शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४०० मेट्रिक टन निंबोळी अर्क तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:41 IST

गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देकृषी विभागाची मोहीम । पिकांवरील कीडनियंत्रणासाठी जहाल औषधांऐवजी सेंद्रिय फवारणी करण्यास प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अशा घटना यंदाच्या हंगामात घडू नये, यासाठी विभागीय कृषी कार्यालयाने जिल्ह्याला ४०० मेट्रीक टन निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट्य दिले. कृषी विभागाने निंबोळी गोळी तयार करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये शेतकरी सहभागी झाले आहेत.जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कोरपना, राजुरा, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यातील कापूस, सोयाबिन पिकांवर विविध कींडींचा प्रादूर्भाव झाला होता. शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी आरोग्याची काळजी न घेता जहाल औषधांचा सर्रास वापर केला. त्यामुळे शेतकºयांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाल्याच्या घटना घडल्या. यवतमाळ जिल्ह्यातील २२ शेतकरी विषबाधेने दगावले. जिवती व कोरपना तालुक्यातील काही शेतकºयांना जहाल औषधांची लागण झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले होते. यंदा हा प्रकार घडू नये, याकरिता कीडनिवारणासाठी निंबोळी अर्काच्या फवारणी करण्यास शेतकºयांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय विभागीय कृषी कार्यालयाने घेतला. त्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट दिले. चंद्रपूर जिल्ह्याकरिता ४०० मेट्रीक टन निबोंळी अर्क तयार करण्यात येणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी यासंदर्भात आदेश जारी केला. त्यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय गावामध्ये मोहीम सुरू करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मोहीम अधिकारी शेतकºयांना निंबोळी अर्काचे महत्त्व समजावून सांगत आहेत. कीडीचे लक्षणे दिसल्यास शेतकºयांनी थेट रासायनिक औषधांची फवारणी न करता सेंद्रिय फवारणीचा पर्याय स्वीकारावा, हे समजावून सांगण्यात येत आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकºयांना शिवारातच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. शेतकºयांनी संभाव धोका लक्षात घेऊ न या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी दर्शविला आहे.अशी घ्यावी दक्षतानिंबोळी अर्कापासून गोळी तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. कीडनियंत्रणासाठी घटक कोणते, त्याचा वापर कसा करावा, पीकनिहाय संभाव्य रोग याविषयी कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. गतवर्षी जागृतीअभावी रासायनिक फवारणीचा अतिरेकी वापर झाला होता. फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळी अर्कापासून द्रावण तयार करावे. परंतु हे द्रावण तयार करून साठवून ठेवू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.सेंद्रिय शेतमालास प्राधान्यनिंबोळी अर्काच्या फवारणीमुळे केवळ कीडींचे नियंत्रण होत नाही तर सेंद्रिय शेतमाल उत्पादनाला चालना मिळते. आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी फवारणी पिकांच्या वाढीला पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांनी कीडनाशक द्रव तयार करणाºया कंपन्यांच्या भुलथापांना बळी न पडता सेंद्रीय शेतमालाला पूरक निंबोळी अर्काची फवारणी करावी, अधिकाºयांंचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.