शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे स्वच्छता अभियानाच्या उद्देशाला मुठमाती

By admin | Updated: December 26, 2016 01:18 IST

केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला.

सुधारणांची गरज : गरीबच शौचालय अनुदानापासून वंचित आशिष देरकर कोरपना केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला. मात्र जाचक अटींमुळे या योजनेला खीळ बसली असून शौचालय बांधायला अनुदानाची गरज असलेल्या गरिबांनाच शौचालय अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय नियमानुसार यापूर्वी ज्या लोकांनी शौचालय योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांना दुसऱ्यांदा लाभ घेता येत नाही. यामध्ये घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्यांनाही शौचालयाचे अनुदान घेता येणार नाही. कारण घरकुलमध्ये शौचालयाचे अनुदान समाविष्ठ होते आणि सोबतच शौचालय बांधायचे होते. मात्र यापूर्वी अनेक लोकांनी १८ हजार रुपयांच्या अनुदानापासून घरकुल घेतले. १८ हजार रुपयात घरासह शौचालय कसे बांधायचे, हा प्रश्न लोकांसमोर होता. त्यामुळे अनेकांनी तेव्हा शौचालय बांधले नाही. अशीच अवस्था ८५ हजार व ९५ हजार रुपयांच्या घरकुलांचीसुद्धा आहे. काही लोकांनी घरकुलातील शौचालय न बांधल्यामुळे त्यांचे अनुदानसुद्धा शासनाने दिले नाही. मात्र १२ हजार रुपये अनुदानाच्या योजनेत घरकुलाचा लाभ घेतलेल्या लोकांचासुद्धा समावेश आवश्यक आहे. कारण गावा-गावात घरकुल असणाऱ्या लोकांचेच बाहेर शौचास जाण्याचे प्रमाण जास्त आहे. उघड्यावर शौचाला बसू नये, हा स्वच्छ भारत मिशनचा उदेश आहे. मात्र घरकुल असून शौचालय नसणाऱ्या गरिबांना अनुदान नसल्यामुळे या योजनेला खीळ बसत आहे. १०० टक्के हागणदारी मुक्तीचा उद्देश सपशेल अयशस्वी होताना दिसत आहे. एवढेच नाही तर ज्यांनी याअगोदर शौचालयासाठी ५०० रुपये व १२०० रुपये अनुदान उचलले आहे अशांना पण शौचालय अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. ५०० व १२०० रुपये त्यावेळी बक्षीस म्हणून दिल्या जात होते. मात्र आता बक्षीस म्हणून मिळणाऱ््या १२ हजार रुपयात शौचालयाचे बांधकाम होते इतकी तफावत दोन्ही रकमेमध्ये आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा सर्व कुटुंबांचा समावेश या योजनेत व्हायला पाहिजे. २-३ वषार्पूर्वी ५०० रुपये व १२०० रुपयात लोकांनी तात्पुरते शौचालय बांधकाम केले. मात्र आता त्यांचे शौचालय अस्तित्वात नाही. त्यामुळे शौचालयाचा पंचनामा करून अशाही लोकांना शौचालय योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी गावागावातून होत आहे. अन्यथा स्वच्छ भारत मिशन यशस्वी होईल, याची शाश्वती नाही. ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीने अनुदान द्यावे शौचालयाचे अनुदान सरळ-सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. २६ जानेवारीपर्यंत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ग्रामपंचायतींना दिले आहे. १२ हजार रुपयांच्या अनुदानात शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी स्वत: बांधकाम करण्यास तयार नाही. अशावेळी ग्रामपंचायत कंत्राटदाराला काम देऊन बांधकाम पूर्ण करू शकतो. मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात आॅनलाईन जमा होत असल्याने लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करणे ही तारेवरची कसरत ठरत आहे. म्हणून शासनाने ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीने अनुदान द्यावे, अशी मागणी ग्रामपंचायती करीत आहे. बेसलाईन सर्वेमध्ये चुका शासनाने २०१२ मध्ये बेसलाईन सर्व्हे केला. या बेसलाईन सर्व्हे त्यावेळी ग्रामपंचायतींकडून गांभीर्याने घेतला गेले नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे शौचालय नाही अशांच्या घरी होय दर्शविले आहे. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांच्या घरी नाही दर्शविले आहे. त्यामुळे शौचालय बांधकामाचे लक्ष पूर्ण होताना दिसत नाही. आणि गरजू लाभापासून वंचित राहत आहे. बेसलाईनमधील चुका ग्रामसभेच्या माध्यमातून दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांपेक्षा शौचालय जास्त अनेक ग्रामपंचायतींना दिलेल्या शौचालय बांधकाम उद्देशानुसार विचार केल्यास शौचालय मंजुरीपेक्षा लाभार्थी कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे नवीन लाभार्थ्यांची ग्रामसभेच्या माध्यमातून निवड करून दिल्यास शासनाने मंजुरी द्यायला पाहिजे. यामुळे योजना यशस्वी होऊ शकेल. घरकुल अनुदानातून ज्या लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नाही व ज्यांनी-ज्यांनी शौचालयाचे अनुदान उचलले नाही, अशा लाभार्थ्यांचे पंचायत समितीला रेकार्ड आहे. शौचालयाचे अनुदान बाकी असल्यास अशा लोकांना नव्याने शौचालय देता येतील. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतींना लोकांच्या सहकार्याची गरज आहे. - संदीप घोन्सिकर, गटविकास अधिकारी, पं.स. कोरपना