शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

पाण्याचा उपसा भूजल पातळीत घट

By admin | Updated: November 15, 2015 00:28 IST

पालोरा चौ़ : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत भरपूर प्रमाणात असले तरी दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढत आहे.

पालोरा चौ़ : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत भरपूर प्रमाणात असले तरी दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढत आहे. परिणामत: भूगर्भात पन्नास फुटावर लागणारे पाणी शंभर फुटाच्या वर गेले आहे. आतापासून सर्वत्र पाण्याची टंचाई दिसून येत आहे. वैनगंगा नदीच्या पवित्र्यात असलेला भंडारा जिल्ह्यातील चौरास पट्टा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे.पवनी तालुक्यात सभोवताल बाराही महिने पिक देणारी कसदार जमीन आहे. भूगर्भात भरपूर पाण्याचा स्त्रोत असल्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड उपसा करून वर्षभर पीक घेत आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पाण्याचा प्रचंड उपसामुळे भूगर्भातील रेती वाळवंटाचे रुप देत आहे. प्रत्येक नागरीक भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जात आहे. पूर्वी हाताने खोदलेल्या विहिरीला पाणी लागत होते. आता मात्र पाणी लागत नसल्यामुळे यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने पाण्याचा शोध घेणे सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी नाहिशी होऊन रेती व दगड मिळत आहेत. या भागात मोटार पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. भंडारा जिल्ह्यात चौरास क्षेत्र लाखांदूर व पवनी तालुक्यात येतो. लाखांदूरला चुलबंद नदी व पवनीला वैनगंगा नदी वाहते. या नद्या वरदान ठरत असल्या तरी मानवाच्या लापरवाहीमुळे सर्वत्र वाळवंट होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहे. पाण्याचा उपसा भरपूर केला जात आहे. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यात झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जीरवा, अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. पवनी तालुक्यातील जिथे नाले, ओढे आहेत त्यातील पाणी वाया जावू नये म्हणून शिवकालीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जागोजागी विहिरी बांधण्यात आल्या आहेत. सर्वत्र पाण्याची पातळी खोल गेली तरीही रात्रंदिवस मोटारपंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून शेतकरी पिक घेत आहेत. विहिरी कोरड्या पडल्या तरी तळाशी बोअर करून पाण्याचा उपसा सुरू आहे.दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. मात्र पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. पावसाच्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांवर बंदी करणे गरजेचे आहे. परंतु या प्रमुख बाबीकडे शासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात चौरास भाग वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे तर्क सुज्ञ नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)