शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात ...

चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात चरक ऋषी हे प्रथम चिकित्सक म्हणून गणले जातात. त्यांनी जवळपास अकराशे व्याधींचे वर्णन चरकसंहितेमध्ये केले आहे. त्याचप्रमाणे, ३० ते ४० हजार औषधी कल्पांचे वर्णनही त्या काळात केले आहे. आजही एवढ्या वर्षांनंतर व्याधींचे निदान व चिकित्सा तंतोतंत लागू पडतात, त्यामुळे आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ.राजीव धानोरकर यांनी केले.

विमला देवी आयुर्वेदिक कॉलेज, वांढरी येथे चरक जयंतीनिमित्त चरकसंहिता या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ.धानोरकर पुढे म्हणाले, आयुर्वेद हे फक्त चिकित्साशास्त्र नसून जीवन जगण्याचे शास्त्र आहे. दीर्घायू व स्वस्थ जीवन कसे जगावे, याचे संपूर्ण वर्णन आयुर्वेदाच्या या ग्रंथांमध्ये आहे. कोरोना व्याधीला पॅनडॅमिक म्हटले आहे. चरक यांच्या काळात जनपदोध्वंस या नावाने या व्याधीचा उल्लेख आहे. त्याची कारणे, चिकित्सा, तसेच आयसोलेशन कसे करावे, याचे पूर्ण वर्णन त्यात असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच चरक संहितेचा अभ्यास कसा करावा, रोजच्या जगण्यात त्यांनी सांगितलेली सूत्रे कशी वापरावीत, निदान कसे करावे, आयुर्वेदाची चिकित्सा उत्तम कशी करावी, याबाबत विविध दाखल देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयुर्वेदिक चिकित्सक, कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.