शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

४०० मेट्रिक टन निंबोळी अर्क तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:41 IST

गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देकृषी विभागाची मोहीम । पिकांवरील कीडनियंत्रणासाठी जहाल औषधांऐवजी सेंद्रिय फवारणी करण्यास प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अशा घटना यंदाच्या हंगामात घडू नये, यासाठी विभागीय कृषी कार्यालयाने जिल्ह्याला ४०० मेट्रीक टन निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट्य दिले. कृषी विभागाने निंबोळी गोळी तयार करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये शेतकरी सहभागी झाले आहेत.जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कोरपना, राजुरा, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यातील कापूस, सोयाबिन पिकांवर विविध कींडींचा प्रादूर्भाव झाला होता. शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी आरोग्याची काळजी न घेता जहाल औषधांचा सर्रास वापर केला. त्यामुळे शेतकºयांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाल्याच्या घटना घडल्या. यवतमाळ जिल्ह्यातील २२ शेतकरी विषबाधेने दगावले. जिवती व कोरपना तालुक्यातील काही शेतकºयांना जहाल औषधांची लागण झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले होते. यंदा हा प्रकार घडू नये, याकरिता कीडनिवारणासाठी निंबोळी अर्काच्या फवारणी करण्यास शेतकºयांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय विभागीय कृषी कार्यालयाने घेतला. त्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट दिले. चंद्रपूर जिल्ह्याकरिता ४०० मेट्रीक टन निबोंळी अर्क तयार करण्यात येणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी यासंदर्भात आदेश जारी केला. त्यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय गावामध्ये मोहीम सुरू करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मोहीम अधिकारी शेतकºयांना निंबोळी अर्काचे महत्त्व समजावून सांगत आहेत. कीडीचे लक्षणे दिसल्यास शेतकºयांनी थेट रासायनिक औषधांची फवारणी न करता सेंद्रिय फवारणीचा पर्याय स्वीकारावा, हे समजावून सांगण्यात येत आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकºयांना शिवारातच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. शेतकºयांनी संभाव धोका लक्षात घेऊ न या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी दर्शविला आहे.अशी घ्यावी दक्षतानिंबोळी अर्कापासून गोळी तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. कीडनियंत्रणासाठी घटक कोणते, त्याचा वापर कसा करावा, पीकनिहाय संभाव्य रोग याविषयी कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. गतवर्षी जागृतीअभावी रासायनिक फवारणीचा अतिरेकी वापर झाला होता. फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळी अर्कापासून द्रावण तयार करावे. परंतु हे द्रावण तयार करून साठवून ठेवू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.सेंद्रिय शेतमालास प्राधान्यनिंबोळी अर्काच्या फवारणीमुळे केवळ कीडींचे नियंत्रण होत नाही तर सेंद्रिय शेतमाल उत्पादनाला चालना मिळते. आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी फवारणी पिकांच्या वाढीला पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांनी कीडनाशक द्रव तयार करणाºया कंपन्यांच्या भुलथापांना बळी न पडता सेंद्रीय शेतमालाला पूरक निंबोळी अर्काची फवारणी करावी, अधिकाºयांंचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.