शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

शेतकरी आत्महत्येची नऊ प्रकरणे मंजूर

By admin | Updated: March 2, 2015 01:07 IST

शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण शोधत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.

वरोरा: शेतकरी आत्महत्या करण्याचे कारण शोधत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी याकरिता जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये शेतकरी आत्महत्येचे १० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील नऊ प्रकरणे पात्र ठरली तर एक प्रकरण अपात्र ठरवण्यात आले. गत दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात वरोरा तालुक्यातील अभिमन कानुजी काळे बोरगाव (दे.), दशरथ नथ्यू नागरकर निमसडा, संतोष नारायण नक्षीणे पिजदुरा, ब्रह्मपुरी तालुक्यातील शंकर श्रीराम शेंडे चोरगाव, बालाजी शिवराम वनकर ब्रह्मपुरी, मुर्लीधर ऋषी चिमूरकर हळदा, सुनील बक्षिजी ठोरे, राजेंद्र निवृत्त गायकवाड जिवती, महादेव दशरथ नन्नावरे तळोधी ता. चिमूर, सुभाष वासुदेव भोगेकर धानापूर ता. गोंडपिपरी अशा १० शेतकऱ्यांची प्रकरणे समिती समोर ठेवण्यात आली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांवर बँकाचे व खाजगी रित्या मोठ्या प्रमाणात कर्ज होते. सततची नापिकी यामुळे त्यांनी आपले जिवन संपविल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येते. परंतु, त्यांच्याकडील कर्ज हप्त्याने भरावे लागणार आहे. ब्रह्मपुरी येथील बालाजी बनकर या शेतकऱ्यांचे प्रकरण अपात्र ठरले आले असून पात्र ठरलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने मदत केली जाणार आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती ठार झाल्यास आठ लाख रुपये दिले जाते. सततची नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्या होत असून आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत अत्यल्प आहे. यामध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)