शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश

By admin | Updated: June 18, 2017 00:35 IST

राज्यामध्ये ग्राहक चळवळ व या संदर्भातील कायदे सक्षम आहेत. मात्र पुरेशी प्रसिद्धी आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीमध्ये सातत्य आल्यास ग्राहकांना उत्तम सुविधा मिळेल.

चंद्रपुरात बैठक : राज्य ग्राहक सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांनी घेतला आढावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यामध्ये ग्राहक चळवळ व या संदर्भातील कायदे सक्षम आहेत. मात्र पुरेशी प्रसिद्धी आणि प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीमध्ये सातत्य आल्यास ग्राहकांना उत्तम सुविधा मिळेल. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य ग्राहक सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केले.जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवनात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अन्न व प्रशासन, शिक्षण, आरोग्य, परिवहन, सार्वजनिक वितरण आदी विविध विभागांचा आढावा घेतला. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायदा, राईट टू सर्व्हिस अ‍ॅक्ट या संदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली. वर्षातून किमान दोन बैठका अध्यक्षांच्या नेतृत्वात व्हाव्यात व समितीच्या मार्फत येणाऱ्या तक्रारी आणि सूचनांचे निरसन काटेकोरपणे करण्यात यावे. यासाठी प्रशासनाने हयगय करु नये, असे अरुण देशपांडे यांनी सांगितले.सरकारी रुग्णालयामध्ये प्रसूती व अन्य आरोग्य तपासणीसाठी नागरिकांचा कल वाढावा आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते व सुजान नागरिकांनी लक्ष वेधावे असे आवाहन त्यांनी केले. शालेय पोषण आहाराचा पुरवठा नियमित व्हावा, शाळेमध्ये टीसी देण्यासाठी कोणत्याच परिस्थीत शुल्क आकारल्या जावू नये, शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये वाढ व्हावी तसेच पुस्तके, गणवेश यासाठी शाळांनी नेमक्या दुकानांची अनिवार्यता लादू नये, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. नियमांना न जुमानणाऱ्या शाळांवर कार्यवाही करण्यात यावी, रेशन कार्डमधील पारदर्शता, रेशन कार्ड आधार कार्डला जोडणे, बायोमेट्रीक मशीनचा वितरणात वापर, आदी वितरण व्यवस्थेतील बदलावरही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, सुधीर मिसार व ग्राहक चळवळीतील सदस्य उपस्थित होते.हॉटेलची तक्रार करण्यासाठी व्यवस्था हवी शहरातील सर्व हॉटेलमध्ये खाद्य पदार्थाविषयी तक्रारी असल्यास सामान्य नागरिकांना लगेच तक्रार करता येईल, यासाठी दर्शनी भागामध्ये ग्राहकांसाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री नंबर लावणे बंधनकारक करावे, असे, निर्देश त्यांनी दिले. याशिवाय प्रत्येक परवानाधारक हॉटेलमध्ये शुध्द पाण्याचा पुरवठा करणे संबंधीत हॉटेल, रेस्टारेंट यांना बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही केली जाते. तेव्हा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत याबाबतची माहिती पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले. बर्फ उद्योगांवर कारवाई कराजिल्ह्यातील बहुतांश बर्फ उद्योग करणारे व्यवसायिक यांच्याकडे अखाद्य बर्फ निर्मिती या गटात उत्पादन केले जाते. त्यामुळे अशा बर्फ उद्योग समुहाकडून तयार झालेला बर्फ वापरणाऱ्या हात ठेलेधारक, हॉटेल व्यवसायिक यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी केले.