शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

शौचालय बांधकामासाठी अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Updated: May 29, 2014 23:48 IST

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य करणार्‍या कुटुंबीयांना शौचालय बांधकाम-नळ जोडणीकरिता अनुदान देणारी योजना राबविण्यात आली असली तरी मोहगाव (खदान) येथील

चुल्हाड (सिहोरा) : अनुसूचित  जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य करणार्‍या कुटुंबीयांना शौचालय बांधकाम-नळ जोडणीकरिता  अनुदान देणारी योजना राबविण्यात आली असली तरी मोहगाव (खदान) येथील लाभार्थ्यांंना तब्बल १५ महिन्यानंतरही अनुदान प्राप्त झाला नाही. यामुळे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.ग्रामीण भागात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम आणि  नळ कनेक्शन देण्यात येणारी योजना राबविण्यात आली आहे. ही योजना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने क्रियान्वित केली आहे. या योजनेंतर्गत शौचालय बांधकाम ११ हजार आणि नळजोडणी ४ हजार, असे १५ हजार रुपये अनुदान देणारी योजना राबविण्यात आली आहे. फेब्रुवारी २0१३ या महिन्यात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांंनी घराघरात शौचालय बांधकाम आणि नळ कनेक्शन प्राप्त केली आहेत. अल्पशा अनुदानात गरीब लाभार्थ्यांंनी शौचालयाचे बांधकाम केली आहेत. अनेकांनी उसनवारीवर साहित्यांची खरेदी केली आहे. परंतु या लाभार्थ्यांंना गेल्या १५ महिन्यांपासून छदामही देण्यात आलेला नाही. मोहगाव (खदान) गावात असे शौचालय बांधकाम करणारे २२ लाभार्थी व नळ कनेक्शन धारक २३ लाभार्थी वंचित आहेत. या संदर्भात जिल्हा परीषद तथा पंचायत समितीमध्ये  एकाच पक्षाची सत्ता असल्याने  अच्छे दिन येण्यासाठी लाभार्थ्यांंनी लोकप्रतिनिधींना  वर्षभरापासून अजीजी केली आहे. सभापती कलाम शेख यांनीही ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना धारेवर घेतले आहे.या अधिकार्‍यांसोबत तू-तू-मै-मै केली आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. लाभार्थ्यांंच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत. असा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेत नाहीत. अच्छे दिनाला विभागांचा विरोध असल्याचा आरोप होत आहे. लाभार्थ्यांंना अनुदान प्राप्त करताना तांत्रिक अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे. गावात  १५ हजाराचा अनुदान वाटप करण्यासाठी  यंत्रणेने पाचव्यांदा सर्वेक्षण केला आहे. गावात लाभार्थ्यांंच्या घरी शौचालय आणि नळ कनेक्शन आहेत. प्रत्यक्षात उपलब्ध असतानाही अनुदान देताना विलंब करण्यात येत आहे. यामुळे यंत्रणेची मानसिकता दिसून येत नाही. नळयोजना पूर्ण करताना असा सर्वेक्षण होत नाही. लाभार्थी टक्केवारी देत नसल्याने हेतुपुरस्पर अनुदान वाटप  करण्यास  विलंब करण्यात येत असल्याचा आरोप लाभार्थ्यांंनी केला आहे. लाभार्थ्यांंना न्याय देण्यासाठी भांडणार्‍या लोकप्रतिनिधींचे अधिकारी ऐकत नाही. यामुळे चांगले दिवस येण्याची अपेक्षा गैर आहे. मोहगाव खदान परिसरातील अनेक गावांमध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. अनेकदा नागरिकांनी याविषयी लोकप्रतिनिधींसह तालुका प्रशासनाला समस्यांची जाणीव करून दिली. मात्र प्रत्येकवेळी त्यांना आश्‍वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. परिणामी नागरिकांत रोष आहे.  (वार्ताहर)