शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

वैनगंगेला ‘इकॉर्निया’चा विळखा

By admin | Updated: May 17, 2015 01:12 IST

जीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे.

इंद्रपाल कटकवार भंडाराजीवनदायिनी म्हणून लाभलेल्या आणि जिल्ह्याला ९० कि़मी. चा विळखा घालून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला ‘इकॉर्निया’ नामक वनस्पतीने विळखा घातला आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून भविष्यात मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यता बळावली आहे. नदीच्या स्वच्छतेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेच आहे परंतु नगरपालिका प्रशासनही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.भंडारा नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे वैनगंगा नदीपात्रातून भंडाराकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपासून कारधाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात या इकॉर्निया वनस्पतीने शिरकाव केला आहे. पाहतापाहता या वनस्पतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ही वनस्पती विषयुक्त नसली तरी या वनस्पतीमुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना त्याचा फटका बसत आहे. याशिवाय ज्याठिकाणी पाणी संथगतीने वाहते किंवा पाण्याचा प्रवाह थांबलेला आहे, अशा ठिकाणी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या वनस्पतीमुळे पाण्याचे बाष्पीकरण होण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: तलावात ही वनस्पती आढळते. परंतु नदीपात्रात या वनस्पतीने शिरकाव केल्यामुळे ही वनस्पती समूळ नष्ट करण्यासाठी नगरपालिकेला पुढाकार घेण्याची गरज आहे. नागनदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा नदी प्रदूषित होत आहे. काही दिवसांपासून या नदीत इकॉर्निया ही वनस्पती वाढत आहे. वैनगंगा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.- बाबूराव बागडे, नगराध्यक्ष भंडारा.इकॉर्निया ही वनस्पती वैनगंगा नदीपात्रात आढळून आली आहे. या वनस्पतीपासून जलचरांना धोका आहे. त्यामुळे भविष्यातील समस्येच्या दृष्टीने या वनस्पतीचे उच्चाटन करण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल. - रवींद्र देवतळे, मुख्याधिकारी नगरपालिका भंडारामत्स्योत्पादन घटलेवैनगंगेचा प्रवाह थांबल्यामुळे त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदीचे दूषित पाणी मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरत असतानाच जलचर प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. वैनगंगा नदीतील मासोळ्याची दूरवर मागणी होती. परंतु नदीचे पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्यूमुखी पडत आहेत. त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर झालेला आहे. विकार बळावलेनाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत. याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्वसनाचे आजार बळावत आहेत. याला कारण वैनगंगा नदीचे दूषित झाले आहे.