शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

बल्लारपूर पेपर मिलशी श्रीगणेशाचे असे सख्य !

By admin | Updated: September 11, 2016 00:45 IST

संकट मोचन अशी श्री गणेशाची कीर्ती आहे आणि गणेशाचे बल्लारपूर पेपर मिल सोबत चांगले जुने सख्य आहे.

संकट दूर होण्याची आशा : कामगारांच्या कुटुंबीयांची बाप्पाला प्रार्थनाबल्लारपूर : संकट मोचन अशी श्री गणेशाची कीर्ती आहे आणि गणेशाचे बल्लारपूर पेपर मिल सोबत चांगले जुने सख्य आहे. त्यामुळे या घडीला पेपर मिलवर भिरभिणारे संकट गणपती बाप्पाने दूर करावे, पेपर मिल पूर्ववत सुरू होवून परत त्याला पूर्वीसारखे भरभराटीचे दिवस येवो, अशी प्रार्थना या गणेशोत्सवात गणेश भक्त कामगार व त्यांचे आश्रित त्यांचे कुटुंबियांनी करणे अगदी स्वाभाविक आहे. आणि तशी प्रार्थना केली जात आहे.बल्लारपूर पेपर मिलशी श्री गणेशाचे हे मिल सुरू झाले, तेव्हापासूनचे सख्य आहे, जवळीक आहे. या मिलमध्ये बनलेल्या पहिल्या कागदावर श्री गरेशाचे चित्र असलेले वॉटर मार्क उमटले होते. या वॉटर मार्कचा कागद बरेच दिवसपर्यंत निघत राहिला. बाजारात मोठ्या प्रमाणात खपू लागला होता. श्री गणेशाचे हेच चित्र या मिलच्या पहिल्या एक नंबर मशीनच्या इमारतीच्या दर्शनी भागावरील भिंतीवर मूर्तीरूपाने स्थापित करण्यात आले. ही मूर्ती नागपूरच्या मूर्तीकाराने घडविली आहे. मिल प्रारंभ झाला, त्याच्या पहिल्या गणेशोत्सव ते आजपर्यंत प्रत्येक गणेश चतुर्थीला या मूर्तीला नव्याने रंगवून त्याची महाव्यवस्थापकाचे हस्ते पूजा केली जाते. विद्युत रोषणाईने हा भाग उजळविला जातो. यावर्षीही संकट असले तरी गणेश मदतीला धावणार, अशी आशा आहे.पेपर मिल कॉलनीत व्यवस्थापनाकडून कलामंदिर जवळ गणेशोत्सवात मुर्ती बसविली जाते. हा क्रम गेले ६० वर्षांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे पेपर मिलच्या थापर गेट समोरील मेरी पार्क येथे गणेश मंदिर बनवून त्यात श्री गणेशाची संगमेवरवरची भव्य मूर्ती बसविली आहे. तद्वतच, जंगलात मिळालेल्या गणेशाच्या दोन सारख्या आकाराच्या दगडी मूर्तीही याच परिसरात छोटे मंदिर बनवून त्यात बसविल्या आहेत. श्री गणेशाचे पेपर मिलमध्ये असे अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि म्हणूनच पेपर मिलवर सध्या आले असलेले संकट दूर होईलच. शिवाय पूर्वीसारखी संपन्नता नांदेल, असा आशावाद विश्वास कामगारांच्या अधिकाऱ्यांच्या मनी आहे. (तालुका प्रतिनिधी)