शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

जिल्ह्यात चारा टंचाईचे सावट गडद!

By admin | Updated: April 12, 2017 00:48 IST

खामगाव- चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पशुपालक हैराण: ज्वारी, मका उत्पादनाच्या पेऱ्यात घट

अनिल गवई - खामगाव

जिल्ह्यात ज्वारी, मका आणि चारावर्गीय पिकाच्या पेऱ्यात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून, चाऱ्याचे भाव गगणाला भिडले असून, जिल्ह्यातील पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चाऱ्याचे भाव चारपटीने वधारल्याने, ग्रामीण भागात चारा चोरी जाण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.परिसरात गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला, तर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी, पावसाच्या लहरीपणामुळे ज्वारी, मका पिकासोबतच इतर चारावर्गीय पिकांच्या पेऱ्यात कमालिची घट झाली. परिणामी, जमिनीतील पाणी पातळी खोल जात असतानाच अनेक भागातील पिकांनाही फटका बसला आहे. चारा वर्गीय पिकांना सातत्याने कधी जास्त, कधी अत्यल्प तर कधी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेती पिकाचे उत्पादन घटल्याने, तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीस काढली आहे; मात्र या जनावरांना योग्य भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून उपाय योजना करावी, अशी मागणी विविध परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.गोधन विक्रीकडे अनेकांचा कल!जिल्ह्यात निर्माण झालेल्या चारा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा सांभाळ करणे कठीण झालेल्या पशू पालकांनी आपला मोर्चा गोधन आणि जनावरे विक्रीचा पर्याय निवडला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात जनावरांच्या विक्रीत वाढ झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे गोपालकांना शासनाकडून सहकार्य करण्याची मागणी जोर धरत आहे.कडब्याच्या पेडींचे दर वधारले!महिना भरापूर्वी ज्वारीच्या कडब्याची एक पेंडी १८-२० रुपयांना मिळत होती. त्यानंतर दिवाळीच्या वेळी हीच पेंडी २२-२५ रुपयांवर पोहोचली; मात्र आता चाराच शिल्लक नसल्यामुळे २८-३० रुपयांपर्यंत या पेंडीचे दर पोहोचले आहेत. त्यामुळे चारा खरेदी करताना, शेतकरी तसेच जनावरे पालक चांगलेच मेटाकुटीस येत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.बागायतदार शेतकऱ्यांनाही फटका!बागायतदार शेतकऱ्यांनी चारा वर्गीय पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न करीत, चारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र जमिनीतील पाणी पातळी खोल गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ही पिकं शेतातच करपली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात चारा टंचाई ही तीव्र समस्या बनली आहे. खामगाव, मलकापूर, चिखली, सिंदखेडराजा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने चाऱ्याची टंचाई भासत आहे. पाणी टंचाईचाही प्रश्न ऐरणीवर!चारा टंचाईसोबतच जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी बाया-बापड्यांना संघर्ष करावा लागत असताना, जनावरांसाठी पाणी आणावे तरी कोठून? असा प्रश्न जिल्ह्यातील पशुपालकांना पडला आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.चारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ!चारा टंचाईमुळे ग्रामीण भागामध्ये चाऱ्याला ‘सोन्याचे भाव’ आले असून, काही ठिकाणी चारा चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. चारा वर्गीय पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने, तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाऱ्याच्या भावातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जनावरांची देखभाल करणे जिकरीचे होत आहे.- संतोष गव्हाळे, सधन कास्तकार,रोहणा ता. खामगाव