शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बियाणे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली.

हवालदिल : हवामान खात्याच्या अंदाजाने नुकसानवरोरा: मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. हवामान खात्यानेही पाऊस येईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र आता त्यांना पावसाअभावी बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षीपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वारंवार मे महिन्यात वर्तविला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली हातातील कामे बाजूला सारून शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले. बियाणांची वेळेवर टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बियाणे घेऊन ठेवले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक गावात चांगला पाऊस पडला.आता आपल्याकडेही पाऊस बरसणार, असे गणित लावून शेतकऱ्यांनी घरी घेऊन ठेवलेले कपाशी, तूर व सोयाबीनच्या बियाणांची पेरणी करुन टाकली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पहिल्या पावसात जमिनीत गेलेले बियाण्यांचे जमिनीवर कोंब आले. त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने कोंब वाळत चालले आहे. काही बियाणे जमिनीतच राहिल्याने खराब झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भागात पाऊस झाला नाही, ते बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)