शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

असोलामेंढाचे पाणी भेजगाव परिसराला द्या

By admin | Updated: August 22, 2016 01:53 IST

यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह

नियोजनशून्यतेचा परिणाम : हवालदिल शेतकऱ्यांची मागणीभेजगाव : यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह असोलामेंढा तलावही तुडूंब भरला असल्याने या तलावाच्या भरोशावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. या तलावाचा सलंग जवळपास दीड महिन्यापासून निघाला असून सिंचन विभागाने आठ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले आहे. मात्र केवळ सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेने भेजगाव परिसरात तलावाचे पाणी पोहचलेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्षाच्या दुष्काळी स्थितीनंतर यावर्षीतरी असोलामेंढा तलावाचे पाणी शेतीसाठी मिळेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.सततचा दुष्काळ, नापिकी, धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र यावर्षी पावसाने साथ दिल्याने आसोलामेंढा तलाव भरले आहे. त्यामुळे या परिसरात संपूर्ण पिक चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तलावाच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी सिंचन विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कालवे दुरूस्ती करणे गरजेचे होते. मात्र सिंचन विभागाने दहा वर्षांपासून कालव्यातील कचरा, गवत, गाळ काढलेच नाही. त्यामुळे कालव्यात अनेक प्रकारची झुडपे वाढली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या नहरावरील गोसीखुर्दचे कामे अर्धवट असल्याने पाणी पूरवठ्यास अडचण निर्माण होत आहे.मूल तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरत असलेला हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प ४९२०.५२ लाख रु. खर्च करून २०१० ला पूर्णत्वास आला. या प्रकल्पामुळे भेजगाव परिसरातील आठ गावांना फायदा होतो. या योजनेसाठी वेगळे काळवे नसल्याने गोसेखुर्दच्या नहरातूनच पाणी पुरवठा होतो. सिंचन विभागाचे नियोजन नसल्याने या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होतो. यामुळे टोकापर्यंत पाणी पुरवठा होत नाही. सिंचन विभागाने जातीने लक्ष घालून पाणी वाटप समिती स्थापन करून रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. मात्र सिंचन विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. (वार्ताहर)