शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
2
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
3
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
4
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
5
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
6
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
7
"देशात परिस्थिती काय अन् ही थायलंडमध्ये...", नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे भारती सिंहला रडू कोसळलं
8
व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?
9
अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण...
10
7 मे रोहित अन् 12 मे विराट; टेस्ट क्रिकेटमधून 'ROKO' युगाचा अंत, अशी होती दोघांची कारकीर्द
11
हैदराबादच्या प्रसिद्ध 'कराची बेकरी'ची तोडफोड; पाकिस्तानविरोधी घोषणा देत केली 'ही' मागणी
12
लग्नाच्या पहिल्याच रात्री पती टेरेसवर झोपला, नववधूचा शाळेपासूनचा प्रियकर आला, अन्...
13
Suicide Blast: पाकिस्तानात दहशतवाद्यांचा पोलिसांच्या गाडीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, २ ठार
14
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केले होते ३२ विमानतळ, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
15
अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
16
निष्काळजीपणाचा कळस! आई आजारी, लेकाच्या हातात रक्ताची बॉटल; नवऱ्याने ओढला स्ट्रेचर अन्...
17
सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- "त्यांनी माझं स्कीट.."
18
पायऱ्या चढा किंवा उतरा आणि हार्ट ॲटॅकची भीती विसरा; गंभीर आजारही होतील छूमंतर
19
Numerology: ७, १६ आणि २५ जन्मतारीख असलेल्यांना जन्मतः मिळते चाणाक्ष बुद्धी आणि तीक्ष्ण नजर!
20
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

आपट्याच्या झांडांना पानगळ

By admin | Updated: November 1, 2016 15:27 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे.

ब्रम्हानंद जाधव, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १ -  बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्यात विविध प्रजातीचे वृक्ष असून त्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांच्या पानांना गळती लागल्याने अभयारण्यातील आपट्याच्या झाडांचे केवळ सांगाडे पाहायला मिळत आहेत. 
 
वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व  वाढत्या प्रदुषणाला नियंत्रणात ठेवण्यात वनांचा मोलाचा वाटा आहे.  निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत  वनविभागामार्फत प्रयत्न करण्यात येतात. भोगौलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे.  त्यासाठी वृक्षलागवडीवर भर देण्यात येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे मात्र आहेत ते वृक्ष संवर्धनाअभावी वाळून जात आहेत. बुलडाणा  जिल्ह्याला वन विभागाचा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले असून या अभयारण्यात अनेक प्रजातीचे वृक्ष आहेत. त्यामध्ये बहुआयामी समजल्या जाणाºया आपट्यांची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. हिरवागार शालू पांघरून घेतलेल्या या आपट्यांच्या झाडाने ज्ञानगंगा अभयारण्याला शोभा येते. मात्र, ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांची पाने झडत असल्याने सर्व हिरव्यागार झाडांमध्ये ही झाडे वेगळी दिसत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील अनेक आपट्याच्या झाडे वाळल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
 
 
शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात
 
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्याबरोबरच १२७.११० चौ.कि़मी.क्षेत्रावर अंबाबरवा अभयारण्य व ३.८३१ चौ.कि़मी. क्षेत्रावर लोणार अभयारण्य आहे. हे तीनही अभयारण्य वनसंपदेने वैभवशाली आहेत. या वनांमध्ये विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फलांचाही समावेश आहे. शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू आहेत. परंतू गेल्या काही वर्षापासून अभयारण्यामधील शोभेची झाडे व औषधी वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांचे योग्य संवर्धन होत नसल्याने शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात आली आहे.