शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काम रखडले

By admin | Updated: November 4, 2015 00:51 IST

तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) येथील..

विरूर (स्टे) : तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरील नक्षलग्रस्त भाग असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मागील १५ वर्षांपासून निधी अभावी शासन दरबारी धूळ खात पडला आहे. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना कोसोदूर जाऊन उपचार घ्यावा लागत आहे. परिसरातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम रखडले असून याकडे प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत आहे.विरूर (स्टे) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता आहे. येथे प्राथमिक आरोग्य व्हावे या मागणीसाठी विरुर व परिसरातील जनतेने शासनाकडे वारंवार निवेदन दिले, मागण्या केल्या. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली आहे. त्यानंतर जनप्रतिनिधींच्या अथक प्रयत्नाने शासनाने राजुरा मतदार क्षेत्रातील विरूर (स्टे) सह चार प्राथमिक आरोग्य केंद्राना मान्यता दिली. त्यामुळे परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र चार आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आणि इमारत बांधकाम करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लोटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला अजूनही सुरुवात न झाल्याने परिसरातील नागरिकात विरूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह तीन आरोग्य केंद्र कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने १७ जानेवारी २०१३ च्या आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सन २००१ च्या लोकसंख्येच्या निकषावर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व नक्षलग्रस्त भागातील शासनाचा विशेष कृती कार्यक्रम लागू असलेल्या भागात खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी दिली. अपुऱ्या सोयी, कुपोषणासह आरोग्याचे अनेक प्रश्न आणि दुर्गम भागात असल्याने व्यापक जनहित लक्षात घेता या आरोग्य केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली होती. ग्रामीण भागाचा विकास करीत असल्याचा दिंडोरा पिटणाऱ्या शासनाकडूनच नागरिकांच्या अनेक गंभीर समस्यांकडे डोळेझाक केली जात आहे. तालुक्यात विरूर (स्टे) हा गाव मोठा असून येथील लोकसंख्या आठ हजारच्यावर आहे. येथे आठवडी बाजार तसेच वन कार्यालय, रेल्वेस्थानक, शाळा, हायस्कूल, महाविद्यालय, पोलीस ठाणे आदी कार्यालये आहेत. तसेच या गावाला ३५ ते ४० खेडे जोडलेले आहे. परंतु, येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जादा रक्कम मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.विरूर येथे पोलीस ठाणे असल्याने पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्राची कधीही आवश्यकता भासते. पोलीस विभागाला आरोपींची वैद्यकीय तपासणी करायची असल्यास विरूरपासून १५ किमी अंतरावर असलेल्या चिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागते. हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन दुसऱ्या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. सन १९९४ मध्ये विरूर पोलीस ठाण्यावर नक्षल्यांनी हल्ला चढविला. त्यानंतर जवळच असलेल्या माकुडी रेल्वेस्थानकावर नक्षल्यांनी हल्ला केला. त्यामुळे हा भाग नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. काही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी यापूर्वी अनेकदा शासन दरबारी निवेदने दिले. परंतु त्या निवेदनाला शासनाने केराची टोपली दाखविली. मात्र लोकप्रतिनिधीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन विरूर(स्टे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे मंत्रालयाने विरूर (स्टे) प्राथमिक आरोग्य केंद्राला हिरवी झेंडी दाखविल्याने परिसरातील जनतेत आनंद पसरला. मात्र तीन वर्षाचा कालावधी लोटूनही बांधकामाचा पत्ता नाही. (वार्ताहर)