शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा दाटली आसवं!

By admin | Updated: August 25, 2016 00:39 IST

शेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे.

२० दिवसांपासून पाऊस बेपत्ता : फळधारणेवर आलेल्या पिकांना पावसाची आवश्यकताप्रकाश काळे गोवरीशेतकऱ्यांच्या हिंमतीला संकटाची मालीकाच पुजली आहे. या ना त्या, कारणाने शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळतच जात आहे. शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव असल्याने अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने फळधारणेवर आलेले पीक वाळायला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा आसवं दाटल्याचे चित्र दिसून येत आहे. कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची अवस्था आज क्षणाक्षणाला वाईट होत चालली आहे. सिंचनाचा अभावामुळे अनेकांची शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परंतु निसर्गही आता लहरीपणाने वागायला लागल्याने ‘पाऊस येऊनही बुडवेल अन् जाऊनही बुडवेल’ अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दगा दिला. तब्बल महिनाभर पाऊस उशीरा आला. त्यामुळे उसनवारी व कर्ज काढून जमिनीत टाकलेले बियाणे अपुऱ्या पावसाने उमलण्यापूर्वी कोमेजून गेले. बहुतांश शेतकऱ्यांना त्यावेळी दुबार पेरणीला सामोरे जावे लागले होते. यातून बळीराजा अद्यापही सावरला नाही. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकऱ्यांजवळ दमडीही शिल्लक नाही. जुलै महिना वगळता जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. यावर्षी चांगला पाऊस पडेल असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवित पाऊस पाहिजे त्या प्रमाणात आला नाही. शेतकऱ्यांचे वर्षभराचे गणित पावसावर अवलंबून असते. परंतु पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणाऱ्या निसर्गानेही शेतकऱ्यांना दगा दिला आहे. सध्या सोयाबिन पिकाचा फळधारणेचा काळ आहे. यावेळी पिकांना पावसाची नितांत आवश्यकता असते. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. तर फळधारणेवर आलेले सोयाबिनचे पीक उभ्यानेच वाळायला लागले आहे. शेतकऱ्यांची अवस्था क्षणाक्षणाला वाईट होत चालल्याने शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. दिवसरात्रं काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. मग हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच उपस्थित होत आहे. बळीराजाचे आभाळाकडे डोळेगोंडपिपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने येथील शेतपिके पाण्याअभावी संकटात सापडली आहे. पावसाळ्याच्या पूर्वार्धात मुसळधार पडणाऱ्या पावसाने अचानकपणे दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. तालुक्याचा प्रमुख व्यवसाय शेती असून तालुक्यात ८० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावरच आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होऊन ओल्या दुष्काळाचे संकट बळीराजावर ओढावले होते. पावसाची अनियमितता व शेतपिके उभे असताना शेतपिकांना बसलेला वादळी फटका यामुळेही शेती व्यवसायावर चांगलाच आघात झाला. यावर्षी मध्यल्या काळात पावसाने दमदार हजेरी लावली. याच दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, पिकासाठी पेरणी केली. मात्र पावसाचा जोर वाढतच गेल्याने प्रथम पेरणी जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिमतीने दुबार पेरणी व धान पऱ्हे टाकले. सध्यास्थितीत शेतपिके उभी असताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उभ्या शेतपिकावर रोगराईचे संकट ओढावले आहे. धान पिकांसह सोयाबीन व कापूस पिकांवरही विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर पीक नष्ट होणार या भितीमुळे ग्रामीण भागात परंपरागत दवे करणे, घट मांडणे आदी कार्यांना सुरुवात झाली असून बळीराजाचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)