शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

विद्यार्थ्यांना हुशार बनविणारा प्रकल्प राज्यात राबविणार

By admin | Updated: September 6, 2014 23:33 IST

प्रसारमाध्यमे दररोज शिक्षण क्षेत्राविषयी नवनवी भाष्य करतात. विविध माध्यमातून शालेय शिक्षणाचे विदारक चित्र उभे करण्यात येते. यासर्वांच्या अभिप्रायांचा सारांश एकच असतो. शाळेतील मुलांना काहीच येत नाही.

पवनी : प्रसारमाध्यमे दररोज शिक्षण क्षेत्राविषयी नवनवी भाष्य करतात. विविध माध्यमातून शालेय शिक्षणाचे विदारक चित्र उभे करण्यात येते. यासर्वांच्या अभिप्रायांचा सारांश एकच असतो. शाळेतील मुलांना काहीच येत नाही. या परिणामकारक ठरलेला व खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना हुशार बनविणारा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी शिक्षण दिनानिमित्त मुख्याध्यापक, शिक्षकांना पाठविलेल्या संदेशात दिलेले आहे.शाळेतील मुलांना काहीच येत नाही, पाचवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही आणि सातविचा विद्यार्थी चौथीचे गणित सोडवू शकत नाही, अशी राज्यातील शिक्षणाची र्चा वारंवार होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी राज्यशासन आणि प्रथम फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. शिक्षण संचालनालय, विद्या परिषद आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे पथदर्शी कार्यक्रम यशस्वी झाला. उपजिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यातील १०० शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार दुपारच्या भोजनापुर्वीच्या दोन तासिकामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुलांमध्ये मिसळून हसत खेळत शिकविले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचे गट करण्यात आले. त्यांच्या नेमक्या उणिवा हेरून त्यांना शिकविले. शब्द व वाक्यांचा वारंवार सराव देवून गणिती उदाहरणांचा खूप सराव करून घेण्यात आला. १०० दिवसांतील या उपक्रमामुळे अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमुलाग्रह सुधारणा झाली. हा प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम या शैक्षणिक वर्षात राज्यभर कार्यान्वित करण्याचा शिक्षण विभागाचा मानस असून विद्या परिषदेद्वारे त्याचे नियोजन करण्यात येत असून महिनाभरात वाचन, लेखन सुरू करण्यात येईल, अशी माहिती पत्राद्वारे संवाद करताना शिक्षण सचिवांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)