शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: September 8, 2016 00:39 IST

यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे.

पिकांवर रोगराई : हातचे पीक पुन्हा हातून जाणार काय ?चंद्रपूर : यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे. मागील दोन वर्ष सतत नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी यावेळी खरीप हंगामाकडून मोठी आशा बाळगून आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी शेतकऱ्यांना प्रफुल्लित करणारा पाऊस मागील तीन आठवड्यापासून गायब आहे. जवळजवळ सर्वच धान उत्पादकांची रोवणी झाली आहे.पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. सोयाबीन आणि कापसालाही पाणी हवे आहे. मात्र पाऊस पडणे तर सोडाच; उलट उन्हाळ्यासारखे तिव्र ऊन तापत असल्याने पिकांचे हाल वाईट आहे. खरीप हंगामाला जुलै महिन्यातच सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करीत असतानाच बि-बियाणांची जुळवाजुळव करणे सुरू केले होते. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मुंग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. खरीप हंगामात चार लाख ७७ हजार ६५५ हेक्टरवर लागवडीचा कृषी विभागाचा अंदाज होता. प्रारंभी पावसाचे चांगले आगमन झाल्याने कमी-अधिक प्रमाणात अंदाजाप्रमाणे पेरणीही झाली.गेल्या दोन वर्षात नुकसानीला सामोरे जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी अद्यापही खचलेला नसून नव्या जोमाने तयारीला लागला होता. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. हवामान खात्याने यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद होता. मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग निश्चिंत होता. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात, नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले. एवढेच नव्हेतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी जमा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघाड दिला. जमीन वाळल्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरू झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बि-बियाणे घेऊन शेतात पेरले. त्यानंतर पुन्हा एक-दोनदा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामेही आटोपली. पिकेही चांगले भरात आली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. चांगले तीन आठवडे पावसाने तोंडच दाखविले नाही. एवढा दीर्घ काळ पाऊस न आल्याने पिकांची अवस्था वाईट होत आहे. काही दिवस मध्येच ढगाळ वातावरण होत राहिले. त्यामुळे पिकांवर विविध रोगांचे सावट निर्माण झाले आहे.आता पिकांना पावसाची खरी गरज आहे. पावसाचा हा शेवटचा महिना आहे. या महिन्यात पाऊस बरसला नाही तर पुन्हा दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)नदी-नाल्यातीलही जलस्तर घटलाजुलै महिन्यात संततधार व आॅगस्ट महिन्यात एक-दोनदा दमदार पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. मात्र त्यानंतर तीन आठवड्यापासून पाऊस गायब आहे. सोबतच उन्हाळ्यासारखे ऊन तापत आहे. यामुळे नदी-नाल्यातील जलस्तर आटत चालला आहे. धानावर अळींचा हल्लाकाही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. यासोबतच सध्या आर्द्रताही खूप वाढली आहे. त्यामुळे धान पिकांवर पाने खाणाऱ्या अळींचे आक्रमण झाले आहे. ही अळी पिकांचा फडशा पाडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. धानापाठोपाठ इतर पिकांवरही विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कसोशिने प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसाच्या अभावामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.