शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर पेरणीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:29 IST

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली आहे. शेतजमिनी ओल्या झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतकरी पुन्हा शेतात रमायला लागला असून पावसाने अशीच साथ दिली तर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखावून जाणार आहे.

ठळक मुद्देजलस्रोतांमध्येही वाढ : दमदार पावसामुळे शेतकरी लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये वाढ झाली आहे. शेतजमिनी ओल्या झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे. शेतकरी पुन्हा शेतात रमायला लागला असून पावसाने अशीच साथ दिली तर यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखावून जाणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांची उपजिविका शेतीवर अवलंबून आहे. आणि बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यानंतर शेतकऱ्यांच्या छातीतील धडधड वाढली होती. साधारणता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र यावेळी जून महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी पावसाला सुरुवात झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली. दरम्यान, २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यानंतर काही शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. काहींनी धूळ पेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. कृषी विभागाने बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करू नये, असा सल्ला दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी आपल्या पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या.प्रारंभी हवामान खात्याने १७ जूनपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र मधल्या काही दिवसात ‘वायू’ नामक चक्रीवादळ आले. त्याने मान्सूनची प्रगती रोखून धरली. त्यामुळे मान्सूनचे आगमन आणखी लांबणीवर गेले. यादरम्यान सूर्यानेही आपली आग ओकणे सुरूच ठेवले. त्यामुळे ग्रामीण भागातील जलस्रोत झपाट्याने आटू लागले. खरीप हंगामाची सुरुवात व्हायची, त्या दिवसात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. ज्यांनी २० जूननंतर पेरण्या केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.अशातच गुरुवार, शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात दमदार पाऊस झाला. या चार दिवसात सूर्याची किरणं फारच कमी वेळासाठी पहायला मिळाली. ढगाळ वातावरण व कधी रिमझिम पाऊस पडत राहिला. यामुळे ग्रामीण भागातील तलाव, बोड्या व इतर जलस्रोत पाणी जमा होऊ लागले. जमिनीतही पाणी मुरुन जमीन ओली झाली. त्यामुळे आतापर्यंत खोळंबून असलेल्या पेरणीच्या कामांना पुन्हा धडाक्यात प्रारंभ झाला आहे. शेतकºयांची धावपळ सुरू झाली असून शेतकरी शेतात रमू लागला आहे.कोरपना, जिवती, राजुरा या भागात कापसाची पेरणी सुरू झाली आहे. काही ठिकाणी शेतकरी सोयाबीनची पेरणी करीत आहेत. यासोबतच मूल, सिंदेवाही, नागभीड, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी या भागात धानाची पेरणी सुरू झाली आहे. या आठवड्यात ५० ते ६० टक्के पेरण्या आटोपतील असा कृषी विभागाचा अंदाज आहे.साडेचार लाखांवर खरीपाची लागवडजिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि धान हे खरीपातील प्रमुख पीक आहे. मागील वर्षी चार लाख ४७ हजार हेक्टरवर कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले होते. मात्र यापैकी कमी हेक्टरवर खरिपाची लागवड झाली. यावर्षी चार लाख ५० हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पाऊस बºयापैकी पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे यावर्षी खरिपातील लागवड क्षेत्र वाढेल, अशी शक्यता आहे.