शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात ...

चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात चरक ऋषी हे प्रथम चिकित्सक म्हणून गणले जातात. त्यांनी जवळपास अकराशे व्याधींचे वर्णन चरकसंहितेमध्ये केले आहे. त्याचप्रमाणे, ३० ते ४० हजार औषधी कल्पांचे वर्णनही त्या काळात केले आहे. आजही एवढ्या वर्षांनंतर व्याधींचे निदान व चिकित्सा तंतोतंत लागू पडतात, त्यामुळे आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ.राजीव धानोरकर यांनी केले.

विमला देवी आयुर्वेदिक कॉलेज, वांढरी येथे चरक जयंतीनिमित्त चरकसंहिता या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ.धानोरकर पुढे म्हणाले, आयुर्वेद हे फक्त चिकित्साशास्त्र नसून जीवन जगण्याचे शास्त्र आहे. दीर्घायू व स्वस्थ जीवन कसे जगावे, याचे संपूर्ण वर्णन आयुर्वेदाच्या या ग्रंथांमध्ये आहे. कोरोना व्याधीला पॅनडॅमिक म्हटले आहे. चरक यांच्या काळात जनपदोध्वंस या नावाने या व्याधीचा उल्लेख आहे. त्याची कारणे, चिकित्सा, तसेच आयसोलेशन कसे करावे, याचे पूर्ण वर्णन त्यात असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच चरक संहितेचा अभ्यास कसा करावा, रोजच्या जगण्यात त्यांनी सांगितलेली सूत्रे कशी वापरावीत, निदान कसे करावे, आयुर्वेदाची चिकित्सा उत्तम कशी करावी, याबाबत विविध दाखल देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयुर्वेदिक चिकित्सक, कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.