शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

असोलामेंढाचे पाणी भेजगाव परिसराला द्या

By admin | Updated: August 22, 2016 01:53 IST

यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह

नियोजनशून्यतेचा परिणाम : हवालदिल शेतकऱ्यांची मागणीभेजगाव : यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह असोलामेंढा तलावही तुडूंब भरला असल्याने या तलावाच्या भरोशावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. या तलावाचा सलंग जवळपास दीड महिन्यापासून निघाला असून सिंचन विभागाने आठ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले आहे. मात्र केवळ सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेने भेजगाव परिसरात तलावाचे पाणी पोहचलेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्षाच्या दुष्काळी स्थितीनंतर यावर्षीतरी असोलामेंढा तलावाचे पाणी शेतीसाठी मिळेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.सततचा दुष्काळ, नापिकी, धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र यावर्षी पावसाने साथ दिल्याने आसोलामेंढा तलाव भरले आहे. त्यामुळे या परिसरात संपूर्ण पिक चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तलावाच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी सिंचन विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कालवे दुरूस्ती करणे गरजेचे होते. मात्र सिंचन विभागाने दहा वर्षांपासून कालव्यातील कचरा, गवत, गाळ काढलेच नाही. त्यामुळे कालव्यात अनेक प्रकारची झुडपे वाढली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या नहरावरील गोसीखुर्दचे कामे अर्धवट असल्याने पाणी पूरवठ्यास अडचण निर्माण होत आहे.मूल तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरत असलेला हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प ४९२०.५२ लाख रु. खर्च करून २०१० ला पूर्णत्वास आला. या प्रकल्पामुळे भेजगाव परिसरातील आठ गावांना फायदा होतो. या योजनेसाठी वेगळे काळवे नसल्याने गोसेखुर्दच्या नहरातूनच पाणी पुरवठा होतो. सिंचन विभागाचे नियोजन नसल्याने या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होतो. यामुळे टोकापर्यंत पाणी पुरवठा होत नाही. सिंचन विभागाने जातीने लक्ष घालून पाणी वाटप समिती स्थापन करून रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. मात्र सिंचन विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. (वार्ताहर)