शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पावसाने गाठली चाळिशी

By admin | Updated: August 26, 2014 23:43 IST

पावसाचे आगमन : मोताळा तालुका अजूनही अवर्षणग्रस्तच

बुलडाणा : जिल्ह्यात महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने २३ जुलैपासून आगमन केल्याने आतापर्यंंत ३३ टक्क्यांपर्यंत असलेल्या पावसाने फक्त चाळिशीच गाठली आहे. जिल्ह्यात आज २५ जुलै रोजी सकाळी आठ वाजेपर्यंंत नोंदविलेला पाऊस हा ४१ टक्के झाला असून, अजूनही ६0 टक्के पावसाचा बॅकलॉग बाकी आहे. तब्बल एक महिन्यापासून रोज ज्याची वाट पाहणे सुरू होते तो पाऊस अखेर बरसला. जिल्ह्याभरात गत पाच दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. २१ ऑगस्ट बुधवारच्या रात्रीपासून बुलडाणा शहरासह जिल्हय़ात सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची चाहूल लागली होती. तोच गुरुवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी पावसाची हजेरी लागली. २१ ऑगस्टच्या पावसाची ४४ मि.मी. एवढी नोंद करण्यात आली. तर २२ ऑगस्ट रोजी १७५ मी.मी., २३ ऑगस्ट रोजी १५३ मि.मी. तर २४ ऑगस्ट रोजी २९३ मि.मी. करण्यात आली. १९ आणि २0 ऑगस्ट रोजी चिखली, मोताळा, ज.जामोद, सिंदखेडराजा तालुक्यातील ४४ मि.मी. एवढाच पाऊस पडला. इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाचा आकडा निरंकच होता. मोताळा तालुक्यामध्ये ५0 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणीमध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा पेरा जास्त आहे. तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पिकांची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोताळा तालुका अजूनही अवर्षनग्रस्तच आहे. या पाच दिवसातील पावसाची सरासरी ४१ टक्के नोंदविण्यात आली. १ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ७१२.६७ सरासरी एवढा पाऊस अपेक्षित असतो; मात्र यंदा ३८४६.६६ मि.मी. एवढाच पाऊस पडला. ज्याची सरासरी २९५ टक्के नोंदविली गेली. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाची छळ सोसलेल्या बुलडाणा जिल्ह्यात गत वर्षी २0१३ मध्ये ९७३३.७५ मि.मी. पाऊस पडला. ज्याची ७५१ टक्के सरासरीने गेल्या दहा वर्षांचा विक्रम मोडला होता. २५ ऑगस्ट रोजी बुलडाणा तालुक्यात 0५ मि.मी., दे.राजामध्ये 0३ मि.मी., मेहकरमध्ये १२ मि.मी., लोणारमध्ये ३३ मि.मी., मलकापूर 0२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शिवाय चिखली, सिंदखेडराजा, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, ज.जमोद, संग्रामपूरमध्ये पावसाचा आकडा निरंक राहिला. अजूनही ६0 टक्के बॅकलॉग भरुन काढणे गरजेचे आहे.

** गत तीन ते चार दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे; मात्र मेहकर, लोणार व सिंदखेडराजा तालुक्यात अद्यापपर्यंंत दमदार पाऊस झाला नसल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. तालुक्यातील सावत्रा, सोनारगव्हाण, सुळा, भालेगाव, पाचला, मोसंबेवाडी, मिस्कीनवाडी यासह परिसरात अत्यल्प पाऊस असल्याने खरीप पिके सुकू लागली आहेत, तर पावसाने दडी मारल्यामुळे किनगावजट्ट, भुमराळा, सावरगाव तेली, वसंतनगर, देवानगर, खापरखेड लाड, या परिसरावर कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन, उडीद, मूग, कपाशीची पेरणी केली; परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे अनेक शेतकर्‍यांवर दुबार ते तिबार पेरणीची वेळ आली आहे. कनका परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे येथील हायब्रीड ज्वारीची पिके सुकू लागली आहेत. जानेफळ शिवारात पावसाअभावी हवेत डोलणार्‍या पिकांनीही माना खाली घातल्या आहेत.