षेत्रात आॅनलाईनचे जाळे पसरविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. शहरात प्रत्येकाला आॅनलाईनचे वेड लागले आहे. जगाची माहिती काही क्षणात पाहता येते. मात्र ग्रामीण भागातील शाळेत हलक्या दर्जाचे संगणक पुरवून त्यांची थट्टा केली जात आहे. बंद पडलेले संगणक आणि खंडीत विद्युत पुरवठा यामुळे शालेय विद्यार्थी आज संगणक शिकण्यापासून वंचित आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असता, संगणक शिकण्याची आवड आहे, मात्र शाळेत विद्युत पुरवठाच नाही मग आम्ही संगणक शिकणार कसे? असा सवाल विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. शाळा हे देशाची भावी पिढी सक्षम व सुदृढ करण्याचे एक माध्यम व ज्ञानमंदीर आहे. या मंदिरातून जसे विद्यार्थी घडवाल, तसेच ते घडतात. मात्र घडविण्याचे साधनच बंद असले की विद्यार्थी घडविणे कठीण होते. हिच परिस्थिती सध्या जिवती तालुक्यातील शाळांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिक अज्ञानी व आर्थिक कमकुवत असल्याने त्यांच्याकडे आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत शिकविण्याची त्यांची कुवत नाही. जेथे मुलगा शिकतो, तेथे ते कधी फिरकुनही पाहत नाहीत. माझा मुलगा शिकतो की नाही, त्यांना लिहिता वाचता येते का, हे विचारण्याची अशिक्षित पालक धाडस करीत नाही. म्हणूनच की काय शिक्षक आपली मनमानी चालवितो कधीही शाळेत जाणे कधीही येणे ही त्यांची सवय झाली आहे. अधिकारी महिन्यातून एकदा येतात. शाळा भेटी करतात आणि निघून जातात. पण शाळेतील विद्यार्थी शिकतो काय, त्यांना शिक्षण व्यवस्थीत व योग्य दिल्या जाते काय? अप्रगत प्रगत विद्यार्थी आहेत का? याची कधीही विचारपूस होत नाही.