शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: September 8, 2016 00:39 IST

यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे.

पिकांवर रोगराई : हातचे पीक पुन्हा हातून जाणार काय ?चंद्रपूर : यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे. मागील दोन वर्ष सतत नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी यावेळी खरीप हंगामाकडून मोठी आशा बाळगून आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी शेतकऱ्यांना प्रफुल्लित करणारा पाऊस मागील तीन आठवड्यापासून गायब आहे. जवळजवळ सर्वच धान उत्पादकांची रोवणी झाली आहे.पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. सोयाबीन आणि कापसालाही पाणी हवे आहे. मात्र पाऊस पडणे तर सोडाच; उलट उन्हाळ्यासारखे तिव्र ऊन तापत असल्याने पिकांचे हाल वाईट आहे. खरीप हंगामाला जुलै महिन्यातच सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करीत असतानाच बि-बियाणांची जुळवाजुळव करणे सुरू केले होते. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मुंग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. खरीप हंगामात चार लाख ७७ हजार ६५५ हेक्टरवर लागवडीचा कृषी विभागाचा अंदाज होता. प्रारंभी पावसाचे चांगले आगमन झाल्याने कमी-अधिक प्रमाणात अंदाजाप्रमाणे पेरणीही झाली.गेल्या दोन वर्षात नुकसानीला सामोरे जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी अद्यापही खचलेला नसून नव्या जोमाने तयारीला लागला होता. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. हवामान खात्याने यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद होता. मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग निश्चिंत होता. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात, नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले. एवढेच नव्हेतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी जमा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघाड दिला. जमीन वाळल्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरू झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बि-बियाणे घेऊन शेतात पेरले. त्यानंतर पुन्हा एक-दोनदा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामेही आटोपली. पिकेही चांगले भरात आली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. चांगले तीन आठवडे पावसाने तोंडच दाखविले नाही. एवढा दीर्घ काळ पाऊस न आल्याने पिकांची अवस्था वाईट होत आहे. काही दिवस मध्येच ढगाळ वातावरण होत राहिले. त्यामुळे पिकांवर विविध रोगांचे सावट निर्माण झाले आहे.आता पिकांना पावसाची खरी गरज आहे. पावसाचा हा शेवटचा महिना आहे. या महिन्यात पाऊस बरसला नाही तर पुन्हा दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)नदी-नाल्यातीलही जलस्तर घटलाजुलै महिन्यात संततधार व आॅगस्ट महिन्यात एक-दोनदा दमदार पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. मात्र त्यानंतर तीन आठवड्यापासून पाऊस गायब आहे. सोबतच उन्हाळ्यासारखे ऊन तापत आहे. यामुळे नदी-नाल्यातील जलस्तर आटत चालला आहे. धानावर अळींचा हल्लाकाही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. यासोबतच सध्या आर्द्रताही खूप वाढली आहे. त्यामुळे धान पिकांवर पाने खाणाऱ्या अळींचे आक्रमण झाले आहे. ही अळी पिकांचा फडशा पाडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. धानापाठोपाठ इतर पिकांवरही विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कसोशिने प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसाच्या अभावामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.