शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जिजामाता साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:40 IST

सिंदखेडराजा : जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून राज्याचे आरोग्यमंत्री तथा समर्थ सहकारी ...

सिंदखेडराजा : जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून राज्याचे आरोग्यमंत्री तथा समर्थ सहकारी साखर कारखाना (जालना) चे चेअरमन राजेश टोपे यांनी सोमवारी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत कारखान्याची पाहणी केली.

१९७२ मध्ये आप्पासाहेब देशमुख यांनी उजाड माळरानावर हा कारखाना सुरू केला. त्याकाळी केवळ चार कोटी रुपयांत हा कारखाना सुरू झाला. एक-दोन वर्षे कारखाना सुरू राहिला, नंतर ११ वर्षे हा कारखाना केंद्र सरकारनियुक्त प्रशासकाच्या ताब्यात होता. त्यानंतर १९९८ मध्ये राजेंद्र शिंगणे हे चेअरमन झाले. त्यानंतर त्यांनी २०११ पर्यंत हा कारखाना यशस्वीपणे चालविला. पण त्यानंतर बंद पडलेला कारखाना पुन्हा २०११ मध्ये विक्री केला गेला. जालन्यातील उद्योजक विनय कोठारी यांनी हा कारखाना घेतला होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणी आल्याने त्यांनीही कारखान्यापासून काडीमोड घेणेच पसंत केले. मध्यंतरी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक कारखाना घेणार, अशी अपेक्षा होती. पण कालांतराने ती अपेक्षाही मालवत गेली.

जवळपास ५० वर्षे जुना साखर कारखाना आता सुरूच होणार नाही, अशी शक्यता असताना, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हा कारखाना सुरू करणार असल्याचे संकेत दिले आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही हा कारखाना पाहण्यासाठी डॉ. शिंगणे यांनी निमंत्रण दिले होते. परंतु त्यावेळी त्यांचे येणे झाले नाही. सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. शिंगणे यांच्या विनंतीला मान देऊन कारखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत समर्थ साखर कारखान्याचा टेक्निकल स्टाफ होता. कारखान्याची पाहणी करून त्यांनी टेक्निकल टीमला संपूर्ण पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले असून लवकरच यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी कारखाना परिसरात झालेल्या सत्कारप्रसंगी सांगितले.

जिजामाता कारखाना सुरूच व्हावा, ही या भागातील शेतकऱ्यांनी इच्छा आहे. कारखाना सुरू झाला तेव्हा विपरित परिस्थिती होती. मात्र आता रस्ते, वीज, पाणी या सुविधा मुबलक प्रमाणात या भागात उपलब्ध आहेत, ऊस देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे. अशा परिस्थितीत टोपे यांनी हा कारखाना ताब्यात घेऊन सुरू करावा, अशी आग्रही मागणी यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

यावेळी ॲड. नाझरे काजी, इरफान आली, विलास देशमुख, गजानन देशमुख, टेक्निकल स्टाफचे सुरुवसे, कामगार नेते व कारखाना माहीत असलेले काही जुने कामगार उपस्थित होते.

गाळप क्षमता कमी असलेला कारखाना

५० वर्षे जुना असलेला हा कारखाना गाळप क्षमतेत मात्र आताच्या कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा आहे. तांत्रिकदृष्ट्‌या सोळाशे टन क्षमता असलेला हा कारखाना सुरू झाल्यास बाराशे टन उसाचे गाळप करू शकणार आहे. त्यामुळे यात मोठे बदल गरजेचे असून त्याची माहिती टोपे यांनी करून घेतली.

२५ कोटींचे देणे

कारखान्यावर सध्या विविध हेडखाली २५ कोटी रुपयांची देणी देणे आहे. दरम्यानच्या काळात कामगारांचे थकीत पगार, पीएफ ही देणी दिली गेली असली तरीही, अन्य विषयांचे २५ कोटी कारखान्याला देणे आहे. सध्या हा कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे.