शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

५0 टक्के ग्रामसभा कागदावरच!

By admin | Updated: October 7, 2015 01:54 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील विकास कामांना खीळ.

अशोक इंगळे ल्ल सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, ७९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी सुमारे ५0 टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा कागदावरच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसत आहे. सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत एकूण ७९ ग्रामपंचायती आहेत. यावर्षी ५0 टक्केपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. कित्येक गावात शेतकरी आणि शेतमजुराच्या हाताला काम नाही. शेतकरी आणि शेतमजुराला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विहिरीचे प्रस्ताव बोलावून ते मंजूर करण्याचे अधिकार ग्रामसेवकाला आहेत. प्रत्येक गावात २ ऑक्टोबरला ग्रामसभा बोलावून या कामाचा निपटारा करावयाचा असतो. तालुक्यात ७९ पैकी ४३ ग्राम पंचायतीच्या निवडणुका ४ ऑगस्टला होऊन ९ सप्टेंबर रोजी सरपंच उपसरपंचाची निवड झाली. जेमतेम एक महिनाही निवडीला झाला नसल्याने ग्रामपंचायतमधील कामकाजाची माहिती त्यांना नाही. ग्रामसेवक सांगतील तसा किंवा त्यांनी लिहून ठेवलेल्या ठरावावर निमूटपणे सह्या करा, असा फंडा काही ग्रामसेवकांनी राबविला आहे. अल्पभूधारक, दारिद्रय रेषेखालील कार्डधारक यांना या विहिरीचा लाभ घेता येतो. ज्याच्याकडे शेती आहे, त्यांच्याजवळ दारिद्रय़रेषेचे कार्डच नाही. पाच एकरा खालील शेतकर्‍यांनी विहिरीसाठी अर्ज करावा, तो ग्रामसभेत मंजूर करुन पंचायत समितीला पाठवावा, अशी त्याची पद्धत आहे. गावात दवंडी देणे, ग्रामसभेची माहिती देणे ही प्रथम, दिवशीची पद्धत आहे; पण तसे होत नाही. अनेक शेतकर्‍यांना मनरेगा म्हणजे काय? हेच समजले नाही. तालुका कृषी अधिकारी यांनीसुद्धा जलयुक्त शिवार योजनेसंबंधित ग्रामसभेत माहिती देऊन ज्या शेतकर्‍यांना जलयुक्त शिवार योजनेत कामे करावयाची आहेत, त्यांनी नावे द्यावीत, असा ठरावही घेण्याचे सांगितले होते. ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छता सप्ताह साजरा करण्याचे निर्देश होते; परंतु तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने २ ऑक्टोबर रोजी कोणतीच मोहीम राबविली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.