शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

गाव ठाणा, फलक निहारवाणीचे

By admin | Updated: May 10, 2014 02:25 IST

राष्ट्रीय महामार्गालगत ठाणा पेट्रोलपंप या स्थळी दुसर्‍याच गावाचे दर्शनी फलक लावण्यात आले. परिणामी राष्ट्रीय

जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गालगत ठाणा पेट्रोलपंप या स्थळी दुसर्‍याच गावाचे दर्शनी फलक लावण्यात आले. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत दिलीप बिलकॉमद्वारे रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील पारडी नाकापासून ते भंडारा जिल्ह्यातील मुजबीपर्यंत नव्वद टक्के विविध कामे करण्यात आले. मात्र रस्त्यालगत असलेली व रस्त्यापासून दोन्ही दिशेने असलेल्या गावांचे दिशादर्शक लावलेले नव्हते, यामुळे महामार्गावरील प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होतो. याची दखल लोकमतने फलक लावण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आज हे फलक पूर्ण लावण्यात आले.चौकोणी चार ते पाच फुट आकाराच्या फलकावर महामार्गापासून दोन्ही दिशेने दोन ते दहा किलोमीटर अंतराचे गावांचे दिशा लहान बाणाद्वारे उल्लेखीत करण्यात आले. या महामार्गालगत असलेली गावांची फलके ही दोन ते तीन फुट छोट्या आकाराच्या दर्शनी फलकावर मोठ्या आकाराच्या बाणाने दाखविण्यात आले. मात्र राष्ट्रीय महामार्गालगत भंडारा तालुक्यातील ठाणा पे.पंप येथे भंडार्‍याहून नागपूर दिशेने जाताना व नागपूरहून भंडार्‍याकडे जाताना जुना ठाणा ग्रामपंचायतजवळ दोन फलक लावण्यात आले आहे. या दोन ते तीन फुट आकाराच्या फलकावर मोठ्या बाणाने नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील निहारवाणी या गावाचे नाव दर्शविण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे ठाणा पे.पंप राष्टÑीय महामार्गापासून उत्तर दिशेने दीड ते दोन किलोमीटर अंतरावर निहारवाणी हे गाव आहे. परिणामी रात्री अपरात्री येणार्‍या प्रवाशांना ठाणा गाव कोठे आहे हे कळत नाही. यापूर्वी शहापूर-ठाणा पे.पंप दरम्यान नाल्यावर तालुक्याबाहेरची ‘सुरनदी’ अवतरली होती. हे फलक अद्याप लावलेले आहे. याबाबत विचारणा केली असता महसूल विभागाच्या नकाशावरुन लिहिण्यात आले असे सांगण्यात आले. प्रश्न येथे असा आहे की साठ ते सत्तर वर्षापूर्वी वसलेले ठाणा पे.पंप हे गाव महसुल विभागाच्या नकाशावर नाही का? नुकतेच नव्याने साकोली तालुक्यात भेल कंपनी स्थापित झाली. सुरू होण्याची प्रतिक्षा आहे. मात्र त्यांचे दर्शनी फलक पारडी नाकापासून मुजबीपर्यंत प्रत्येक गावामध्ये किलोमीटर अंतर दर्शविणारे फलक लागले कसे हे न समजणारे एक कोडे आहे. संबंधित वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.(वार्ताहर)