शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात ...

चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात चरक ऋषी हे प्रथम चिकित्सक म्हणून गणले जातात. त्यांनी जवळपास अकराशे व्याधींचे वर्णन चरकसंहितेमध्ये केले आहे. त्याचप्रमाणे, ३० ते ४० हजार औषधी कल्पांचे वर्णनही त्या काळात केले आहे. आजही एवढ्या वर्षांनंतर व्याधींचे निदान व चिकित्सा तंतोतंत लागू पडतात, त्यामुळे आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ.राजीव धानोरकर यांनी केले.

विमला देवी आयुर्वेदिक कॉलेज, वांढरी येथे चरक जयंतीनिमित्त चरकसंहिता या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ.धानोरकर पुढे म्हणाले, आयुर्वेद हे फक्त चिकित्साशास्त्र नसून जीवन जगण्याचे शास्त्र आहे. दीर्घायू व स्वस्थ जीवन कसे जगावे, याचे संपूर्ण वर्णन आयुर्वेदाच्या या ग्रंथांमध्ये आहे. कोरोना व्याधीला पॅनडॅमिक म्हटले आहे. चरक यांच्या काळात जनपदोध्वंस या नावाने या व्याधीचा उल्लेख आहे. त्याची कारणे, चिकित्सा, तसेच आयसोलेशन कसे करावे, याचे पूर्ण वर्णन त्यात असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच चरक संहितेचा अभ्यास कसा करावा, रोजच्या जगण्यात त्यांनी सांगितलेली सूत्रे कशी वापरावीत, निदान कसे करावे, आयुर्वेदाची चिकित्सा उत्तम कशी करावी, याबाबत विविध दाखल देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयुर्वेदिक चिकित्सक, कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.