शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

जिल्ह्यात फळबाग लागवडीला देणार चालना

By admin | Updated: September 12, 2016 00:44 IST

जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

एमआरईजीएसचा लाभ : २०१५-१६मध्ये फळ पिकांखाली १३७ हेक्टर क्षेत्रचंद्रपूर : जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही लागवड शेतीमध्ये सलग करण्याऐवजी बांधावर, शेततळे आदी जेथे जागा उपलब्ध होईल, तेथे करण्यात येत आहे. २०१५-१६मध्ये १३७ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यावर्षी एमआरईजीएसमधून ३० नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड केली जाणार आहे.यापूर्वी राज्यात रोजगार हमी योजना कार्यान्वित होती. केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करून १०० दिवस रोजगार देण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या योजनेला जोड देऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. त्याअंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनी कृषी सहायकनिहाय १० हेक्टरमध्ये एमआरईजीएसअंतर्गत फळ झाडे लागवड करण्याचे ठरविले आहे.फळबाग योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, पेरू, केळी, आंबा, पपई, आवळा, सीताफळ आदींची लागवड करण्यात येत आहे. ही फळ झाडे खासगी रोपवाटिका, किसान नर्सरी आदीमधून रोपे घेऊन करण्यात येत आहे. एमआरईजीएसअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि जॉब कार्डधारक लोकांना फळ झाडे लावण्याचे काम देण्यात येत आहे. त्यानंतर एमआरईजीएसच्या निकषानुसार, वेतन देण्यात येत आहे. रोजंदार मजुरामार्फत काम करण्यात येत असल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. शासनाकडून रोपांचा पुरवठा करण्यात येतो आणि ते रोपे लावण्याचे काम मजुरांवर सोपविण्यात येते. आधी रोजगगार हमी योजनेत कृषी विभागाची यंत्रणा फळबाग लागवड करीत असे. सलग शेती क्षेत्रात ही लागवड कृषी विभागामार्फत केली जात असे. त्याकरिता १०० अनुदानावर रोपांचा पुरवठा केला जात असे. शेतकऱ्यांना फळबाग विकसित करण्यास सांगण्यात येत असे. एमआरईजीएसमध्ये सलग शेती क्षेत्राची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतीचा बांध, शेततळे आदी जागेवरही ही फळ झाडे लावण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)आंबा, चिकूची लागवडकृषी विभागातर्फे २०१५-१६ मध्ये १३७ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३९.५० हेक्टरमध्ये कागदी लिंबाची लागवड करण्यात आली. त्यानंतर आंबा कलमे २७ हेक्टर, पपई १७ हेक्टर, पेरू १७.४० हेक्टर, मोसंबी ४ हेक्टर, चिकू ८ हेक्टर, डाळींब ०.६० हेक्टर, केळी १.५ हेक्टर, आवळा १० हेक्टर आणि सीताफळाची १२ हेक्टरवर लागवड करण्यात येत आहे.३३८६ हेक्टरचे उद्दिष्टमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत एक कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात ३३८६.९१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये आंबा, चिकू, साग, शेवगा, संत्रा आणि कोरववाहू फळांचा समावेश राहणार आहे. ही फळ झाडे मजुरांना वेतन देऊन लावण्यात येणार आहेत. त्याकरिता सलग क्षेत्राची गरज नाही.ईजीएसची प्रतीक्षाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ६७.७१ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यास १०० टक्के अनुदानावर रोपांचा पुरवठा करण्यात येईल.