शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

गाईडलाईनसाठी आग्रही भूमिका

By admin | Updated: July 3, 2014 23:28 IST

रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला दिलेली ४ जी केबल टाकण्याची परवानगी व टॉवर्स उभारणी प्रकरण चांगलेच गाजत आहे. मनपा प्रशासन याबाबत सकारात्मक आहे तर मनपाच्याच नगरसेवकांचा याला

चंद्रपूर: रिलायन्स जीओ इन्फोकॉम लि. कंपनीला दिलेली ४ जी केबल टाकण्याची परवानगी व टॉवर्स उभारणी प्रकरण चांगलेच गाजत आहे. मनपा प्रशासन याबाबत सकारात्मक आहे तर मनपाच्याच नगरसेवकांचा याला विरोध आहे. या पार्श्वभूमिवर आज गुरुवारी महानगरपालिकेने शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी असोसिएशन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अभ्यासू नागरिकांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत सर्वांनी टॉवर्स उभारताना ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. असे न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला.महानगरपालिकेच्या २९ मेच्या आमसभेत रिलायन्स जीओला शहरात ४ जी केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्याची परवागनी देण्यात आली. प्रारंभी कोणत्याही नगरसेवकांनी याला विरोध दर्शविला नाही. मात्र त्यानंतर याला नगरसेवकांकडून विरोध होऊ लागला. खुद्द सत्ताधारी काँग्रेसच्याच नगरसेवकांनी याविरोधात बंड पुकारले. भाजपाच्याही नगरसेवकांनी त्यांना समर्थन देत रिलायन्स जीओला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमिवर ३० जूनला झालेली आमसभा याच मुद्यावरून चांगलेच गाजली. या प्रकारामुळे महापालिकेतील काँग्रेसची गटबाजी चव्हाट्यावर आली. सध्या या विषयाकडे हॉट विषय म्हणून बघितले जात आहे. दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने रिलायन्स जीओच्या ४ जी केबल प्रत्यारोपण, टॉवर्सची उभारणी, यामुळे मानवी आरोग्यावर कितपत धोका होऊ शकतो, हे तपासून बघण्याकरिता शहरातील सामाजिक संस्थांना व अभ्यासू नागरिकांना चर्चेसाठी पाचारण केले. आज सायंकाळी ही चर्चा झाली. यावेळी महापौर संगिता अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रितेश तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर, उपायुक्त राजेश मोहिते, ग्रिन प्लॅनेटचे प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, इको-प्रोचे बंडू धोतरे, प्रहारचे पप्पू देशमुख, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. टेलीकम्युनिकेशन विभाग, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, केंद्र व महाराष्ट्र शासनाने टॉवर्स उभारणीसाठी काही गाईड लाईन दिल्या आहेत. याची काटेकोर अंमलबजावणी केली जात असेल तरच टॉवर्स उभारा, अशी भूमिका सर्व सामाजिक संस्थांनी यावेळी घेतली. दवाखाना, शाळा-कॉलेज, वृध्दाश्रम आदींच्या जवळ टॉवर असू नये, शिवाय ७० टक्के नागरिकांचा आक्षेप असेल त्या ठिकाणीही टॉवर्स उभारू नये, असेही यावेळी सांगण्यात आले. ४ जी केबलच्या टॉवर्सचा मानवी आरोग्यावर परिणाम होतोच, हे स्पष्ट करताना संस्थांनी हा परिणाम कमितकमी करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)