शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

बुलडाणा : गतवर्षी जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान ...

बुलडाणा : गतवर्षी जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर जिल्ह्यात पीकविम्याची भरपाई मिळत असली तरी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस व तूर या सात पिकांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना अधिसूचित आहे. गतवर्षी २०२०-२१ या हंगामात बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख ९५ हजार १५७ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतला हाेता. दोन लाख २५ हजार ८१० हेक्टर क्षेत्रासाठी हा विमा काढण्यात आला आहे. गतवर्षीच्या खरिपात पेरणीपासून कापणीपर्यंत पाऊस सारखा सुरू होता. उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न मिळण्याची आशा असताना ऐन काढणीच्या हंगामात सोयाबीनमध्ये शेतात पाणी साचलेले हाेते. यावर्षीच्या आधी सन २०१९- २० मध्ये ६८ टक्के शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यावर्षी दोन लाख ३८ हजार २७८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी एक लाख ६२ हजार १८३ शेतकऱ्यांना २२३ कोटी २५ लाख रक्कम विम्याच्या मोबदल्यात मिळाली. हा चांगला अनुभव पाहता गतवर्षी सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांची वाढ पीकविमा योजनेत नोंदवली गेली. मात्र कोरोनाच्या सावटात पुन्हा एकदा नवा हंगाम तोंडावर असताना विम्याची आस शेतकऱ्यांना आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील १४१९ गावांमध्ये अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर प्रधानमंत्री पीकविमा योजनेत मदत दिली जाते याचा अहवाल शासनाकडून कंपनीकडे सादर झाला आहे.

शेतकऱ्यांनी भरले १७० काेटी

२०१९- २०च्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी)कडे या योजनेचा कारभार होता. १२० कोटी रुपये विम्याचा हप्ता या कंपनीकडे भरण्यात आला होता. त्या तुलनेत एक लाख ६२ हजार १८३ पात्र शेतकऱ्यांना जवळपास २२३ कोटी ४५ लाख रुपये मोबदला शेतकऱ्यांना मिळाला. गतवर्षी २०२०-२१ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे काम होते. या कंपनीकडष सहभागी दोन लाख ९५ हजार १५७ शेतकऱ्यांची सुमारे १७० कोटी रुपये हप्ता रक्कम भरण्यात आली आहे. मात्र, अजूनही मदत मिळालेली नाही.

अतिवृष्टीचा खरीप पिकांना फटका

गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील अनेक पिकांना फटका बसला आहे. मूग, साेयाबीन आणि उडीद पीक काढणीला आलेला असताना जाेरदार पाऊस झाला. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना पीक घरी आणता आले नाही. लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून आस आहे. अनेक शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.

विमा भररूनही भरपाईची प्रतीक्षाच

गेल्यावर्षी खरीप पिकांचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. विम्याचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अजूनही लाभ मिळाला नाही. खरीप हंगाम सुरू हाेण्यापूर्वी मदत मिळाल्यास हातभार लागेल. विमा कंपनीने तातडीने लाभ द्यावा.

गणेश भाेसले, शेतकरी, नागझरी

काेराेना संसर्गाममुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे साेयाबीन पीक घरीही आणता आले नाही. साेयाबीनचा विमा काढलेला आहे. मात्र, अजूनही भरपाई मिळालेली नाही. खरीप हंगामापूर्वी मदत दिल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल.

एकनाथ आव्हाडे, शेतकरी, हिवरा आश्रम

गतवर्षी खरीप हंगामात साेयाबीन, कापूस आणि तुरीचा विमा काढला हाेता. अतिवृष्टीमुळे बहुतांश पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याने भरपाई मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, अजूनही विम्याचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामापूर्वी मदत दिल्यास दिलासा मिळेल.

स्वप्नील घाेडे, शेतकरी, मेहकर