शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

गोवरी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ

By admin | Updated: January 27, 2015 23:32 IST

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत

गोवरी : शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत रानडुकरांचे कळप धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहे. एका रात्रीतून शेतात उभे असलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता खचला असून आर्थिक संकटात सापडला आहे.राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेस्टर्न कोल्डफील्डच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा उत्खननानंतर निघालेली माती व त्यावर दिवसेंदिवस वाढणारे झुडुपी जंगल यामुळे याठिकाणी रानडुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात आढळतात. वेकोलिगत शेतकऱ्यांच्या शेती आहे. शेतात कापूस, तूर, हरभरा, गहू आदी पीक घेतले जात. यावर्षी निसर्गाचा लहरीपणा व शेतमालाच्या दरवाढी संदर्भात मायबाप सरकारने दाखविलेली उदासिनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हादरुन गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस झाला. निसर्गाने ऐनवेळी दगा दिल्याने शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. दुबार- तिबार पेरणी करून शेतीवर अतोनात खर्च केला. मात्र उत्पादनापेक्षा खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, चिंचोली, बाबापूर परिसरात वेकोलिने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमााणात झुडपी जंगलामुळे रानडुकरांचे कळप आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. वेकोलिने मातीच्या ढिगाऱ्यावरील झुडपी जंगल नष्ट करावे, अशी मागणी अनेकदा गावकऱ्यांनी वेकोलिकडे केली होती. मात्र वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्यावर व्यापलेले झुडपी जंगल दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रानडुकरांमुळे बळीराजा वैतागला आहे. त्यामुळे वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गोवरी येथील शेतकरी नामदेव जुनघरी, नामदेव देवाळकर, मारोती लोहे, भास्कर जुनघरी, भाऊराव रणदिवे, प्रमोद लांडे, सुनील देवाळकर यांनी केली आहे. (वार्ताहर)