शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

वैनगंगा होऊ लागली दूषित

By admin | Updated: May 31, 2014 23:15 IST

जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी घेणार पुढाकार

नाना पटोलेंनी केली नदीची पाहणी : नदी स्वच्छतेसाठी घेणार पुढाकारभंडारा : जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीच्या सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस दूषित होत आहे. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आता नदीच्या स्वच्छतेसाठी घेणार पुढाकार घेऊन यासंबंधीचा अहवाल संसदेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले. आज शनिवारला खा.पटोले यांनी वैनगंगा नदीची पाहणी केल्यानंतर ते नदीकाठावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,  वैनगंगा नदीच्या काठावर गोसेखुर्द सिंचन प्रकल्प बनविण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे आतपर्यंत शुद्ध असलेल्या पाण्याने रंग बदलला आहे. याचा परिणाम भंडारावासियांना लागला आहे. आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने यासंबंधी राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे म्हटले आहे. तरीसुद्धा राज्य सरकारने ही समस्या गंभीरतेने घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. नाग नदीसोबतच भंडारा शहरातील सांडपाणीसुद्धा वैनगंगा नदीला येऊन मिळत आहे. गोसेखुर्दमध्ये वैनगंगेचा प्रवाह थांबला आहे. परिणामी दूषित पाणी वाहून जात नाही. परिणामी या दूषित पाण्याच्या उपयोगामुळे नागरिकांना चर्म विकार जडले आहेत. याशिवाय पोटाचे विकार फुफ्फुस आणि श्‍वसनाचे आजार बळावत आहेत. याला कारण वैनगंगा नदीचे दूषित पाणी असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांना भेटणारवैनगंगा नदीचे पाणी दूषित होण्यामुळे जिल्ह्यातील जनजीवनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. भविष्यात यापासून मोठा धोका होणार असल्यामुळे सोमवारला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून राज्य सरकारने वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी योजना आखावी, अशी विनंती करणार आहे. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री रणजीत कांबळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करणार आहे. वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)