शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
4
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
5
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
6
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
7
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
8
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
9
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
13
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
14
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
15
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
16
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
17
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
18
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
19
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
20
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!

गाईडलाईनसाठी आग्रही भूमिका

By admin | Updated: July 3, 2014 23:28 IST

रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला दिलेली ४ जी केबल टाकण्याची परवानगी व टॉवर्स उभारणी प्रकरण चांगलेच गाजत आहे. मनपा प्रशासन याबाबत सकारात्मक आहे तर मनपाच्याच नगरसेवकांचा याला

चंद्रपूर: रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला दिलेली ४ जी केबल टाकण्याची परवानगी व टॉवर्स उभारणी प्रकरण चांगलेच गाजत आहे. मनपा प्रशासन याबाबत सकारात्मक आहे तर मनपाच्याच नगरसेवकांचा याला विरोध आहे. या पार्श्वभूमिवर आज गुरुवारी महानगरपालिकेने शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी असोसिएशन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अभ्यासू नागरिकांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत सर्वांनी टॉवर्स उभारताना ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. असे न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला.महानगरपालिकेच्या २९ मेच्या आमसभेत रिलायन्स जीओला शहरात ४ जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्याची परवागनी देण्यात आली. प्रारंभी कोणत्याही नगरसेवकांनी याला विरोध दर्शविला नाही. मात्र त्यानंतर याला नगरसेवकांकडून विरोध होऊ लागला. खुद्द सत्ताधारी काँग्रेसच्याच नगरसेवकांनी याविरोधात बंड पुकारले. भाजपाच्याही नगरसेवकांनी त्यांना समर्थन देत रिलायन्स जीओला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमिवर ३० जूनला झालेली आमसभा याच मुद्यावरून चांगलेच गाजली. या प्रकारामुळे महापालिकेतील काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आली. सध्या या विषयाकडे हॉट विषय म्हणून बघितले जात आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने रिलायन्स जीओच्या ४ जी केबल प्रत्यारोपण, टॉवर्सची उभारणी, यामुळे मानवी आरोग्यावर कितपत धोका होऊ शकतो, हे तपासून बघण्याकरिता शहरातील सामाजिक संस्थांना व अभ्यासू नागरिकांना चर्चेसाठी पाचारण केले. आज सायंकाळी ही चर्चा झाली. यावेळी महापौर संगिता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रितेश तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर, उपायुक्त राजेश मोहिते, ग्रिन प्लॅनेटचे प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे बंडू धोतरे, प्रहारचे पप्पू देशमुख, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. टेलीकम्युनिकेशन विभाग, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, केंद्र व महाराष्ट्र शासनाने टॉवर्स उभारणीसाठी काही गाईड लाईन दिल्या आहेत. याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असेल तरच टॉवर्स उभारा, अशी भूमिका सर्व सामाजिक संस्थांनी यावेळी घेतली. दवाखाना, शाळा-कॉलेज, वृध्दाश्रम आदींच्या जवळ टॉवर असू नये, शिवाय ७० टक्के नागरिकांचा आक्षेप असेल त्या ठिकाणीही टॉवर्स उभारू नये, असेही यावेळी सांगण्यात आले. ४ जी केबलच्या टॉवर्सचा मानवी आरोग्यावर परिणाम होतोच, हे स्पष्ट करताना संस्थांनी हा परिणाम कमितकमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)