शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

वैनगंगेला ‘इकॉर्निया’चा विळखा

By admin | Updated: May 17, 2015 01:12 IST

जीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे.

इंद्रपाल कटकवार भंडाराजीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून भविष्यात मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेच आहे परंतु नगरपालिका प्रशासनही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.भंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वैनगंगा नदीपात्रातून भंडाराकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपासून कारधाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात या इकॉर्निया वनस्पतीने शिरकाव केला आहे. पाहतापाहता या वनस्पतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ही वनस्पती विषयुक्त नसली तरी या वनस्पतीमुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना त्याचा फटका बसत आहे. याशिवाय ज्याठिकाणी पाणी संथगतीने वाहते किंवा पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे, अशा ठिकाणी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वनस्पतीमुळे पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: तलावात ही वनस्पती आढळते. परंतु नदीपात्रात या वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे ही वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी नगरपालिकेला पुढाकार घेण्याची गरज आहे. नागनदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. काही दिवसांपासून या नदीत इकॉर्निया ही वनस्पती वाढत आहे. वैनगंगा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.- बाबूराव बागडे, नगराध्यक्ष भंडारा.इकॉर्निया ही वनस्पती वैनगंगा नदीपात्रात आढळून आली आहे. या वनस्पतीपासून जलचरांना धोका आहे. त्यामुळे भविष्यातील समस्येच्या दृष्टीने या वनस्पतीचे उच्चाटन करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल. - रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी नगरपालिका भंडारामत्स्योत्पादन घटलेवैनगंगेचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदीचे दूषित पाणी मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. वैनगंगा नदीतील मासोळ्याची दूरवर मागणी होती. परंतु नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहेत. त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर झालेला आहे. विकार बळावलेनाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत. याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला कारण वैनगंगा नदीचे दूषित झाले आहे.