शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

बियाणे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली.

हवालदिल : हवामान खात्याच्या अंदाजाने नुकसानवरोरा: मृग नक्षत्रामध्ये काही गावात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने मशागत करण्यात आलेल्या शेतात शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. हवामान खात्यानेही पाऊस येईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होते. मात्र आता त्यांना पावसाअभावी बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षीपासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वारंवार मे महिन्यात वर्तविला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली हातातील कामे बाजूला सारून शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले. बियाणांची वेळेवर टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बियाणे घेऊन ठेवले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक गावात चांगला पाऊस पडला.आता आपल्याकडेही पाऊस बरसणार, असे गणित लावून शेतकऱ्यांनी घरी घेऊन ठेवलेले कपाशी, तूर व सोयाबीनच्या बियाणांची पेरणी करुन टाकली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पहिल्या पावसात जमिनीत गेलेले बियाण्यांचे जमिनीवर कोंब आले. त्यानंतर तापमानात वाढ झाल्याने कोंब वाळत चालले आहे. काही बियाणे जमिनीतच राहिल्याने खराब झाले आहे. अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भागात पाऊस झाला नाही, ते बियाणे वाचविण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)