शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

वनविभागाच्या मनमानीने गुलाब झाला बेघर !

By admin | Updated: February 1, 2016 00:54 IST

मेंडकी ग्रामपंचायत अंतर्गत टेकरी रीठ येथील गट नं. ४० व ४३ ही वनविभागाची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी उपयोगासाठी सन २००१ पासून कायम करण्यात आली.

ब्रह्मपुरी : मेंडकी ग्रामपंचायत अंतर्गत टेकरी रीठ येथील गट नं. ४० व ४३ ही वनविभागाची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी उपयोगासाठी सन २००१ पासून कायम करण्यात आली. आज रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती न देता गुलाब गुरनुले यांची झोपडी पाडून त्यांना बेघर केले. वनविभागाच्या या मनमानी कारभारामुळे गुलाब गुरुनुलेंचा संसार उघड्यावर आला आहे.प्राथमिक गरजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींचा समावेश आहे. त्या सर्वांना मिळाल्या पाहिजे, यासाठी शासन शर्तीचे प्रयत्न करीत असते तर दुसरीकडे वनविभाग मात्र हे सर्व ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गरिबांना थंडीच्या दिवसात घराला मुकावे लागले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे लहान मुले, वृद्ध आई व पत्नी यांना घेऊन संसार कुठे थाटायचा, असा प्रश्न गुलाबसमोर निर्माण झाला आहे. टेकरी रीठ येथे वनविभागाची जागा आहे. परंतु जवळजवळ २०० झोपड्या वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने वेळोवेळी त्यांना अतिक्रमण काढण्याविषयी यापूर्वी सूचित केले होते. संपूर्ण झोपडपट्टीधारकांनी या जागेविषयी न्यायालयात धाव घेतली व २००१ ला न्यायालयाने एकूण गट नंबर पैकी ४० व ४३ गटनंबरची जागा निवासी उपयोगासाठी कायम केली. असे असतानाही वनविभागाने आज सकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता झोपड्या पाडायला सुरुवात केली. दरम्यान माजी सरपंच व काँग्रेस तालुका सचिव थानेश्वर कायरकर हे घटनास्थळी पोहचले व इतर झोपड्या पाडण्यासाठी मज्जाव केला. तेव्हा कारवाई थांबविण्यात आली. परंतु गुलाब गुरनुले यांची झोपडी पाडल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)