शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

जिल्हाभर पेरणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:29 IST

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली आहे. शेतजमिनी ओल्या झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतकरी पुन्हा शेतात रमायला लागला असून पावसाने अशीच साथ दिली तर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखावून जाणार आहे.

ठळक मुद्देजलस्रोतांमध्येही वाढ : दमदार पावसामुळे शेतकरी लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली आहे. शेतजमिनी ओल्या झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतकरी पुन्हा शेतात रमायला लागला असून पावसाने अशीच साथ दिली तर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखावून जाणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. आणि बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यानंतर शेतकऱ्यांच्या छातीतील धडधड वाढली होती. साधारणता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र यावेळी जून महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी पावसाला सुरुवात झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली. दरम्यान, २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यानंतर काही शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. काहींनी धूळ पेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. कृषी विभागाने बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करू नये, असा सल्ला दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी आपल्या पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या.प्रारंभी हवामान खात्याने १७ जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र मधल्या काही दिवसात ‘वायू’ नामक चक्रीवादळ आले. त्याने मान्सूनची प्रगती रोखून धरली. त्यामुळे मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर गेले. यादरम्यान सूर्यानेही आपली आग ओकणे सुरूच ठेवले. त्यामुळे ग्रामीण भागातील जलस्रोत झपाट्याने आटू लागले. खरीप हंगामाची सुरुवात व्हायची, त्या दिवसात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. ज्यांनी २० जूननंतर पेरण्या केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.अशातच गुरुवार, शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात दमदार पाऊस झाला. या चार दिवसात सूर्याची किरणं फारच कमी वेळासाठी पहायला मिळाली. ढगाळ वातावरण व कधी रिमझिम पाऊस पडत राहिला. यामुळे ग्रामीण भागातील तलाव, बोड्या व इतर जलस्रोत पाणी जमा होऊ लागले. जमिनीतही पाणी मुरुन जमीन ओली झाली. त्यामुळे आतापर्यंत खोळंबून असलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा धडाक्यात प्रारंभ झाला आहे. शेतकºयांची धावपळ सुरू झाली असून शेतकरी शेतात रमू लागला आहे.कोरपना, जिवती, राजुरा या भागात कापसाची पेरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी सोयाबीनची पेरणी करीत आहेत. यासोबतच मूल, सिंदेवाही, नागभीड, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी या भागात धानाची पेरणी सुरू झाली आहे. या आठवड्यात ५० ते ६० टक्के पेरण्या आटोपतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.साडेचार लाखांवर खरीपाची लागवडजिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि धान हे खरीपातील प्रमुख पीक आहे. मागील वर्षी चार लाख ४७ हजार हेक्टरवर कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले होते. मात्र यापैकी कमी हेक्टरवर खरिपाची लागवड झाली. यावर्षी चार लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पाऊस बºयापैकी पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे यावर्षी खरिपातील लागवड क्षेत्र वाढेल, अशी शक्यता आहे.