शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना हुशार बनविणारा प्रकल्प राज्यात राबविणार

By admin | Updated: September 6, 2014 23:33 IST

प्रसारमाध्यमे दररोज शिक्षण क्षेत्राविषयी नवनवी भाष्य करतात. विविध माध्यमातून शालेय शिक्षणाचे विदारक चित्र उभे करण्यात येते. यासर्वांच्या अभिप्रायांचा सारांश एकच असतो. शाळेतील मुलांना काहीच येत नाही.

पवनी : प्रसारमाध्यमे दररोज शिक्षण क्षेत्राविषयी नवनवी भाष्य करतात. विविध माध्यमातून शालेय शिक्षणाचे विदारक चित्र उभे करण्यात येते. यासर्वांच्या अभिप्रायांचा सारांश एकच असतो. शाळेतील मुलांना काहीच येत नाही. या परिणामकारक ठरलेला व खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना हुशार बनविणारा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी शिक्षण दिनानिमित्त मुख्याध्यापक, शिक्षकांना पाठविलेल्या संदेशात दिलेले आहे.शाळेतील मुलांना काहीच येत नाही, पाचवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही आणि सातविचा विद्यार्थी चौथीचे गणित सोडवू शकत नाही, अशी राज्यातील शिक्षणाची र्चा वारंवार होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी राज्यशासन आणि प्रथम फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. शिक्षण संचालनालय, विद्या परिषद आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाला. उपजिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यातील १०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार दुपारच्या भोजनापुर्वीच्या दोन तासिकामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुलांमध्ये मिसळून हसत खेळत शिकविले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचे गट करण्यात आले. त्यांच्या नेमक्या उणिवा हेरून त्यांना शिकविले. शब्द व वाक्यांचा वारंवार सराव देवून गणिती उदाहरणांचा खूप सराव करून घेण्यात आला. १०० दिवसांतील या उपक्रमामुळे अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमुलाग्रह सुधारणा झाली. हा प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम या शैक्षणिक वर्षात राज्यभर कार्यान्वित करण्याचा शिक्षण विभागाचा मानस असून विद्या परिषदेद्वारे त्याचे नियोजन करण्यात येत असून महिनाभरात वाचन, लेखन सुरू करण्यात येईल, अशी माहिती पत्राद्वारे संवाद करताना शिक्षण सचिवांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)