शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा उपसा भूजल पातळीत घट

By admin | Updated: November 15, 2015 00:28 IST

पालोरा चौ़ : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत भरपूर प्रमाणात असले तरी दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढत आहे.

पालोरा चौ़ : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत भरपूर प्रमाणात असले तरी दिवसेंदिवस पाण्याचा उपसा वाढत आहे. परिणामत: भूगर्भात पन्नास फुटावर लागणारे पाणी शंभर फुटाच्या वर गेले आहे. आतापासून सर्वत्र पाण्याची टंचाई दिसून येत आहे. वैनगंगा नदीच्या पवित्र्यात असलेला भंडारा जिल्ह्यातील चौरास पट्टा वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे.पवनी तालुक्यात सभोवताल बाराही महिने पिक देणारी कसदार जमीन आहे. भूगर्भात भरपूर पाण्याचा स्त्रोत असल्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड उपसा करून वर्षभर पीक घेत आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पाण्याचा प्रचंड उपसामुळे भूगर्भातील रेती वाळवंटाचे रुप देत आहे. प्रत्येक नागरीक भूगर्भातील पाणी मिळविण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जात आहे. पूर्वी हाताने खोदलेल्या विहिरीला पाणी लागत होते. आता मात्र पाणी लागत नसल्यामुळे यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने पाण्याचा शोध घेणे सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी नाहिशी होऊन रेती व दगड मिळत आहेत. या भागात मोटार पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. भंडारा जिल्ह्यात चौरास क्षेत्र लाखांदूर व पवनी तालुक्यात येतो. लाखांदूरला चुलबंद नदी व पवनीला वैनगंगा नदी वाहते. या नद्या वरदान ठरत असल्या तरी मानवाच्या लापरवाहीमुळे सर्वत्र वाळवंट होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहे. पाण्याचा उपसा भरपूर केला जात आहे. मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यात झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जीरवा, अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. पवनी तालुक्यातील जिथे नाले, ओढे आहेत त्यातील पाणी वाया जावू नये म्हणून शिवकालीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जागोजागी विहिरी बांधण्यात आल्या आहेत. सर्वत्र पाण्याची पातळी खोल गेली तरीही रात्रंदिवस मोटारपंपाच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून शेतकरी पिक घेत आहेत. विहिरी कोरड्या पडल्या तरी तळाशी बोअर करून पाण्याचा उपसा सुरू आहे.दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. मात्र पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. पावसाच्या पाण्याचे भूगर्भात पुनर्भरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांवर बंदी करणे गरजेचे आहे. परंतु या प्रमुख बाबीकडे शासनाकडून दुर्लक्ष केल्या जात आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात चौरास भाग वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही असे तर्क सुज्ञ नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)