शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

असोलामेंढाचे पाणी भेजगाव परिसराला द्या

By admin | Updated: August 22, 2016 01:53 IST

यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह

नियोजनशून्यतेचा परिणाम : हवालदिल शेतकऱ्यांची मागणीभेजगाव : यावर्षी पावसाने योग्य वेळी हजेरी लावल्याने शेतकरी काहिसा सुखावला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह असोलामेंढा तलावही तुडूंब भरला असल्याने या तलावाच्या भरोशावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. या तलावाचा सलंग जवळपास दीड महिन्यापासून निघाला असून सिंचन विभागाने आठ दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांसाठी पाणी सोडले आहे. मात्र केवळ सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेने भेजगाव परिसरात तलावाचे पाणी पोहचलेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्षाच्या दुष्काळी स्थितीनंतर यावर्षीतरी असोलामेंढा तलावाचे पाणी शेतीसाठी मिळेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.सततचा दुष्काळ, नापिकी, धानाला अत्यल्प भाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. मात्र यावर्षी पावसाने साथ दिल्याने आसोलामेंढा तलाव भरले आहे. त्यामुळे या परिसरात संपूर्ण पिक चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. तलावाच्या पाण्याचे वितरण करण्यासाठी सिंचन विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कालवे दुरूस्ती करणे गरजेचे होते. मात्र सिंचन विभागाने दहा वर्षांपासून कालव्यातील कचरा, गवत, गाळ काढलेच नाही. त्यामुळे कालव्यात अनेक प्रकारची झुडपे वाढली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या नहरावरील गोसीखुर्दचे कामे अर्धवट असल्याने पाणी पूरवठ्यास अडचण निर्माण होत आहे.मूल तालुक्यातील अनेक गावांना वरदान ठरत असलेला हरणघाट उपसा सिंचन प्रकल्प ४९२०.५२ लाख रु. खर्च करून २०१० ला पूर्णत्वास आला. या प्रकल्पामुळे भेजगाव परिसरातील आठ गावांना फायदा होतो. या योजनेसाठी वेगळे काळवे नसल्याने गोसेखुर्दच्या नहरातूनच पाणी पुरवठा होतो. सिंचन विभागाचे नियोजन नसल्याने या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होतो. यामुळे टोकापर्यंत पाणी पुरवठा होत नाही. सिंचन विभागाने जातीने लक्ष घालून पाणी वाटप समिती स्थापन करून रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा करणे गरजेचे झाले आहे. मात्र सिंचन विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. (वार्ताहर)