शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: September 8, 2016 00:39 IST

यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे.

पिकांवर रोगराई : हातचे पीक पुन्हा हातून जाणार काय ?चंद्रपूर : यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे. मागील दोन वर्ष सतत नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी यावेळी खरीप हंगामाकडून मोठी आशा बाळगून आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी शेतकऱ्यांना प्रफुल्लित करणारा पाऊस मागील तीन आठवड्यापासून गायब आहे. जवळजवळ सर्वच धान उत्पादकांची रोवणी झाली आहे.पिकांना आता पावसाची नितांत आवश्यकता आहे. सोयाबीन आणि कापसालाही पाणी हवे आहे. मात्र पाऊस पडणे तर सोडाच; उलट उन्हाळ्यासारखे तिव्र ऊन तापत असल्याने पिकांचे हाल वाईट आहे. खरीप हंगामाला जुलै महिन्यातच सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करीत असतानाच बि-बियाणांची जुळवाजुळव करणे सुरू केले होते. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मुंग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमुंग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. खरीप हंगामात चार लाख ७७ हजार ६५५ हेक्टरवर लागवडीचा कृषी विभागाचा अंदाज होता. प्रारंभी पावसाचे चांगले आगमन झाल्याने कमी-अधिक प्रमाणात अंदाजाप्रमाणे पेरणीही झाली.गेल्या दोन वर्षात नुकसानीला सामोरे जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी अद्यापही खचलेला नसून नव्या जोमाने तयारीला लागला होता. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. हवामान खात्याने यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद होता. मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग निश्चिंत होता. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात, नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले. एवढेच नव्हेतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी जमा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघाड दिला. जमीन वाळल्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरू झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बि-बियाणे घेऊन शेतात पेरले. त्यानंतर पुन्हा एक-दोनदा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणीची कामेही आटोपली. पिकेही चांगले भरात आली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. चांगले तीन आठवडे पावसाने तोंडच दाखविले नाही. एवढा दीर्घ काळ पाऊस न आल्याने पिकांची अवस्था वाईट होत आहे. काही दिवस मध्येच ढगाळ वातावरण होत राहिले. त्यामुळे पिकांवर विविध रोगांचे सावट निर्माण झाले आहे.आता पिकांना पावसाची खरी गरज आहे. पावसाचा हा शेवटचा महिना आहे. या महिन्यात पाऊस बरसला नाही तर पुन्हा दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)नदी-नाल्यातीलही जलस्तर घटलाजुलै महिन्यात संततधार व आॅगस्ट महिन्यात एक-दोनदा दमदार पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. मात्र त्यानंतर तीन आठवड्यापासून पाऊस गायब आहे. सोबतच उन्हाळ्यासारखे ऊन तापत आहे. यामुळे नदी-नाल्यातील जलस्तर आटत चालला आहे. धानावर अळींचा हल्लाकाही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण होते. यासोबतच सध्या आर्द्रताही खूप वाढली आहे. त्यामुळे धान पिकांवर पाने खाणाऱ्या अळींचे आक्रमण झाले आहे. ही अळी पिकांचा फडशा पाडत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. धानापाठोपाठ इतर पिकांवरही विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी कसोशिने प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसाच्या अभावामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.