शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

आपट्याच्या झांडांना पानगळ

By admin | Updated: November 1, 2016 15:27 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे.

ब्रम्हानंद जाधव, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १ -  बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्यात विविध प्रजातीचे वृक्ष असून त्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांच्या पानांना गळती लागल्याने अभयारण्यातील आपट्याच्या झाडांचे केवळ सांगाडे पाहायला मिळत आहेत. 
 
वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व  वाढत्या प्रदुषणाला नियंत्रणात ठेवण्यात वनांचा मोलाचा वाटा आहे.  निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत  वनविभागामार्फत प्रयत्न करण्यात येतात. भोगौलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे.  त्यासाठी वृक्षलागवडीवर भर देण्यात येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे मात्र आहेत ते वृक्ष संवर्धनाअभावी वाळून जात आहेत. बुलडाणा  जिल्ह्याला वन विभागाचा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले असून या अभयारण्यात अनेक प्रजातीचे वृक्ष आहेत. त्यामध्ये बहुआयामी समजल्या जाणाºया आपट्यांची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. हिरवागार शालू पांघरून घेतलेल्या या आपट्यांच्या झाडाने ज्ञानगंगा अभयारण्याला शोभा येते. मात्र, ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांची पाने झडत असल्याने सर्व हिरव्यागार झाडांमध्ये ही झाडे वेगळी दिसत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील अनेक आपट्याच्या झाडे वाळल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
 
 
शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात
 
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्याबरोबरच १२७.११० चौ.कि़मी.क्षेत्रावर अंबाबरवा अभयारण्य व ३.८३१ चौ.कि़मी. क्षेत्रावर लोणार अभयारण्य आहे. हे तीनही अभयारण्य वनसंपदेने वैभवशाली आहेत. या वनांमध्ये विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फलांचाही समावेश आहे. शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू आहेत. परंतू गेल्या काही वर्षापासून अभयारण्यामधील शोभेची झाडे व औषधी वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांचे योग्य संवर्धन होत नसल्याने शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात आली आहे.