शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गोवरी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 27, 2015 23:32 IST

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत

गोवरी : शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता खचला असून आर्थिक संकटात सापडला आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोल्डफील्डच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननानंतर निघालेली माती व त्यावर दिवसेंदिवस वाढणारे झुडुपी जंगल यामुळे याठिकाणी रानडुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात आढळतात. वेकोलिगत शेतकऱ्यांच्या शेती आहे. शेतात कापूस, तूर, हरभरा, गहू आदी पीक घेतले जात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणा व शेतमालाच्या दरवाढी संदर्भात मायबाप सरकारने दाखविलेली उदासिनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हादरुन गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला. निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. दुबार- तिबार पेरणी करून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, बाबापूर परिसरात वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमााणात झुडपी जंगलामुळे रानडुकरांचे कळप आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. वेकोलिने मातीच्या ढिगाऱ्यावरील झुडपी जंगल नष्ट करावे, अशी मागणी अनेकदा गावकऱ्यांनी वेकोलिकडे केली होती. मात्र वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यावर व्यापलेले झुडपी जंगल दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रानडुकरांमुळे बळीराजा वैतागला आहे. त्यामुळे वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोवरी येथील शेतकरी नामदेव जुनघरी, नामदेव देवाळकर, मारोती लोहे, भास्कर जुनघरी, भाऊराव रणदिवे, प्रमोद लांडे, सुनील देवाळकर यांनी केली आहे. (वार्ताहर)