शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

आपट्याच्या झांडांना पानगळ

By admin | Updated: November 1, 2016 15:27 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे.

ब्रम्हानंद जाधव, ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १ -  बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलडाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. या अभयारण्यात विविध प्रजातीचे वृक्ष असून त्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांच्या पानांना गळती लागल्याने अभयारण्यातील आपट्याच्या झाडांचे केवळ सांगाडे पाहायला मिळत आहेत. 
 
वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व  वाढत्या प्रदुषणाला नियंत्रणात ठेवण्यात वनांचा मोलाचा वाटा आहे.  निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत  वनविभागामार्फत प्रयत्न करण्यात येतात. भोगौलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे.  त्यासाठी वृक्षलागवडीवर भर देण्यात येत आहे. एकीकडे वृक्ष लागवड होत असताना दुसरीकडे मात्र आहेत ते वृक्ष संवर्धनाअभावी वाळून जात आहेत. बुलडाणा  जिल्ह्याला वन विभागाचा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा-खामगांव राज्य मार्गास लागून असलेल्या २०५ चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले असून या अभयारण्यात अनेक प्रजातीचे वृक्ष आहेत. त्यामध्ये बहुआयामी समजल्या जाणाºया आपट्यांची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत. हिरवागार शालू पांघरून घेतलेल्या या आपट्यांच्या झाडाने ज्ञानगंगा अभयारण्याला शोभा येते. मात्र, ज्ञानगंगा अभयारण्यातील आपट्याच्या झाडांना सध्या पानगळ लागली आहे. अचानक आपट्याच्या झाडांची पाने झडत असल्याने सर्व हिरव्यागार झाडांमध्ये ही झाडे वेगळी दिसत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील अनेक आपट्याच्या झाडे वाळल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 
 
 
शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात
 
बुलडाणा जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्याबरोबरच १२७.११० चौ.कि़मी.क्षेत्रावर अंबाबरवा अभयारण्य व ३.८३१ चौ.कि़मी. क्षेत्रावर लोणार अभयारण्य आहे. हे तीनही अभयारण्य वनसंपदेने वैभवशाली आहेत. या वनांमध्ये विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फलांचाही समावेश आहे. शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर आहेत. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू आहेत. परंतू गेल्या काही वर्षापासून अभयारण्यामधील शोभेची झाडे व औषधी वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. या झाडांचे योग्य संवर्धन होत नसल्याने शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पती धोक्यात आली आहे.