शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

जिल्ह्यात फळबाग लागवडीला देणार चालना

By admin | Updated: September 12, 2016 00:44 IST

जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

एमआरईजीएसचा लाभ : २०१५-१६मध्ये फळ पिकांखाली १३७ हेक्टर क्षेत्रचंद्रपूर : जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध असला तरी आता फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही लागवड शेतीमध्ये सलग करण्याऐवजी बांधावर, शेततळे आदी जेथे जागा उपलब्ध होईल, तेथे करण्यात येत आहे. २०१५-१६मध्ये १३७ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यावर्षी एमआरईजीएसमधून ३० नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड केली जाणार आहे.यापूर्वी राज्यात रोजगार हमी योजना कार्यान्वित होती. केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करून १०० दिवस रोजगार देण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र शासनाच्या योजनेला जोड देऊन महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. त्याअंतर्गत राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हसनाबादे यांनी कृषी सहायकनिहाय १० हेक्टरमध्ये एमआरईजीएसअंतर्गत फळ झाडे लागवड करण्याचे ठरविले आहे.फळबाग योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात मोसंबी, कागदी लिंबू, चिकू, पेरू, केळी, आंबा, पपई, आवळा, सीताफळ आदींची लागवड करण्यात येत आहे. ही फळ झाडे खासगी रोपवाटिका, किसान नर्सरी आदीमधून रोपे घेऊन करण्यात येत आहे. एमआरईजीएसअंतर्गत नोंदणी केलेल्या आणि जॉब कार्डधारक लोकांना फळ झाडे लावण्याचे काम देण्यात येत आहे. त्यानंतर एमआरईजीएसच्या निकषानुसार, वेतन देण्यात येत आहे. रोजंदार मजुरामार्फत काम करण्यात येत असल्याने शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. शासनाकडून रोपांचा पुरवठा करण्यात येतो आणि ते रोपे लावण्याचे काम मजुरांवर सोपविण्यात येते. आधी रोजगगार हमी योजनेत कृषी विभागाची यंत्रणा फळबाग लागवड करीत असे. सलग शेती क्षेत्रात ही लागवड कृषी विभागामार्फत केली जात असे. त्याकरिता १०० अनुदानावर रोपांचा पुरवठा केला जात असे. शेतकऱ्यांना फळबाग विकसित करण्यास सांगण्यात येत असे. एमआरईजीएसमध्ये सलग शेती क्षेत्राची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतीचा बांध, शेततळे आदी जागेवरही ही फळ झाडे लावण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)आंबा, चिकूची लागवडकृषी विभागातर्फे २०१५-१६ मध्ये १३७ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्यात येत आहे. त्यामध्ये सर्वाधिक ३९.५० हेक्टरमध्ये कागदी लिंबाची लागवड करण्यात आली. त्यानंतर आंबा कलमे २७ हेक्टर, पपई १७ हेक्टर, पेरू १७.४० हेक्टर, मोसंबी ४ हेक्टर, चिकू ८ हेक्टर, डाळींब ०.६० हेक्टर, केळी १.५ हेक्टर, आवळा १० हेक्टर आणि सीताफळाची १२ हेक्टरवर लागवड करण्यात येत आहे.३३८६ हेक्टरचे उद्दिष्टमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत एक कृषी सहायकनिहाय १० हेक्टरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात ३३८६.९१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये आंबा, चिकू, साग, शेवगा, संत्रा आणि कोरववाहू फळांचा समावेश राहणार आहे. ही फळ झाडे मजुरांना वेतन देऊन लावण्यात येणार आहेत. त्याकरिता सलग क्षेत्राची गरज नाही.ईजीएसची प्रतीक्षाजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ६७.७१ हेक्टरमध्ये फळबाग लागवड करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्या प्रस्तावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. तो प्रस्ताव मंजूर झाल्यास १०० टक्के अनुदानावर रोपांचा पुरवठा करण्यात येईल.